ETV Bharat / state

'ग्राउंड रिपोर्ट' : हंडाभर पाण्यासाठी सुर्वेवाडीच्या महिलांची फरफट; पाणीदार जिल्ह्यातलं कटू वास्तव

author img

By

Published : Apr 30, 2019, 5:22 AM IST

स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळ झालाय तरीही गावातील परिस्थिती मात्र जैसे थे असून नागरिकांना आजही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. वाडीतील सर्वच नागरिकांनी पाण्यासाठी आवाज उठवून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला.

हंडाभर पाण्यासाठी सुर्वेवाडीच्या महिलांची फरफट

कोल्हापूर - 'माझं लग्न झाल्यावर मी इथं नसेल पण माझ्या भावांचं काय? सगळीकडं सोयीसुविधा आहेत पण आमची वाडी दुष्काळग्रस्तच' एका मुलीची ही बोलकी प्रतिक्रिया आहे पाणीदार जिल्हा समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुर्वेवाडीतील. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची भीषण अवस्था आहे. याच वाडीत उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ज्या पाणीदार जिल्ह्यात बाराही महिने भरभरून पाणी असते त्याच जिल्ह्यातील लपलेले हे जळजळीत वास्तव आहे. हे वास्तव मांडण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी पोहोचले थेट सुर्वेवाडीमध्ये. वाचा हा 'ग्राउंड रिपोर्ट'

सुर्वेवाडी. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील डोंगररांगेत वसलेली एक छोटीशी वाडी. बारा वाड्यांची मिळून बनलेल्या वाघवे ग्रुप ग्रामपंचायतमधील जेमतेम १६० लोकसंख्या, ११० मतदार असलेली आणि किल्ले पन्हाळागडच्या पायथ्याशी असणारी ही वाडी. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळ झालाय तरीही गावातील परिस्थिती मात्र जैसे थे असून नागरिकांना आजही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. वाडीतील सर्वच नागरिकांनी पाण्यासाठी आवाज उठवून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला.

'ग्राउंड रिपोर्ट'

प्रत्येक निवडणुकीला लोकप्रतिनिधी वाडीमध्ये येतात. पाण्याची, रस्त्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन देतात आणि निघून जातात पण निवडणुकीनंतर तेच लोकप्रतिनिधी शेजारहून निघून गेले तरी ओळख दाखवत नाहीत, असे येथील वयोवृद्ध महिला सांगतात.
विशेष म्हणजे वाडीतील शाळकरी मुलंही सकाळी शाळेला जाण्यापूर्वी आणि सायंकाळी परत आल्यानंतर विहिरीवर पाणी आणण्यासाठी नंबर लावत असतात. त्यांची ही दैनंदिनीच झाली आहे. आजूबाजूच्या गावात सर्व सोयीसुविधा आहेत. मात्र आमची वाडी मात्र दुष्काळग्रस्तच असल्याची भावना येथील शाळकरी मुली व्यक्त करतात.

सायपन पद्धतीने पाणीपुरवठा योजनेद्वारे एका टाकीत झऱ्याचं पाणी काही महिने येतं पण उन्हाळ्यात हे सुद्धा पाणी यायचं बंद होतं. पुढचे चार महिने वाडीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

वाडीतील एकमेव विहिरीच्या पाण्यावर संपूर्ण वाडी अवलंबून आहे. त्या विहिरीने सुद्धा तळ गाठल्यानं आता छोट्या भांड्यांमधून पाणी भरावं लागतं. रात्र रात्र नंबर लावून याठिकाणी पाण्यासाठी महिलांना बसावं लागतं. हंडाभर पाण्यासाठी होणारी फरफट कोणत्याच लोकप्रतिनिधींना आजपर्यंत का दिसली नसेल? असा सवालही येथील महिला उपस्थित करतात.

सुर्वेवाडीसारखीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी आहे. सुर्वेवाडी दरवर्षी तालुका पाणी टंचाईच्या आराखड्यात असते. पण प्रशासनाकडून एक टँकर पाणी सुद्धा पाठवले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. पण सुर्वेवाडीच्या पाणी टंचाईच्या या गंभीर समस्येकडे पाहण्यासाठी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना वेळ मिळणार का? आणि किमान दोन दिवसांआड का असेना पाण्याचा टँकर पुरवणार का ? हाच सर्वांसमोरील मोठा प्रश्न आहे.

