कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील 43 हजार 478 तर महाराष्ट्रातील 15 हजार 580 असे 59 हजार 58 जण अखेर आज आपापल्या गावांना रवाना झाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमशील नागरिकांची सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये परराज्यातील सुमारे 43 हजार 478 स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले होते. यामध्ये उत्तरप्रदेशमधील 16 हजार 750 बिहारमधील 11 हजार 504 मध्यप्रदेशमधील 2 हजार 650, झारखंडमधील 2 हजार 138, छत्तीसगडमधील 275, राजस्थानमधील 3 हजार 620, गुजरातमधील 302, गोवामधील 490, कर्नाटकमधील 3 हजार 398, आंध्रप्रदेशमधील 94, तेलंगनामधील 178, केरळमधील 74, तामिळनाडूमधील 369, ओरीसामधील 955, पश्चिम बंगालमधील 277, दिल्लीमधील 40, पूर्वेकडील राज्यातील 193 आणि इतर 171 असे 43 हजार 478 जण आज कोल्हापूरातून रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील 15 हजार 580 जण लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकले होते. यामध्ये मुंबई शहरातील 110, मुंबई उपनगरमधील 16, ठाणेमधील 605, पालघरमधील 118, रायगडमधील 167, रत्नागिरीमधील 644, सिंधुदुर्गमधील 593, सातारामधील 706, सांगलीमधील 1852, सोलापूरमधील 2345, पुण्यामधील 2373, नाशिकमधील 288, धुळे 264, जळगावमधील 164, नंदुरबारमधील 168, अहमदनगरमधील 1 हजार 138, औरंगाबादमधील 108, बीड 339, जालनामधील 88, उस्मानाबादमधील 775, लातुरमधील 1 हजार 30, नांदेडमधील 272, परभणीमधील 435, हिंगोलीतील 82, आमरावतीमधील 36, अकोलामधील 91, बुलडाणामधील 79, यवतमाळमधील 160, वाशिम 104, नागपूरमधील 57, भंडारा 36, वर्धा 46, गडचिरोली 37, चंद्रपूरमधील 90 आणि गोंदियामधील 114 असे एकूण 15 हजार 580 जण आजपर्यंत रवाना झाले आहेत. सर्व मजूर मिळून कोल्हापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत 59 हजार 58 नागरिक आपापल्या गावी रवाना झाले आहेत. .