ETV Bharat / state

मनुस्मृतीला पोसणाऱ्या व संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला हद्दपार करा - जिग्नेश मेवाणी

author img

By

Published : Aug 26, 2019, 4:39 PM IST

'पुरोगामी भारतामध्ये आजही मनुस्मृतीला पाठबळ दिले जात आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दिवसेंदिवस याचा वापर वाढत असून भाजप संविधानाला विरोध करत आहे. हे देशाच्या एकात्मतेसाठी धोकेदायक आहे. म्हणून भाजपला हद्दपार करा', असे वक्तव्य आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले आहे.

मनुस्मृतीला पोसणाऱ्या आणि संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला हद्दपार करा - जिग्नेश मेवाणी

लातूर - 'पुरोगामी भारतामध्ये आजही मनुस्मृतीला पाठबळ दिले जात आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दिवसेंदिवस याचा वापर वाढत असून भाजप संविधानाला विरोध करत आहे. हे देशाच्या एकात्मतेसाठी धोकेदायक आहे. म्हणून भाजपला हद्दपार करा', असे वक्तव्य आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले आहे. उदगीर येथे 'संविधान सन्मान यात्रे'निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

मनुस्मृतीला पोसणाऱ्या आणि संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला हद्दपार करा - जिग्नेश मेवाणी

यावेळी जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या 5 वर्षांत निवडणुकांना जातीय रंग दिला जात असून मोदी सरकार मनुस्मृतीला पाठबळ देत असल्याचा आरोप मेवाणी यांनी केला आहे. तसेच, सरकार संविधानविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हुकूमशाही पद्धत भारतात रूजत असल्याचेही ते म्हणाले.

उदगीर मतदार संघातून निवृत्ती सांगवे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे यावेळी मेवाणी यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान यात्रेला मराठवाड्यात प्रारंभ झाला. पावसामुळे काही काळ सभेत व्यत्यय निर्माण झाला होता. या सभेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

लातूर - 'पुरोगामी भारतामध्ये आजही मनुस्मृतीला पाठबळ दिले जात आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दिवसेंदिवस याचा वापर वाढत असून भाजप संविधानाला विरोध करत आहे. हे देशाच्या एकात्मतेसाठी धोकेदायक आहे. म्हणून भाजपला हद्दपार करा', असे वक्तव्य आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले आहे. उदगीर येथे 'संविधान सन्मान यात्रे'निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

मनुस्मृतीला पोसणाऱ्या आणि संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला हद्दपार करा - जिग्नेश मेवाणी

यावेळी जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या 5 वर्षांत निवडणुकांना जातीय रंग दिला जात असून मोदी सरकार मनुस्मृतीला पाठबळ देत असल्याचा आरोप मेवाणी यांनी केला आहे. तसेच, सरकार संविधानविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हुकूमशाही पद्धत भारतात रूजत असल्याचेही ते म्हणाले.

उदगीर मतदार संघातून निवृत्ती सांगवे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे यावेळी मेवाणी यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान यात्रेला मराठवाड्यात प्रारंभ झाला. पावसामुळे काही काळ सभेत व्यत्यय निर्माण झाला होता. या सभेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

Intro:मनोस्मृतीला पोसणाऱ्या अन संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपाला हद्दपार करा : जिग्नेश मेवाणी
लातूर : पुरोगामी भारतामध्ये आजही मनोस्मृतीला पाठबळ दिले जात आहे. राजकिय स्वार्थ साधण्यासाठी दिवसेंदिवस याचा वापर वाढत असून संविधानाला विरोध भाजपाकडून केला जात आहे. हे देशाच्या एकात्मतेसाठी धोकेदायक असून या भाजपाला हद्दपार करण्याचे आवाहन आ. जिग्नेश मेवाणी यांनी केले. उदगीर येथे संविधान सन्मान यात्रा निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मराठवाड्यातील यात्रेला प्रारंभ झाला मात्र, पावसाने व्यत्यय निर्माण झाला होता.


Body:राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा मतराठवाड्यात पार पडत आहे. यात्रेच्या प्रारंभी आ. जिग्नेश मावेणी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका करीत आगामी विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देण्याचा निर्धार केला. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींच्या काळात आता दिवसेंदिवस बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. सत्ता बदल झाला मात्र, त्या तुलनेत विकास खुंटला आहे. स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे, गावागावात मूलभूत सोई-सुविधा नाहीत आणि मेट्रो सिटीची स्वप्न दाखवली जात आहे. गेल्या 5 वर्षात निवडणुकांना जातीय रंग दिला जात असून मनोस्मृतीला मोदी सरकार पाठबळ देत आहे. तर दुसरीकडे संविधानाच्या विरोधी भूमिका घेऊन हुकूमशाही पद्धतीचा वापर वाढत आहे. सर्वांना समान वागणुकीसाठी ही लढाई आहे. त्यानुषंगानेच लातुरात दाखल झालो आहे...प्रत्येकाने विरोधकाच्या भूमिकेत राहून ही लढाई लढणे आवश्यक झाले आहे. मागासवर्गीय समाज समृद्ध झाला आहे...दिवसेंदिवस प्रगतशील होत आहे म्हणूनच या सरकारकडून संविधानाला विरोध असल्याची टीका जिग्नेश मेवाणी यांनी केली. शिवाय सर्व सामान्य जनतेसाठी उदगीर मतदार संघातून निवृत्ती सांगवे लढतील असेही त्यांनी सांगितले.
सभेच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली होती.


Conclusion:पडत्या पावसात आ. जितेंद्र आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले तर त्यानंतर जिग्नेश मावेणी यांनी संविधान यात्रेचे स्वरूप सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.