ETV Bharat / state

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक : सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू

author img

By

Published : Jan 15, 2021, 10:56 AM IST

राज्यात आज एकूण १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी राज्यात सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली. कोरोनाचे संकट ओसरत असताना निवडणूक आयोगाने राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे.

Kolhapur Gram Panchayat Election
कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक

कोल्हापूर - राज्यातला 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. 47 ग्रामपंचायतींनी यापूर्वीच बिनविरोध निवडणुकीची घोषणा केल्याने प्रत्यक्षात 386 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 386 गावांमध्ये आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतची अधिक माहिती दिली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर निवडणुका होत आहेत. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर प्रत्येक मतदाराचे स्क्रिनिंग केले जात आहे. शिवाय प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 720 सदस्यांची बिनविरोध निवड तर 'इतके' उमेदवार रिंगणात -

कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींमधील एकूण 720 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यातील उर्वरित 7 हजार 756 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी यांचे निकाल हाती येणार असून मतदारराजा आता कोणाला कौल देणार याबाबत उत्सुकता आहे.

जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद -

ग्रामपंचायत निवडणुका म्हटले की, साम-दाम-दंड-भेदचा वापर करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून गावातील पुढारी प्रयत्न करत असतात. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमधील चित्र पाहिले तर सकाळी आठ वाजण्याच्या अगोदर पासूनच नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या.

कोल्हापूर - राज्यातला 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. 47 ग्रामपंचायतींनी यापूर्वीच बिनविरोध निवडणुकीची घोषणा केल्याने प्रत्यक्षात 386 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 386 गावांमध्ये आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतची अधिक माहिती दिली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर निवडणुका होत आहेत. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर प्रत्येक मतदाराचे स्क्रिनिंग केले जात आहे. शिवाय प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 720 सदस्यांची बिनविरोध निवड तर 'इतके' उमेदवार रिंगणात -

कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींमधील एकूण 720 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यातील उर्वरित 7 हजार 756 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी यांचे निकाल हाती येणार असून मतदारराजा आता कोणाला कौल देणार याबाबत उत्सुकता आहे.

जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद -

ग्रामपंचायत निवडणुका म्हटले की, साम-दाम-दंड-भेदचा वापर करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून गावातील पुढारी प्रयत्न करत असतात. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमधील चित्र पाहिले तर सकाळी आठ वाजण्याच्या अगोदर पासूनच नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.