कोल्हापूर - 'माझं लग्न झाल्यावर मी इथं नसेल पण माझ्या भावांचं काय? सगळीकडं सोयीसुविधा आहेत पण आमची वाडी दुष्काळग्रस्तच' एका मुलीची ही बोलकी प्रतिक्रिया आहे पाणीदार जिल्हा समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुर्वेवाडीतील. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची भीषण अवस्था आहे. याच वाडीत उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ज्या पाणीदार जिल्ह्यात बाराही महिने भरभरून पाणी असते त्याच जिल्ह्यातील लपलेले हे जळजळीत वास्तव आहे. हे वास्तव मांडण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी पोहोचले थेट सुर्वेवाडीमध्ये. वाचा हा 'ग्राउंड रिपोर्ट'

सुर्वेवाडी. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील डोंगररांगेत वसलेली एक छोटीशी वाडी. बारा वाड्यांची मिळून बनलेल्या वाघवे ग्रुप ग्रामपंचायतमधील जेमतेम १६० लोकसंख्या, ११० मतदार असलेली आणि किल्ले पन्हाळागडच्या पायथ्याशी असणारी ही वाडी. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळ झालाय तरीही गावातील परिस्थिती मात्र जैसे थे असून नागरिकांना आजही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. वाडीतील सर्वच नागरिकांनी पाण्यासाठी आवाज उठवून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला.

'ग्राउंड रिपोर्ट'

प्रत्येक निवडणुकीला लोकप्रतिनिधी वाडीमध्ये येतात. पाण्याची, रस्त्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन देतात आणि निघून जातात पण निवडणुकीनंतर तेच लोकप्रतिनिधी शेजारहून निघून गेले तरी ओळख दाखवत नाहीत, असे येथील वयोवृद्ध महिला सांगतात.
विशेष म्हणजे वाडीतील शाळकरी मुलंही सकाळी शाळेला जाण्यापूर्वी आणि सायंकाळी परत आल्यानंतर विहिरीवर पाणी आणण्यासाठी नंबर लावत असतात. त्यांची ही दैनंदिनीच झाली आहे. आजूबाजूच्या गावात सर्व सोयीसुविधा आहेत. मात्र आमची वाडी मात्र दुष्काळग्रस्तच असल्याची भावना येथील शाळकरी मुली व्यक्त करतात.

सायपन पद्धतीने पाणीपुरवठा योजनेद्वारे एका टाकीत झऱ्याचं पाणी काही महिने येतं पण उन्हाळ्यात हे सुद्धा पाणी यायचं बंद होतं. पुढचे चार महिने वाडीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

वाडीतील एकमेव विहिरीच्या पाण्यावर संपूर्ण वाडी अवलंबून आहे. त्या विहिरीने सुद्धा तळ गाठल्यानं आता छोट्या भांड्यांमधून पाणी भरावं लागतं. रात्र रात्र नंबर लावून याठिकाणी पाण्यासाठी महिलांना बसावं लागतं. हंडाभर पाण्यासाठी होणारी फरफट कोणत्याच लोकप्रतिनिधींना आजपर्यंत का दिसली नसेल? असा सवालही येथील महिला उपस्थित करतात.

सुर्वेवाडीसारखीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी आहे. सुर्वेवाडी दरवर्षी तालुका पाणी टंचाईच्या आराखड्यात असते. पण प्रशासनाकडून एक टँकर पाणी सुद्धा पाठवले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. पण सुर्वेवाडीच्या पाणी टंचाईच्या या गंभीर समस्येकडे पाहण्यासाठी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना वेळ मिळणार का? आणि किमान दोन दिवसांआड का असेना पाण्याचा टँकर पुरवणार का ? हाच सर्वांसमोरील मोठा प्रश्न आहे.

