ETV Bharat / state

लग्नाच्या जेवणातून ८० जणांना विषबाधा..! आरोग्य विभागही संभ्रमात

लग्नात जेवण होताच काही नागरिकांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्या ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ केले. दिवसभरात शासकीय रुग्णालयात ६० व खासगी दवाखान्यात २० जणांनी उपचार घेतले होते.

author img

By

Published : May 15, 2019, 9:33 PM IST

Updated : May 15, 2019, 10:15 PM IST

लग्नाच्या जेवणातून ८० जणांना विषबाधा..!


लातुर - लग्नसमारंभात जेवण केल्याने तब्बल ८० नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना उदगीर तालुक्यातील तोंडारी गावात घडली आहे. मात्र, प्राथिमक उपचार केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना झालेली विषबाधा जेवणातून झाली की अन्य कारणामुळे या बाबत आरोग्य विभागही संभ्रामात आहे.

लग्नाच्या जेवणातून ८० जणांना विषबाधा.


तोंडार येथे एक लग्न समारंभ होता. या लग्नसमारंभात जेवणाच्या अनेक पंगती बसल्या होत्या. त्यानंतर लग्नसमारंभ पार पाडून वऱ्हाडी मंडळी नववधूला घेऊन मार्गस्थ झाले. मात्र, लग्नस्थळी जेवणकरून गेलेल्या काही नागरिकांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्या ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ केले. दिवसभरात शासकीय रुग्णालयात ६० व खासगी दवाखान्यात २० जणांनी उपचार घेतले होते.

लग्नातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचा अंदाज लावून आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्नघरी दाखल झाले. मात्र, तेथील जेवणाचे सर्व पदार्थ संपले होते. तसेच या लग्नात पिण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर करण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांना नेमकी कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली, याचे कारण अद्याप समजले नाही.

विषबाधा झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले असून रुग्णामध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश होता. आरोग्य अधिकारी डॉ. टिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करण्यात आले.


लातुर - लग्नसमारंभात जेवण केल्याने तब्बल ८० नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना उदगीर तालुक्यातील तोंडारी गावात घडली आहे. मात्र, प्राथिमक उपचार केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना झालेली विषबाधा जेवणातून झाली की अन्य कारणामुळे या बाबत आरोग्य विभागही संभ्रामात आहे.

लग्नाच्या जेवणातून ८० जणांना विषबाधा.


तोंडार येथे एक लग्न समारंभ होता. या लग्नसमारंभात जेवणाच्या अनेक पंगती बसल्या होत्या. त्यानंतर लग्नसमारंभ पार पाडून वऱ्हाडी मंडळी नववधूला घेऊन मार्गस्थ झाले. मात्र, लग्नस्थळी जेवणकरून गेलेल्या काही नागरिकांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्या ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ केले. दिवसभरात शासकीय रुग्णालयात ६० व खासगी दवाखान्यात २० जणांनी उपचार घेतले होते.

लग्नातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचा अंदाज लावून आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्नघरी दाखल झाले. मात्र, तेथील जेवणाचे सर्व पदार्थ संपले होते. तसेच या लग्नात पिण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर करण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांना नेमकी कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली, याचे कारण अद्याप समजले नाही.

विषबाधा झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले असून रुग्णामध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश होता. आरोग्य अधिकारी डॉ. टिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करण्यात आले.

Intro:लग्नाच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा..! ; आरोग्य विभागही संभ्रमात
लातुर : लग्न समारंभ पार पाडताच गावाचा एक - एक ग्रामस्थ थेट प्राथमिक उपचार केंद्र जवळ करू लागला होता. त्यामुळे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाली की आणखीन काही याबाबत आरोग्य विभागही संभ्रमात आहे. मात्र, दिसभरात उदगीर तालुक्यातील तोंडार येथील जवळपास 80 जणांनी प्राथमिक उपचार केंद्रात गर्दी केली होती.
Body:तोंडार येथे लग्नसमारंभ पार पाडून वऱ्हाडी मंडळी नववधूला घेऊन मार्गस्थ झाली आणि मागे गावकर्यांच्याही पंगती उठल्या. मात्र, जेवण होताच पोटदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. मग काय एका मागे एक करीत ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ केले. दिवसभरात शासकीय रुग्णालयात 60 व खाजगी दवाखान्यात 20 जणांनी उपचार घेतले होते. लग्न जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचे म्हणत आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्नघरी गेले असता सर्व जेवणाचे पदार्थ संपले होते तर पिण्यासाठी पाण्याच्या जारचा वापर केल्याने या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. परंतु दिवसभर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची रांग सुरू होती. प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून दिले जात होते. आरोग्य अधिकारी डॉ. टिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. Conclusion:रुग्णामध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांचाही समावेश होता.
Last Updated : May 15, 2019, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.