ETV Bharat / state

शरीराने लातुरात मनाने कुटुंबियांसोबत; लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या कामगारांची व्यथा

author img

By

Published : Apr 13, 2020, 11:38 AM IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही अनेक कामगारांनी गाव गाठण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर लातूर जिल्ह्यात तब्बल 5 हजार कामगार अडकले आहेत.

labour stuck in latur city Due to lockdown
लॉकडाऊनमुळे लातूर शहरात कामगार अडकले

लातूर - कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी चार पैसे मिळेल, या आशेने कामासाठी घरदार सोडून आलेले तब्बल पाच हजार कामगार लातुरात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. यामध्ये शेजारील जिल्ह्यांसह परराज्यातील कामगारांचा समावेश आहे. त्यांची उदरनिर्वाहाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मात्र, कर्ता पुरुषच येथे अडकल्याने त्यांच्या कुटुंबाची काय स्थिती असेल, याची काळजी कामगारांना लागली आहे. त्यामुळे आम्ही येथे असलो तरी कुटुंबाच्या काळजीने व्यथीत झालो असल्याची खंत या सर्व कामगारांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे लातूर शहरात कामगार अडकले

हेही वाचा.... ''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही अनेक कामगारांनी गाव गाठण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर लातूर जिल्ह्यात तब्बल 5 हजार कामगार अडकले आहेत. लातूरमध्ये एमआयडीसीचा मोठा विस्तार झाला आहे शिवाय बाजारपेठही मोठी असल्याने परिसरातील जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, संचारबंदी लागू झाली आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले.

बोटावर मोजण्याऐवढ्या उद्योजकांनी या कामगारांची राहण्याची सोय केली. मात्र, 5 हजार कामगारांना मुलभूत सोई-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला होता. या कामगारांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असून निलंगा शहराजवळ आणि लातुरात सिद्धेश्वर मंदीर परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. अवघ्या 60 किमी अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथे जाणे देखील मुश्किल झाले आहे. तर भीक मागून आपली पोटाची खळगी भरणाऱ्यांना उपासमारीची वेळ आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने जागोजागी केलेल्या सुविधेमुळे या कामगारांचा मुलभूत प्रश्न तरी मार्गी लागला आहे.

हेही वाचा... तब्बल २३ एकरातील टोमॅटोचा लाल चिखल; लाखो रुपये पाण्यात..!

हे कामगार परजिल्ह्यातील परराज्यातील असले तरी भारतीय नागरिक आहेत. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. मात्र, आता लॉकडाऊन वाढल्याने अजून किती दिवस यांना कुटुंबापासून दूर राहावे लागणार हा प्रश्न आहे.

लातूर - कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी चार पैसे मिळेल, या आशेने कामासाठी घरदार सोडून आलेले तब्बल पाच हजार कामगार लातुरात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. यामध्ये शेजारील जिल्ह्यांसह परराज्यातील कामगारांचा समावेश आहे. त्यांची उदरनिर्वाहाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मात्र, कर्ता पुरुषच येथे अडकल्याने त्यांच्या कुटुंबाची काय स्थिती असेल, याची काळजी कामगारांना लागली आहे. त्यामुळे आम्ही येथे असलो तरी कुटुंबाच्या काळजीने व्यथीत झालो असल्याची खंत या सर्व कामगारांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे लातूर शहरात कामगार अडकले

हेही वाचा.... ''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही अनेक कामगारांनी गाव गाठण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर लातूर जिल्ह्यात तब्बल 5 हजार कामगार अडकले आहेत. लातूरमध्ये एमआयडीसीचा मोठा विस्तार झाला आहे शिवाय बाजारपेठही मोठी असल्याने परिसरातील जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, संचारबंदी लागू झाली आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले.

बोटावर मोजण्याऐवढ्या उद्योजकांनी या कामगारांची राहण्याची सोय केली. मात्र, 5 हजार कामगारांना मुलभूत सोई-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला होता. या कामगारांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असून निलंगा शहराजवळ आणि लातुरात सिद्धेश्वर मंदीर परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. अवघ्या 60 किमी अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथे जाणे देखील मुश्किल झाले आहे. तर भीक मागून आपली पोटाची खळगी भरणाऱ्यांना उपासमारीची वेळ आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने जागोजागी केलेल्या सुविधेमुळे या कामगारांचा मुलभूत प्रश्न तरी मार्गी लागला आहे.

हेही वाचा... तब्बल २३ एकरातील टोमॅटोचा लाल चिखल; लाखो रुपये पाण्यात..!

हे कामगार परजिल्ह्यातील परराज्यातील असले तरी भारतीय नागरिक आहेत. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. मात्र, आता लॉकडाऊन वाढल्याने अजून किती दिवस यांना कुटुंबापासून दूर राहावे लागणार हा प्रश्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.