ETV Bharat / state

जालन्यातील जामवाडीत भीषण पाणी टंचाई; पाण्यासाठी नागरिकांची जीव धोक्यात

author img

By

Published : Jun 23, 2019, 6:17 PM IST

जालन्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर जामवाडी हे गाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा येथे मोठा प्रकल्प आहे. गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. प्रकल्पाच्या मध्यभागी मोठी विहीर असून या विहिरीत देखील पाणी नाही. परंतु गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते.

पाण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात

जालना - जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जामवाडीच्या नागरिकांना कळशीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेष म्हणजे विहिरीतील पाणी भरण्यासाठी लहान मुलींचा वापर केला जात आहे. या विहिरीवरील लोखंडी कठडे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसे नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

people-are-facing-problems-to-get-water-due-to-water-crisis-1
पाण्यासाठी संघर्ष


जालन्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर जामवाडी हे गाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा येथे मोठा प्रकल्प आहे. असे असतानाही गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. प्रकल्पाच्या मध्यभागी मोठी विहीर असून या विहिरीत देखील पाणी नाही. परंतु गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते. दोन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर हंडाभर पाणी मिळते. मग गावकरी जसे लागेल तसे पाणी उपसून घरी घेऊन जातात.

नागरिकांना जीव मूठीत धरून विहीरातून पाणी काढावे लागत आहे

गाव आणि लघु पाटबंधाऱयाच्या प्रकल्पामध्ये दोन किलोमीटरचे अंतर आहे. त्यातच प्रकल्पाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीने देखील तळ गाठलेला आहे. त्यामुळे बहुतांशी महिला कपडे धुण्यासाठी पाणी घरी नेता विहिरीवरच कपडे घेऊन येतात. कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी उपसण्यासाठी घरातील लहान मुलींनाही सोबत आणले जाते.

ही विहीर सुमारे दोनशे फूट खोल आहे. पाणी उपसण्यासाठी उभे राहता यावे म्हणून विहिरीवर लोखंडी कठडे टाकण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे कठडे पुरेसे नसल्याने पाणी उपसताना तोल जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु पाणीच उपलब्ध होत नसेल तर दुसरा पर्याय काय? यामुळे या गावचे नागरिक जीव धोक्यात घालून पाणी काढत आहेत.

जालना - जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जामवाडीच्या नागरिकांना कळशीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेष म्हणजे विहिरीतील पाणी भरण्यासाठी लहान मुलींचा वापर केला जात आहे. या विहिरीवरील लोखंडी कठडे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसे नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

people-are-facing-problems-to-get-water-due-to-water-crisis-1
पाण्यासाठी संघर्ष


जालन्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर जामवाडी हे गाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा येथे मोठा प्रकल्प आहे. असे असतानाही गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. प्रकल्पाच्या मध्यभागी मोठी विहीर असून या विहिरीत देखील पाणी नाही. परंतु गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते. दोन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर हंडाभर पाणी मिळते. मग गावकरी जसे लागेल तसे पाणी उपसून घरी घेऊन जातात.

नागरिकांना जीव मूठीत धरून विहीरातून पाणी काढावे लागत आहे

गाव आणि लघु पाटबंधाऱयाच्या प्रकल्पामध्ये दोन किलोमीटरचे अंतर आहे. त्यातच प्रकल्पाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीने देखील तळ गाठलेला आहे. त्यामुळे बहुतांशी महिला कपडे धुण्यासाठी पाणी घरी नेता विहिरीवरच कपडे घेऊन येतात. कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी उपसण्यासाठी घरातील लहान मुलींनाही सोबत आणले जाते.

ही विहीर सुमारे दोनशे फूट खोल आहे. पाणी उपसण्यासाठी उभे राहता यावे म्हणून विहिरीवर लोखंडी कठडे टाकण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे कठडे पुरेसे नसल्याने पाणी उपसताना तोल जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु पाणीच उपलब्ध होत नसेल तर दुसरा पर्याय काय? यामुळे या गावचे नागरिक जीव धोक्यात घालून पाणी काढत आहेत.

Intro:जामवाडी च्या नागरिकांना कळशीभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे .विशेष म्हणजे या कामासाठी लहान मुलींचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.


Body:जालन्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर जामवाडी हे गाव आहे. लघु पाटबंधारे विभागाचा येथे मोठा प्रकल्प आहे. असे असतानाही गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. प्रकल्पाच्या मध्यभागी मोठी विहीर असूनही या विहिरीत देखील पाणी नाही .परंतु गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या विहिरीत टँकरचे पाणी सोडले जाते आणि मग गावकरी जसे लागेल तसे पाणी उपसून घरी घेऊन जातात .गाव आणि या प्रकल्पामध्ये दोन किलोमीटरचे अंतर आहे .दोन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर हंडाभर पाणी मिळते त्यातच प्रकल्पाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीने देखील तळ गाठलेला आहे त्यामुळे बहुतांशी महिला कपडे धुण्यासाठी पाणी घरी न येता कपडेच इथे घेऊन येतात आणि धुण्यासाठी लागणारे पाणी उपसण्यासाठी घरातील लहान मुलींनाही ही सोबत आणतात. सुमारे दोनशे फूट खोल ही विहीर आहे पाणी उपसण्यासाठी उभे राहता यावे म्हणून विहिरीवर लोखंडी कठडे टाकण्यात आले आहेत परंतु हे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसे नसल्याने पाणी उपसताना तोल जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु पाणीच उपलब्ध होत नसेल तर दुसरा पर्याय काय यामुळे या गावचे नागरिक जीव धोक्यात घालून पाणी काढत आहेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.