ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही : जिल्हाधिकारी दौलत देसाई

author img

By

Published : May 27, 2020, 9:12 AM IST

मंगळवारी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 378 आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकही स्थानिक रुग्ण नाही. या व्यक्तींना तपासणी नाक्यावरून कोव्हीड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई
जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर - येथे सामाजिक संसर्ग होऊ नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे स्वॅब घेण्याचे धोरण राबवत त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत सामाजिक संसर्ग झाला नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.

मंगळवारी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 378 आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकही स्थानिक रुग्ण नाही. तपासणी नाक्यावरून त्यांना कोव्हीड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी केले. संख्या जरी वाढलेली असली तरी, बाधित कोण आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रुग्णालयात ठेवून उपचार केले जातात. हे रुग्ण आपण शोधलेले आहेत. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, याची आपण काळजी घेत आहोत असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी म्हटले आहे.

उपचारानंतर बरे झालेल्या 21 जणांना आजअखेर घरी सोडण्यात आलेले आहे. तर, पुढच्या 10 दिवसात मोठ्या प्रमाणावर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 1 आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीचा तपासणी करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे दोनही मृत्यू धरले तरी जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्या रुग्णांना मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, कर्करोगाची व्याधी आहे, अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे अशा व्याधी असणाऱ्या कोरोनाबाधितांना सी.पी.आर. आणि डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही दौलत देसाई यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर - येथे सामाजिक संसर्ग होऊ नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे स्वॅब घेण्याचे धोरण राबवत त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत सामाजिक संसर्ग झाला नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.

मंगळवारी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 378 आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकही स्थानिक रुग्ण नाही. तपासणी नाक्यावरून त्यांना कोव्हीड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी केले. संख्या जरी वाढलेली असली तरी, बाधित कोण आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रुग्णालयात ठेवून उपचार केले जातात. हे रुग्ण आपण शोधलेले आहेत. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, याची आपण काळजी घेत आहोत असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी म्हटले आहे.

उपचारानंतर बरे झालेल्या 21 जणांना आजअखेर घरी सोडण्यात आलेले आहे. तर, पुढच्या 10 दिवसात मोठ्या प्रमाणावर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 1 आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीचा तपासणी करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे दोनही मृत्यू धरले तरी जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्या रुग्णांना मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, कर्करोगाची व्याधी आहे, अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे अशा व्याधी असणाऱ्या कोरोनाबाधितांना सी.पी.आर. आणि डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही दौलत देसाई यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.