ETV Bharat / state

खून प्रकरणातील नऊ वर्षांपासून फरार असलेला आरोपीला पोलिसांच्या अटकेत

author img

By

Published : Dec 26, 2020, 7:33 PM IST

घनसावंगी तालुक्यातील दही येते 2003 मध्ये झालेल्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी 2011 मध्ये रजा घेऊन आपल्या गावी आला होता. मात्र, त्यानंतर तो कारागृहात गेलाच नाही. तब्बल 9 वर्षांनंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी काशिनाथ
आरोपी काशिनाथ

जालना - घनसावंगी तालुक्यातील दही येथे सन 2003 मध्ये गायरान जमिनीवरून खून झाला होता. या खुनातील आरोपी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. हा आरोपी 2011 मध्ये रजा घेऊन आल्यानंतर फरार झाला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांनंतर शनिवारी (दि. 26 डिसें.) अटक केली आहे.

रजेवर आला तो परत गेलाच नाही

घनसावंगी तालुक्यातील दाही येथे सन 2003 मध्ये गायरान जमिनीवरून वाद झाले होते. या प्रकरणात हाणामारी होऊन खूनही झाला होता. या खुनातील आरोपी काशिनाथ पुंजाराम लहाने (वय 58 वर्षे) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहामध्ये ही शिक्षा भोगत असताना त्याला 2011मध्ये पॅरोल रजा मंजूर करण्यात आली. यादरम्यान तो दाही या आपल्या गावी आला. मात्र, नंतर परत गेलाच नाही. तेव्हापासून आरोपी विविध ठिकाणी आपली नावे बदलून राहत होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू होता शोध

न्यायालयाच्या आदेशानुसार या आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना या आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काशिनाथ पुंजाराम लहाने याला दाही या गावातून आज (शनिवार) ताब्यात घेतले.

हेही वाचा - मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका - विनायक मेटे

हेही वाचा - कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाताळ उत्साहात साजरा

जालना - घनसावंगी तालुक्यातील दही येथे सन 2003 मध्ये गायरान जमिनीवरून खून झाला होता. या खुनातील आरोपी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. हा आरोपी 2011 मध्ये रजा घेऊन आल्यानंतर फरार झाला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांनंतर शनिवारी (दि. 26 डिसें.) अटक केली आहे.

रजेवर आला तो परत गेलाच नाही

घनसावंगी तालुक्यातील दाही येथे सन 2003 मध्ये गायरान जमिनीवरून वाद झाले होते. या प्रकरणात हाणामारी होऊन खूनही झाला होता. या खुनातील आरोपी काशिनाथ पुंजाराम लहाने (वय 58 वर्षे) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहामध्ये ही शिक्षा भोगत असताना त्याला 2011मध्ये पॅरोल रजा मंजूर करण्यात आली. यादरम्यान तो दाही या आपल्या गावी आला. मात्र, नंतर परत गेलाच नाही. तेव्हापासून आरोपी विविध ठिकाणी आपली नावे बदलून राहत होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू होता शोध

न्यायालयाच्या आदेशानुसार या आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना या आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काशिनाथ पुंजाराम लहाने याला दाही या गावातून आज (शनिवार) ताब्यात घेतले.

हेही वाचा - मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका - विनायक मेटे

हेही वाचा - कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाताळ उत्साहात साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.