ETV Bharat / state

जालन्यात वाहतूक व्यवस्थेची 'ऐसी की तैसी', वसुली मात्र जोरात - जालना वाहतूक पोलीस विभाग

जालना शहरात रस्त्यावर मध्यभागी उभी असलेली जनावारे आणि त्यामुळे होत असलेल्या अपघातांकडे वाहतूक पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शहर वाहतूक शाखेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

दंड वसुली करताना वाहतूक पोलीस
author img

By

Published : Sep 27, 2019, 8:45 PM IST

जालना - शहर वाहतूक फक्त नावापुरतीच राहिली असून शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत. वाहतूक शाखेतर्फे वसुली मात्र जोरात सुरू आहे.

जालना शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत
शहरात वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्यासह 50 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहनचालकांकडून दंड कसा वसूल करण्यात करता येईल यावरच जास्त भर देतात.


शहरातील मामा चौकात अस्ताव्यस्त उभे असलेले रिक्षा, भाजी-फळवाल्यांचे गाडे यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. विक्षिप्त हावभाव करून हे हातगाडीवाले महिलांचा मानसिक छळ करतात. शहर वाहतूक पोलिसांसाठी असलेल्या निवाऱ्यांमध्ये दुसरीच दुकाने थाटली गेली आहेत.रस्त्यावर मध्यभागी उभी असलेली जनवारे आणि त्यामुळे होत असलेल्या अपघातांकडे वाहतूक पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या शहर वाहतूक शाखेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

हेही वाचा - मराठवाडा : वर्चस्वासाठी सेना-भाजपची रस्सीखेच, तर आघाडीची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड

सर्वे नंबर 488 मध्ये न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि पोलीस अधीक्षक कार्यालय देखील आहे. अशा मुख्य रस्त्यावर मुक्तपणे जनावरे मध्यभागी रस्ता दुभाजकाप्रमाणे उभी असतात.

जालना - शहर वाहतूक फक्त नावापुरतीच राहिली असून शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत. वाहतूक शाखेतर्फे वसुली मात्र जोरात सुरू आहे.

जालना शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत
शहरात वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्यासह 50 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहनचालकांकडून दंड कसा वसूल करण्यात करता येईल यावरच जास्त भर देतात.


शहरातील मामा चौकात अस्ताव्यस्त उभे असलेले रिक्षा, भाजी-फळवाल्यांचे गाडे यामुळे महिलाही त्रस्त झाल्या आहेत. विक्षिप्त हावभाव करून हे हातगाडीवाले महिलांचा मानसिक छळ करतात. शहर वाहतूक पोलिसांसाठी असलेल्या निवाऱ्यांमध्ये दुसरीच दुकाने थाटली गेली आहेत.रस्त्यावर मध्यभागी उभी असलेली जनवारे आणि त्यामुळे होत असलेल्या अपघातांकडे वाहतूक पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे या शहर वाहतूक शाखेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

हेही वाचा - मराठवाडा : वर्चस्वासाठी सेना-भाजपची रस्सीखेच, तर आघाडीची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड

सर्वे नंबर 488 मध्ये न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि पोलीस अधीक्षक कार्यालय देखील आहे. अशा मुख्य रस्त्यावर मुक्तपणे जनावरे मध्यभागी रस्ता दुभाजकाप्रमाणे उभी असतात.

Intro:जालना शहर वाहतूक फक्त नावापुरतीच राहिली असून शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत .वाहतूक शाखेसाठी असलेलेच निवारे वाहतुकीला अडथळा ठरत असून या शाखेची वसुली मात्र जोरात चालू आहे.


Body:जालना शहरात वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्यासह सुमारे 50 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहनचालकांकडून दंड कसा वसूल करण्यात करता येईल यावरच जास्त भर देत आहेत. रस्त्यावर मध्यभागी उभी असलेली जनवारे आणि त्यामुळे होत असलेल्या अपघातकडे तसेच रस्त्यावरील हात गाड्यांचे वाढते प्रमाण ,मध्य रस्त्यात उभ्या असलेल्या हातगाड्या, यांच्याकडे हे अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत . दोन-तीन महिन्यानंतर प्रसारमाध्यमांना हाताशी धरून सिग्नल बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार दुभाजकाची दुरुस्ती करणार असे नवीन काहीतरी सांगून जनतेची दिशाभूल करतात .परंतु रस्त्यावर असलेल्या हात गाड्यांमुळे दुचाकी वाल्यांनी वाहन लावायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे ?त्यामुळे हात गाडीवाल्यांना दंड न करता रस्त्यावर गाडी लावली म्हणून दुचाकीस्वारांना दंड केला जात आहे ,यामुळे या शहर वाहतूक शाखे विषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप .आहे मामा चौकात अस्ताव्यस्त असलेले उभे ,रिक्षा भाजीवाल्यांचे, फळवाल्यांचे गाडे ,यामुळेच महिलाही त्रस्त झाल्या आहेत .ठराविक हावभाव करून हे हातगाडीवाले महिलांचा मानसिक छळ करतात, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांसाठी असलेल्यां निवाऱ्यामध्ये दुसरी दुकाने थाटली गेली आहेत. याच सोबत मस्तगड ,गांधीचमन, या परिसरात जनावरांचा मुक्त संचार आहे .मुथा बिल्डिंग परिसरात चपला, बुटांची आणि तयार कपड्यांनी एक मोठे मार्केटच तयार केले आहे. या मार्केट समोर उभे राहूनच पोलिस वाहन पकडतात मात्र या अनधिकृत रस्त्यावर उभारलेल्या दुकानांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात हे तर सोडाच , सर्वे नंबर 488 मध्ये न्यायालय, जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालय, आणि जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय पोलीस अधिकारी असलेले पोलीस अधीक्षक हे कार्यालय देखील आहे .अशा या मुख्य रस्त्यावर मुक्तपणे जनावरे मध्यभागी रस्ता दुभाजका प्रमाणे उभे आहेत. हा महामार्ग असल्यामुळे इथे कधीही अपघात होऊ शकतो .मात्र गावाच्या बाहेरच पोलीस अधीक्षक कार्यालय आणि गावाच्या बाहेरच पोलीस अधिकाऱ्यांची निवासस्थाने त्यामुळे या अधिकाऱ्यांना गावातील नागरिकांच्या अडीअडचणी शी काहीच देणे घेणे नाही .वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही "मी लक्ष घालतो"यापलिकडे हे अधिकारी काहीच करायला तयार नाहीत त्याच सोबत "वरिष्ठांनी सांगितले तसे ऐकावे लागते" हे एक या अधिकाऱ्यांचे ठरलेले उत्तर आहे. त्यामुळे नागरिकांनी न्याय मागावा तर कोणाकडे अशी परिस्थिती आली आहे .सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत शहरात शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ आहे. त्यामुळे या सायकल स्वार विद्यार्थ्यांना रस्त्यावरील दुकाने आणि मध्यभागी बसलेल्या जनावरांमुळे आतोनात त्रास होत आहे. पोलीस अधीक्षक देखील वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे काम करतो असे सांगत आहेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.