ETV Bharat / state

मास्क नाही तर प्रवेश नाही : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम आता राज्यभरात

author img

By

Published : Nov 4, 2020, 12:18 PM IST

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात 'मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या मोहिमेचे कौतुक केले होते. त्यानुसार आता ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाने परिपत्रक प्रसिध्द केले आहे.

मास्क नाही तर प्रवेश नाही
मास्क नाही तर प्रवेश नाही

कोल्हापूर - 'मास्क नाही तर प्रवेश नाही' ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली अभिनव मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या मोहीमेचे कौतुक केले होते. त्यानुसार आता ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगरविकास विभागाने शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे कोल्हापूरची मोहीम राज्यात पाहायला मिळणार आहे.

'अशा' पद्धतीने मोहीम राबविण्यात आली -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 'मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली. यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. अशी ही अभिनव मोहीम गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात राबविण्यात येत आहे.

'या' नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई -

मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे आणि सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे आढळल्यास किंवा इतर सर्व नियमांचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. त्यानुसार आजपर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनव मोहिमेचे कौतुक -

या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे काही दिवसांपूर्वी फलक लावण्यात आले आहेत.

परिपत्रक प्रसिद्ध -

'मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे. नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शासन परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी. यामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करणे. जागोजागी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे. शिवाय मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेवून मोहीम राबविण्यात यावी. मोहीम राबविताना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा. जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. मास्क नाही प्रवेश नाही याबाबत विशेष मोहीम राबवावी. अशा सूचना या परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर - 'मास्क नाही तर प्रवेश नाही' ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली अभिनव मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या मोहीमेचे कौतुक केले होते. त्यानुसार आता ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगरविकास विभागाने शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे कोल्हापूरची मोहीम राज्यात पाहायला मिळणार आहे.

'अशा' पद्धतीने मोहीम राबविण्यात आली -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 'मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली. यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. अशी ही अभिनव मोहीम गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात राबविण्यात येत आहे.

'या' नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई -

मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे आणि सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे आढळल्यास किंवा इतर सर्व नियमांचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. त्यानुसार आजपर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनव मोहिमेचे कौतुक -

या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे काही दिवसांपूर्वी फलक लावण्यात आले आहेत.

परिपत्रक प्रसिद्ध -

'मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे. नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शासन परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी. यामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करणे. जागोजागी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे. शिवाय मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेवून मोहीम राबविण्यात यावी. मोहीम राबविताना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा. जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. मास्क नाही प्रवेश नाही याबाबत विशेष मोहीम राबवावी. अशा सूचना या परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.