ETV Bharat / state

लातूरमध्ये किल्लारीकरांचा पाण्यासाठी रास्ता रोको

औसा तालुक्यातील किल्लारी येथे माकनी धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या धरणाचेही पाणी संपल्याने मागील ४ महिन्यांपासून ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.

author img

By

Published : Jul 22, 2019, 7:28 PM IST

किल्लारीकरांचे पाण्यासाठी हाल

लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी येथे माकनी धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या धरणाचेही पाणी संपल्याने मागील ४ महिन्यांपासून ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल होत असल्याने आज (सोमवारी) उपाययोजनांबाबत ग्रामस्थानी लातूर-उमरगा मार्गावर रस्तारोको केला होता.

किल्लारीकरांचे रास्ता रोको


गावाला पावसाळ्यात तरी माकणी धरणावरून पाणीपुरवठा होईल, असा आशावाद होता. परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांनी पाण्यासाठी भटकंती कायम आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली असली लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या तुटपुंजी आहे. यासंबंधी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज रस्ता रोको आंदोलन केला.

किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत असे, मात्र मागील ४ महिन्यांतून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लातूर उमरगा रस्त्यावर जवळपास दीड तास रस्ता रोको केला. यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष बाब म्हणजे यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी आपल्या हातामध्ये रिकामे हंडे, घागरी घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला होता. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमच पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.

लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी येथे माकनी धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या धरणाचेही पाणी संपल्याने मागील ४ महिन्यांपासून ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल होत असल्याने आज (सोमवारी) उपाययोजनांबाबत ग्रामस्थानी लातूर-उमरगा मार्गावर रस्तारोको केला होता.

किल्लारीकरांचे रास्ता रोको


गावाला पावसाळ्यात तरी माकणी धरणावरून पाणीपुरवठा होईल, असा आशावाद होता. परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांनी पाण्यासाठी भटकंती कायम आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली असली लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या तुटपुंजी आहे. यासंबंधी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज रस्ता रोको आंदोलन केला.

किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत असे, मात्र मागील ४ महिन्यांतून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लातूर उमरगा रस्त्यावर जवळपास दीड तास रस्ता रोको केला. यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष बाब म्हणजे यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी आपल्या हातामध्ये रिकामे हंडे, घागरी घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला होता. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमच पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.

Intro:Visuals sent on ftp also
किल्लारीकरांचे पाण्यासाठी हाल ; उपाययोजनांची मागणी करीत रास्ता रोको
लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथे माकनी धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, या धरणाचेही पाणी संपले असल्याने गेल्या 4 महिन्यापासून ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. भर पावसाळ्यात हाल होत असल्याने आज उपाययोजनांबाबत ग्रामस्थानी लातुर - उमरगा या मार्गावर रास्तारोको केला.
Body:गावाला पावसाळ्यात तरी माकणी धरणावरून पाणीपुरवठा होईल असा आशावाद होता. परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांनी पाण्यासाठी भटकंती कायम आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली असली लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या तुटपुंजी आहे. यासंबंधी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला. किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत असे, मात्र मागील चार महिन्यातून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी  लातूर उमरगा रस्त्यावर जवळपास दीड तास रास्ता रोको केला.  या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष बाब  ही या रास्ता रोको मध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.  महिलांनी आपल्या हातामध्ये रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडला होता. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमच पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. Conclusion:यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.