कोल्हापूर - महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा यासह कोरोना स्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.
बळीराजाच्या मदतीसाठी हे सरकार बहाणे शोधते -
यावेळी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे, असेही उपाध्ये यांनी म्हंटले.
'वर्ष वायाच गेले; सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले हे तर कुचकामी सरकार' - वीजबिल माफ करण्यात सरकार अपयशी
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विविध मुद्यांवरून महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना मदत, महिला सुरक्षा या सर्व घोषणा हवेतच विरल्या असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला आहे.
कोल्हापूर - महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा यासह कोरोना स्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.
बळीराजाच्या मदतीसाठी हे सरकार बहाणे शोधते -
यावेळी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे, असेही उपाध्ये यांनी म्हंटले.