ETV Bharat / state

माणुसकीचे दर्शन : मालकाने मजुरांना वाऱ्यावर सोडलं, गावकऱ्यांनी तारलं..!

author img

By

Published : Apr 18, 2020, 11:49 AM IST

Updated : Apr 18, 2020, 1:39 PM IST

उत्तर प्रदेशातील या मजूर कुटूंबीयांकडे त्यांच्या मालकाने दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील गावागावातील यात्रा, उरुसांमध्ये आकाशपाळणे उभारून मजुरांना पैसे मिळत होते ते बंद झाल्यामुळे त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाले आहे.

villagers-shows-humanity-gave-food-to-labours
माणुसकीचे दर्शन : मालकाने मजुरांना वाऱ्यावर सोडलं, गावकऱ्यांनी तारलं..!

लातुर - कोरोनाच्या संकटात नात्यागोत्याचा विचार न करता परक्यांसाठीही मदतीचे हात पुढे येत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यात्रा उरूसमध्ये आकाशपाळणे चालवण्यासाठी गावच नाही तर राज्य सोडून काही कुटुंब लातुरमध्ये दाखल झालीत. प्रतिकूल परस्थितीमध्ये मालकाकडून मदत होईल, अशी आशा या मजूरांना होती. मात्र, ऐन वेळी त्याने टाळाटाळ केली आणि लामजनाकरांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. गावकऱ्यांच्या या पुढकारामुळे त्यांना दोन वेळचे जेवण मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्या भरवश्यावर त्यांनी गाव सोडले त्यांनी मात्र आधार देणेच सोडले आहे.

माणुसकीचे दर्शन : मालकाने मजुरांना वाऱ्यावर सोडलं, गावकऱ्यांनी तारलं..!

कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीत नोकरांना कामावरून कमी करू नका, त्यांचा उदनिर्वाह होईल याची व्यवस्था करा, अशा सुचना केल्या जात आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील या मजूर कुटूंबीयाकडे त्यांच्या मालकाने दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील गावागावातील यात्रा, उरुसांमध्ये आकाशपाळणे उभारून मजुरांना पैसे मिळत होते. परंतू सध्याच्या संचारबंदीत सर्व यात्रा उत्सव तर बंद आहेत. गुडुकुमार गौतम यांच्यासारख्या 5 कुटूंबियांचा परतीचा मार्गही धरणे अवघड झाले आहे.

मागील १५ दिवसांपासून हे मजूर औसा तालुक्यातील लामजाना येथे वास्तव्यास आहे. हाताला काम नाही आणि खायला काही नाही अशा परस्थितीमध्ये या मजुरांनी त्यांच्या मालकाकडे पैसे मागितले होते. मात्र, संचारबंदी आणि वेगवेगळी कारणे सांगून त्याने हात झटकले आहेत. परंतू ,येथील गावकऱ्यांनी माणुसकी दाखवली आहे. गावाच्या शिवारातच या मजुरांनी तळ ठोकला आहे. शिवाय आकाशपाळणाही उभारलाय पण तो केवळ दिखाव्यासाठी...ना गिऱ्हाईक मिळते ना त्यामधून पैसे पदरात पडतात.

मजुरांची ही अवस्था पाहून गावकऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना दोन वेळचे जेवण आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातोय. कोरोनाचे संकट भयानक असले तरी या काळात माणुसकीचे दर्शन सर्वत्र पाहवयास मिळत आहे. गावकऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत याच गावात राहणार असल्याचे या मजुरांनी सांगितले.

लातुर - कोरोनाच्या संकटात नात्यागोत्याचा विचार न करता परक्यांसाठीही मदतीचे हात पुढे येत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यात्रा उरूसमध्ये आकाशपाळणे चालवण्यासाठी गावच नाही तर राज्य सोडून काही कुटुंब लातुरमध्ये दाखल झालीत. प्रतिकूल परस्थितीमध्ये मालकाकडून मदत होईल, अशी आशा या मजूरांना होती. मात्र, ऐन वेळी त्याने टाळाटाळ केली आणि लामजनाकरांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. गावकऱ्यांच्या या पुढकारामुळे त्यांना दोन वेळचे जेवण मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्या भरवश्यावर त्यांनी गाव सोडले त्यांनी मात्र आधार देणेच सोडले आहे.

माणुसकीचे दर्शन : मालकाने मजुरांना वाऱ्यावर सोडलं, गावकऱ्यांनी तारलं..!

कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीत नोकरांना कामावरून कमी करू नका, त्यांचा उदनिर्वाह होईल याची व्यवस्था करा, अशा सुचना केल्या जात आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील या मजूर कुटूंबीयाकडे त्यांच्या मालकाने दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील गावागावातील यात्रा, उरुसांमध्ये आकाशपाळणे उभारून मजुरांना पैसे मिळत होते. परंतू सध्याच्या संचारबंदीत सर्व यात्रा उत्सव तर बंद आहेत. गुडुकुमार गौतम यांच्यासारख्या 5 कुटूंबियांचा परतीचा मार्गही धरणे अवघड झाले आहे.

मागील १५ दिवसांपासून हे मजूर औसा तालुक्यातील लामजाना येथे वास्तव्यास आहे. हाताला काम नाही आणि खायला काही नाही अशा परस्थितीमध्ये या मजुरांनी त्यांच्या मालकाकडे पैसे मागितले होते. मात्र, संचारबंदी आणि वेगवेगळी कारणे सांगून त्याने हात झटकले आहेत. परंतू ,येथील गावकऱ्यांनी माणुसकी दाखवली आहे. गावाच्या शिवारातच या मजुरांनी तळ ठोकला आहे. शिवाय आकाशपाळणाही उभारलाय पण तो केवळ दिखाव्यासाठी...ना गिऱ्हाईक मिळते ना त्यामधून पैसे पदरात पडतात.

मजुरांची ही अवस्था पाहून गावकऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना दोन वेळचे जेवण आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातोय. कोरोनाचे संकट भयानक असले तरी या काळात माणुसकीचे दर्शन सर्वत्र पाहवयास मिळत आहे. गावकऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत याच गावात राहणार असल्याचे या मजुरांनी सांगितले.

Last Updated : Apr 18, 2020, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.