ETV Bharat / state

Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात कोरोनाच्या १११५ रुग्णांची तर ९ मृत्यूंची नोंद; मास्क लावण्याचे आवाहन

author img

By

Published : Apr 13, 2023, 6:30 AM IST

राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. मंगळवारी ९१९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात बुधवारी वाढ होवून १११५ रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी तब्बल ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अनेकांचे बळी घेतल्याचे आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या २४ तासात १११५ कोरोना रुग्णांची तर ९ मृत्यूंची नोंद झली आहे. ५६० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५२ हजार २९१ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७० मृत्यूंची नोंद झाली आहे. ७९ लाख ९८ हजार ४०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ५४२१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १५७७, ठाणे ९५३, पुणे ७७६, नागपूर ५४८, रायगड २३७, पालघर १६०, सांगली १६७, सोलापूर १२५, सातारा १२३, उस्मानाबाद १२४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.


'या' विभागात मृत्यूंची नोंद : राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक ते तीन मृत्यूंची नोंद होत होती. बुधवारी त्यात वाढ होऊन ९ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई २, ठाणे पालिका २, वसई विरार पालिका १, पुणे पालिका ३ तसेच अकोला येथे १ असे आज मृत्यू नोंद झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४८ हजार ४७० मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या एक हजारच्या पार गेली आहे. तसेच मृत्यूची संख्या वाढल्याने नागरिकांची आणि आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.


मुंबईत २४२ नवे रुग्ण : मुंबईत मंगळवारी २४२ रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी त्यात वाढ होऊन ३२० रुग्णांची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस मुंबईत रोज एक मृत्यू नोंद झाला होता. बुधवारी त्यात वाढ होऊन २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १४७८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ५९ हजार ५४५ रुग्णांची तर १९ हजार ७५२ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालय, कार्यालये येथे मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ६० वर्षावरील वयोवृद्ध आणि गंभीर आजार असलेल्यानी मास्क लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra Corona Update: पुन्हा वाढतोय कोरोनाचा कहर; मागील तीन वर्षात 'या' वयोगटात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अनेकांचे बळी घेतल्याचे आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या २४ तासात १११५ कोरोना रुग्णांची तर ९ मृत्यूंची नोंद झली आहे. ५६० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५२ हजार २९१ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७० मृत्यूंची नोंद झाली आहे. ७९ लाख ९८ हजार ४०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ५४२१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १५७७, ठाणे ९५३, पुणे ७७६, नागपूर ५४८, रायगड २३७, पालघर १६०, सांगली १६७, सोलापूर १२५, सातारा १२३, उस्मानाबाद १२४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.


'या' विभागात मृत्यूंची नोंद : राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक ते तीन मृत्यूंची नोंद होत होती. बुधवारी त्यात वाढ होऊन ९ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई २, ठाणे पालिका २, वसई विरार पालिका १, पुणे पालिका ३ तसेच अकोला येथे १ असे आज मृत्यू नोंद झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४८ हजार ४७० मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या एक हजारच्या पार गेली आहे. तसेच मृत्यूची संख्या वाढल्याने नागरिकांची आणि आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.


मुंबईत २४२ नवे रुग्ण : मुंबईत मंगळवारी २४२ रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी त्यात वाढ होऊन ३२० रुग्णांची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस मुंबईत रोज एक मृत्यू नोंद झाला होता. बुधवारी त्यात वाढ होऊन २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १४७८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ५९ हजार ५४५ रुग्णांची तर १९ हजार ७५२ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालय, कार्यालये येथे मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ६० वर्षावरील वयोवृद्ध आणि गंभीर आजार असलेल्यानी मास्क लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra Corona Update: पुन्हा वाढतोय कोरोनाचा कहर; मागील तीन वर्षात 'या' वयोगटात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.