Intro:बाईट पासून बातमीची सुरुवात करा

बाईट 1 : काजल सुर्वे

अँकर : माझं लग्न झाल्यावर मी इथे नसेल पण माझ्या भावांचं काय ? सगळीकडं सोयी सुविधा पण आमची वाडी दुष्काळग्रस्तच.. या मुलगीची ही बोलकी प्रतिक्रिया आहे पाणीदार जिल्हा समजल्या जाणाऱ्या कोल्हापुर जिल्ह्यातल्या सुर्वेवाडीतील. सुर्वेवाडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची भीषण अवस्था आहे. याच वाडीत उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ज्या पाणीदार जिल्ह्यात बाराही महिने भरभरून पाणी असतं त्याच जिल्ह्यातलं लपलेलं हे जळजळीत वास्तव.. इथलं हे वास्तव मांडण्यासाठी ईटीव्ही भारतचे आमचे प्रतिनिधी पोहोचले थेट सुर्वेवाडीमध्ये....
Body:व्हीओ १ : सुर्वेवाडी... कोल्हापूरातल्या पन्हाळा तालुक्यातील डोंगररांगेत वसलेली एक छोटीशी वाडी... बारा वाड्यांची मिळून बनलेल्या वाघवे ग्रुप ग्रामपंचायतमधील जेमतेम १६० लोकसंख्या, ११० मतदार असलेली आणि किल्ले पन्हाळागडच्या पायथ्याशी असणारी ही वाडी... स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळ झालाय तरीही गावातील परिस्थिती मात्र जैसेथे असून नागरिकांना याच मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे.. गावातील बहुतांश सर्वांनीच प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.. पण वाडीतील सर्वच नागरिकांनी पाण्यासाठी आवाज उठवून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर भहिष्कार घातला.. प्रत्येक निवडणुकीला लोकप्रतिनिधी वाडीमध्ये येतात पाण्याची, रस्त्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन देतात आणि निघून जातात पण निवडणुकीनंतर तेच लोकप्रतिनिधी शेजारहून निघून गेले तरी ओळख दाखवत नाहीत असे येथील वयोवृद्ध महिला सांगतात...

बाईट 2 : गंगुबाई सुर्वे, ग्रामस्थ

व्हीओ 2 : विशेष म्हणजे वाडीतील शाळकरी मुलं सुद्धा सकाळी शाळेला जाण्यापूर्वी आणि सायंकाळी शाळेतून परत आल्यानंतर विहिरीवर पाणी आणण्यासाठी नंबर लावत असतात.. त्यांची ही दैनंदिनीच झाली आहे... आजूबाजूच्या गावात सर्व सोयीसुविधा आहेत.. मात्र आमची वाडी मात्र दुष्काळग्रस्तच असल्याची भावना येथील शाळकरी मुली व्यक्त करतात...

बाईट 3: काजल सुर्वे (शाळकरी मुलगी)
बाईट 4 : अनुराधा सुर्वे (शाळकरी मुलगी)

व्हीओ 3 : सायपन पद्धतीने पाणी पुरवठा योजनेद्वारे एका टाकीत झऱ्याचं पाणी काही महिने येतं पण उन्हाळ्यात हे सुद्धा पाणी यायचं बंद होत.. पुढचे चार महिने वाडीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते..

बाईट 5 : रघुनाथ सुर्वे (ग्रामस्थ)

व्हीओ 4 : वाडीतील या एकमेव विहिरीच्या पाण्यावर संपूर्ण वाडी अवलंबून आहे त्या विहिरीने सुद्धा तळ गाठल्यानं आता छोट्या भांड्यांमधून पाणी भराव लागत. रात्र रात्र नंबर लावून याठिकाणी पाण्यासाठी महिलांना बसावं लागत. एका छोट्याश्या हंडाभर पाण्यासाठी होणारी फरपट कोणत्याच लोकप्रतिनिधींना आजपर्यंत का दिसली नसेल ? असा सवालही येथील महिला उपस्थित करतात..

बाईट 5 : शोभा सुर्वे (ग्रामस्थ)

व्हीओ 6 : सुर्वेवाडी सारखीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी आहे... सुर्वेवाडी दरवर्षी तालुका पाणी टंचाईच्या आराखड्यात असते.. पण प्रशासनाकडून एक टँकर पाणी सुद्धा पाठवले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. पण सुर्वेवाडीच्या पाणी टंचाईच्या या गंभीर समस्येकडे पाहण्यासाठी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना वेळ मिळणार का ? आणि किमान दोन दिवस आड का असेना पाण्याचा टँकर तरी पुरवणार का ? हाच सर्वांसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे... (ब्युरो रिपोर्ट शेखर पाटील ईटीव्ही भारत कोल्हापूर)

Play Wkt : शेखर पाटीलConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.