ETV Bharat / state

कोल्हापुराला पुराचा फटका: 7 जणांचा मृत्यू; 14 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

author img

By

Published : Jul 24, 2021, 11:40 PM IST

Updated : Jul 25, 2021, 12:00 AM IST

जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकड्या दाखल झाल्या आहे. बचाव कार्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.

सतेज पाटील
सतेज पाटील

कोल्हापूर - कोल्हापुरात यावर्षी 2019 पेक्षाही भयानक अशी महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये झालेल्या विविध दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल 14 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी असलेल्या 'कॅम्प'मध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील पुरस्थितीचा आज पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला, त्यांनतर त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती दिली.

14 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

हेही वाचा-तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री

कोल्हापूर जिल्हा पूरपरिस्थिती सद्यस्थिती -

  • स्थलांतर एकूण : 76 हजार 26 व्यक्तींचे स्थलांतर त्यातील 67 हजार 111 नागरिकांचे आपापल्या नातेवाईकांकडे स्थलांतर झाले आहे. निवारा कक्षेत 10 हजारांच्या आसपास नागरिक स्थलांतरित झाले आहेत.
  • कोविड रूग्ण- छावणीमध्ये स्थलांतरीत - 42
  • स्थलांतरीत जनावरे- 25 हजार 573
  • पूरबाधीत गावे - 366
  • जीवित हानी - 7 व्यक्ती
  • वित्त हानी - लहान मोठया एकूण 27 जनावरांचा मृत्यू
  • गर्भवती महिला - 90 महिलांचे स्थलांतर करण्यात आले. यापैकी 4 महिलांची यशस्वीरित्या प्रसूती झाली आहे.
  • महावितरण - जिल्हयातील 10 उपकेंद्रे बंद आहेत. यात पूर्णत: बाधीत 111 गावे असून अंशत: बाधीत 34 गावे आहेत.
  • वीजपुरवठा परिणाम : 1 लाख 12 हजार 961 ग्राहकांच्या वीजपुरवठयावर परिणाम झाला असून 75 हजार वीजवाहिन्या बंद झाल्या आहेत.
  • बंद मार्ग - राष्ट्रीय महामार्ग (NH4) शिरोली पुलाजवळ पाण्यामुळे बंद आहेत. जिल्ह्यातील एकूण राज्य मार्ग 25 पैकी 17 राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत. तर 15 पूल पाण्याखाली आहेत.
  • प्रमुख जिल्हा मार्ग - 112 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 55 मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत. तर 32 पूल पाण्याखाली आहेत

हेही वाचा-Maharashtra Flood: राज्यात अतिवृष्टीमुळे 76 जणांचा मृत्यू, 59 जण अद्याप बेपत्ता, आतापर्यंत 90 हजार लोकांना वाचवले

पाऊस - धरणक्षेत्र, आजपर्यंत झालेला पाऊस - याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे :
राधानगरी- 2600- 1900
तुळशी- 2844- 1098
कासारी- 2717- 1797
कुंभी- 4352- 3597
कोल्हापूर- 943- 427

नळ पाणीपुरवठा योजना (केंद्र)- 399 बंद असून आतापर्यंत 3 चालू झाल्या आहेत. येत्या 24 तासांत 38 तर 48 तासांत 82 सुरू होणार आहेत. येत्या 5 दिवसात 276 सुरू करण्याचे नियोजन केले आहे. जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकड्या दाखल झाल्या आहे. बचाव कार्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे. अतिवृष्टीने बाधीत कुटूंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. 24 हजार लाभार्थ्यांना 1 कोटी 21 लाख 21 हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.

कोल्हापूर - कोल्हापुरात यावर्षी 2019 पेक्षाही भयानक अशी महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये झालेल्या विविध दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल 14 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी असलेल्या 'कॅम्प'मध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील पुरस्थितीचा आज पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला, त्यांनतर त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती दिली.

14 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

हेही वाचा-तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री

कोल्हापूर जिल्हा पूरपरिस्थिती सद्यस्थिती -

  • स्थलांतर एकूण : 76 हजार 26 व्यक्तींचे स्थलांतर त्यातील 67 हजार 111 नागरिकांचे आपापल्या नातेवाईकांकडे स्थलांतर झाले आहे. निवारा कक्षेत 10 हजारांच्या आसपास नागरिक स्थलांतरित झाले आहेत.
  • कोविड रूग्ण- छावणीमध्ये स्थलांतरीत - 42
  • स्थलांतरीत जनावरे- 25 हजार 573
  • पूरबाधीत गावे - 366
  • जीवित हानी - 7 व्यक्ती
  • वित्त हानी - लहान मोठया एकूण 27 जनावरांचा मृत्यू
  • गर्भवती महिला - 90 महिलांचे स्थलांतर करण्यात आले. यापैकी 4 महिलांची यशस्वीरित्या प्रसूती झाली आहे.
  • महावितरण - जिल्हयातील 10 उपकेंद्रे बंद आहेत. यात पूर्णत: बाधीत 111 गावे असून अंशत: बाधीत 34 गावे आहेत.
  • वीजपुरवठा परिणाम : 1 लाख 12 हजार 961 ग्राहकांच्या वीजपुरवठयावर परिणाम झाला असून 75 हजार वीजवाहिन्या बंद झाल्या आहेत.
  • बंद मार्ग - राष्ट्रीय महामार्ग (NH4) शिरोली पुलाजवळ पाण्यामुळे बंद आहेत. जिल्ह्यातील एकूण राज्य मार्ग 25 पैकी 17 राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत. तर 15 पूल पाण्याखाली आहेत.
  • प्रमुख जिल्हा मार्ग - 112 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 55 मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत. तर 32 पूल पाण्याखाली आहेत

हेही वाचा-Maharashtra Flood: राज्यात अतिवृष्टीमुळे 76 जणांचा मृत्यू, 59 जण अद्याप बेपत्ता, आतापर्यंत 90 हजार लोकांना वाचवले

पाऊस - धरणक्षेत्र, आजपर्यंत झालेला पाऊस - याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे :
राधानगरी- 2600- 1900
तुळशी- 2844- 1098
कासारी- 2717- 1797
कुंभी- 4352- 3597
कोल्हापूर- 943- 427

नळ पाणीपुरवठा योजना (केंद्र)- 399 बंद असून आतापर्यंत 3 चालू झाल्या आहेत. येत्या 24 तासांत 38 तर 48 तासांत 82 सुरू होणार आहेत. येत्या 5 दिवसात 276 सुरू करण्याचे नियोजन केले आहे. जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकड्या दाखल झाल्या आहे. बचाव कार्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे. अतिवृष्टीने बाधीत कुटूंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. 24 हजार लाभार्थ्यांना 1 कोटी 21 लाख 21 हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.

Last Updated : Jul 25, 2021, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.