ETV Bharat / state

लातुरात वातावरणातील बदलाने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव; रुग्णांच्या संख्येत वाढ

पाऊस नसतानाही जिल्हावासीयांचे आरोग्य बिघडले असून गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी गरजेची आहे.

author img

By

Published : Jul 15, 2019, 4:59 PM IST

रुग्णांची गर्दी

लातूर - जिल्ह्यात पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आणि साचलेल्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला याशिवाय दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो यासारखे साथीचे आजार वाढले आहेत. लातूर शासकीय रुग्णालयाची ओपीडी आठशेवरून थेट बाराशेवर गेली आहे. त्यामुळे 24 तास रुग्णांची सेवा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वाईन फ्लूचा कक्षही उभारण्यात आला आहे.

लातूर येथील रुग्णालयातील स्थिती

जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी एक जिल्हा शासकीय रुग्णालय आणि 10 ग्रामीण रुग्णालये आहेत. साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सातशे ते आठशे रुग्ण तपासणीसाठी येतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा बाराशेवर येऊन ठेपला आहे.

साथीच्या आजाराबाबत आरोग्य विभागाकडून 47 पथके तयार करण्यात आली आहेत. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविणे हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्याने साथीच्या आजारात वाढ झाली आहे. ही पथके ऑक्टोबर महिन्यापर्यंत कायम राहणार आहेत. आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागात आठवड्यातून एकदा कोरडा दिवस, पावसाच्या पाण्याचे नमुने, पाणी गळतीची तपासणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची संख्या -
01 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालय
10 ग्रामीण रुग्णालये
46 प्राथमिक आरोग्य केंद्र
01 स्त्री रुग्णालय
10 तालुका आरोग्य अधिकारी

लातूर - जिल्ह्यात पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आणि साचलेल्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला याशिवाय दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो यासारखे साथीचे आजार वाढले आहेत. लातूर शासकीय रुग्णालयाची ओपीडी आठशेवरून थेट बाराशेवर गेली आहे. त्यामुळे 24 तास रुग्णांची सेवा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वाईन फ्लूचा कक्षही उभारण्यात आला आहे.

लातूर येथील रुग्णालयातील स्थिती

जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी एक जिल्हा शासकीय रुग्णालय आणि 10 ग्रामीण रुग्णालये आहेत. साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सातशे ते आठशे रुग्ण तपासणीसाठी येतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा बाराशेवर येऊन ठेपला आहे.

साथीच्या आजाराबाबत आरोग्य विभागाकडून 47 पथके तयार करण्यात आली आहेत. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविणे हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्याने साथीच्या आजारात वाढ झाली आहे. ही पथके ऑक्टोबर महिन्यापर्यंत कायम राहणार आहेत. आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागात आठवड्यातून एकदा कोरडा दिवस, पावसाच्या पाण्याचे नमुने, पाणी गळतीची तपासणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची संख्या -
01 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालय
10 ग्रामीण रुग्णालये
46 प्राथमिक आरोग्य केंद्र
01 स्त्री रुग्णालय
10 तालुका आरोग्य अधिकारी

Intro:बाईट : डॉ. किरण डावळे, शासकीय रुग्णालय
डॉ. चंद्रज्योति धनगे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी

वातावरणातील बदलाने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव ; रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ
लातूर : जिल्ह्यात पाऊस नाही परंतु ढगाळ वातावरण आणि साचलेल्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांत मात्र वाढ झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने आवश्यक ती उपाययोजना केली असली तरी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ताप, सर्दी, खोकला याशिवाय दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सारखे साथीचे आजार वाढले असून लातूर शासकीय रुग्णालयाची ओपीडी आठशे वरून थेट बाराशेवर गेली आहे. त्यामुळे 24 तास रुग्णाची सेवा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वाईन फ्लू चा कक्षही उभारण्यात आला आहे.


Body:लातूर जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी एक जिल्हा शासकीय रुग्णालय आणि 10 ग्रामीण रुग्णालये आहेत. सध्या पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आणि जागोजागी साचलेल्या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावत आहेत. येथील शासकीय रुग्णालयात दिवसाकाठी सातशे ते आठशे रुग्ण तपासणीसाठी येतात मात्र गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा बाराशेवर येऊन ठेपला आहे. साथीच्या आजाराबाबत आरोग्य विभागाकडून 47 पथके तयार करण्यात आली आहेत. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविणे हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्यानेच या साथीच्या आजारात वाढ झाली आहे. ही पथके ऑक्टोबर महिन्यापर्यंत कायम राहणार असली तरी ग्रामीण भागात आठवड्यातून एकदा कोरडा दिवस, पावसाच्या पाण्याचे नमुने, पाणी गळतीची तपासणी करणे आवश्यक आहे.


Conclusion:पाऊस नसतानाही जिल्हावासीयांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी गरजेची आहे.

रुग्णालयांची संख्या
01 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालय
10 ग्रामीण रुग्णालये
46 प्राथमिक आरोग्य केंद्र
01 स्त्री रुग्णालय
10 तालुका आरोग्य अधिकारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.