ETV Bharat / state

लातूरकरांचा अनोखा उपक्रम, ३० हजारांवर गणेश मूर्तींचे संकलन - लातूरकरांचा अनोखा उपक्रम

जिल्ह्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गणेश मंडळांना गणेश मूर्तींचे विसर्जन करावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जिल्हा प्रशासनाने आणि शहरातील गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा मूर्तींचे विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला.

लातूरमधील गणेश मंडळांनी संकलित केलेल्या गणेश मूर्ती
author img

By

Published : Sep 13, 2019, 5:18 PM IST

Updated : Sep 13, 2019, 7:19 PM IST

लातूर - शहरातील गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती विसर्जित न करता त्या मूर्तीकारांना परत कराव्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या आवाहनाला गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळांनी शहरानजीकच्या कोळपा गावात तब्बल 30 हजाराहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन केले आहे. लवकरच या मूर्ती मूर्तीकारांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

गणेश मुर्ती संकलन उपक्रमाची माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 28 हजार मूर्तीदान; रात्री उशिरापर्यंत होणार ५० हजार मूर्तीदान

जिल्ह्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गणेश मंडळांना गणेश मूर्तींचे विसर्जन करावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जिल्हा प्रशासनाने आणि शहरातील गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा मूर्तींचे विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व मंडळांनी या निर्णयाला सहमती दिल्यानंतर कोळपा गाव शिवारात तब्बल 30 हजार गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी शहरालगतच्या ग्रामीण भागातील गणेश मंडळांनीही मूर्ती संकलन करण्यावर भर दिला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या हा नवा लातूर पॅटर्न झाला असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - परभणीत महापालिकेच्या कृत्रिम हौदावर 'श्रीं'च्या विसर्जनासाठी गर्दी

गणेश मूर्ती संकलन केलेल्या मंडळाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. या मंडळांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणी संकट आले तरी या उपक्रमांतून एक नवा मार्ग येथील गणेश मंडळ आणि जिल्हा प्रशासन अवलंबला आहे.

लातूर - शहरातील गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती विसर्जित न करता त्या मूर्तीकारांना परत कराव्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या आवाहनाला गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळांनी शहरानजीकच्या कोळपा गावात तब्बल 30 हजाराहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन केले आहे. लवकरच या मूर्ती मूर्तीकारांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

गणेश मुर्ती संकलन उपक्रमाची माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 28 हजार मूर्तीदान; रात्री उशिरापर्यंत होणार ५० हजार मूर्तीदान

जिल्ह्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गणेश मंडळांना गणेश मूर्तींचे विसर्जन करावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जिल्हा प्रशासनाने आणि शहरातील गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा मूर्तींचे विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व मंडळांनी या निर्णयाला सहमती दिल्यानंतर कोळपा गाव शिवारात तब्बल 30 हजार गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी शहरालगतच्या ग्रामीण भागातील गणेश मंडळांनीही मूर्ती संकलन करण्यावर भर दिला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या हा नवा लातूर पॅटर्न झाला असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - परभणीत महापालिकेच्या कृत्रिम हौदावर 'श्रीं'च्या विसर्जनासाठी गर्दी

गणेश मूर्ती संकलन केलेल्या मंडळाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. या मंडळांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणी संकट आले तरी या उपक्रमांतून एक नवा मार्ग येथील गणेश मंडळ आणि जिल्हा प्रशासन अवलंबला आहे.

Intro:लातूरचा नवा पॅटर्न : 30 हजार 'बाप्पा' एकाच ठिकाणी
लातूर : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला साद घालत गणेश मंडळांनी गणेश मूर्तींच्या संकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरानजीकच्या गावात तब्बल 30 हजाराहून अधिक गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले असून लवकरच या मुर्त्या मूर्तिकाराला दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.


Body:पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन करावे कुठे असा सवाल उपस्थित झाला होता. जिल्हा प्रशासनान आणि शहरातील गणेश मंडळांनी एकत्र येत यंदा मूर्तींचे विसर्जन नाहीतर मूर्तीदान करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये शहरातील एकाही मंडळाने दुमत व्यक्त केले नाही. उलट हाच उपक्रम स्तुत्य असून यातून पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याचे मत लातूरकरांनी व्यक्त केले. आणि संकल्पित असलेला हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. शहराजवळच्या कोळपा गाव शिवारात तब्बल 30 हजार गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. या ठिकाणीच निवाऱ्याची सोय करण्यात येणार असल्याचे मनपा अधिकऱ्यांनी सांगितले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील गणेश मंडळांनीही मूर्ती संकलन करण्यावरच भर दिला. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून हा नवा लातूर पॅटर्न झाला असल्याच्या भावना व्यक्त केला जात आहे.


Conclusion:गणेश मूर्ती संकलन केलेल्या मंडळाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली असून या मंडळांना प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणी संकट आले तरी या उपक्रमांतून एक नवा मार्ग येथील गणेश मंडळ आणि जिल्हा प्रशासन अवलंबला आहे.
Last Updated : Sep 13, 2019, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.