ETV Bharat / state

लातूरमधील निलंग्यात 'अवकाळी'चा फटका; विजेचे खांब कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान - latur nilanga untimely heavy rain

निलंगा शहरासह अनेक गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाडे विजेचे खांब मोडल्याने विज गायब झाडे वाहणावर पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान

लातूरमधील निलंग्यात 'अवकाळी'चा फटका
लातूरमधील निलंग्यात 'अवकाळी'चा फटका
author img

By

Published : May 16, 2020, 5:26 PM IST

Updated : May 16, 2020, 7:13 PM IST

निलंगा (लातूर) - शहरासह अनेक गावात आज (शनिवारी) दीड वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. यावेळी व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता, की अनेक झाडे, विजेचे खांब मोडले गेले. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले. या सर्व प्रकारामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

सकाळपासून उन्हाची तीव्रता असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच वादळाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह निलंगा शहरासह तालुक्यातील झरी, लांबोटा, सिंदखेड, निटूर, अंबुलगा बु. केळगाव, कलांडी यासह आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा - किसान सन्मान दिन; 'आजार कोणताही असो शेतकऱ्याचं मरण ठरलेलच. . . . '

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेली. तर तारे लोंबकळत पडल्या आहेत. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीसाठी सोयीचा मानला जात आहे. तर शिवाय सतत अधूनमधून कृतिका नक्षत्रात अवकाळी पाऊस पडत असल्याने भविष्यात मुबलक पाऊस पडेल की नाही, अशी भितीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

निलंगा (लातूर) - शहरासह अनेक गावात आज (शनिवारी) दीड वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. यावेळी व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता, की अनेक झाडे, विजेचे खांब मोडले गेले. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले. या सर्व प्रकारामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

सकाळपासून उन्हाची तीव्रता असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच वादळाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह निलंगा शहरासह तालुक्यातील झरी, लांबोटा, सिंदखेड, निटूर, अंबुलगा बु. केळगाव, कलांडी यासह आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा - किसान सन्मान दिन; 'आजार कोणताही असो शेतकऱ्याचं मरण ठरलेलच. . . . '

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेली. तर तारे लोंबकळत पडल्या आहेत. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीसाठी सोयीचा मानला जात आहे. तर शिवाय सतत अधूनमधून कृतिका नक्षत्रात अवकाळी पाऊस पडत असल्याने भविष्यात मुबलक पाऊस पडेल की नाही, अशी भितीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Last Updated : May 16, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.