ETV Bharat / state

'दिव्यांग'पणावर मात करत रामेश्वर ओढताहेत संसाराचा गाडा - रामेश्वर ओढताहेत संसाराचा गाढा

दोन्ही पायांनी दिव्यांग असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी शेतीतील सर्व कामे करून तसेच प्रसंगी मोलमजुरी करून उपजिविका भागवत आहेत. बदनापूर तालुक्यातील नांदखेडा येथे राहणारे रामेश्वर बोचरे तरुणांसमोर आदर्श ठेवत आहेत.

रामेश्वर बोचरे
author img

By

Published : Oct 16, 2019, 2:53 PM IST

जालना - निसर्गाच्या प्रकोपामुळे वाढत चाललेली नापिकी. शेती करत असताना मेहनतीचे काम करावे लागत असल्यामुळे हल्लीची तरुण पिढी शेती करणे टाळतात. मात्र, तालुक्यातील नांदखेडा येथील रामेश्वर बोचरे हे जन्मत: दोन्ही पायांनी दव्यांग असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी शेतीतील सर्व कामे करून उपजिविका भागवत तरुणांसमोर आदर्श ठेवत आहेत. बदनापूर तालुक्यातील नांदखेडा हे छोटेसे गाव आहे. या गावात 40 वर्षीय रामेश्वर नामदेव बोचरे राहतात. दोन्ही पायांनी ते जन्मत:च दिव्यांग आहे. त्यांना नांदखेडा येथे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी शांताबाई व मुलगी गंगासागर असा परिवार आहे.

शेतात कामे करताना रामेश्वर


दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही हिंमत न हरता बोचरे यांनी शेतीतील सर्व कामे शिकून घेतले. कपाशीत वखर मारणे, निंदणी, कापूस वेचणे, मका सोंगणी आदी कष्टाचे कामे ते लिलिया करतात. हातपायाने धडधाकट असलेल्यांपेक्षाही या कामात ते तरबेज झालेले आहेत. अडीच एकर शेती आणि कायम दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपली शेती करून ते दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीने मोलमजुरी करतात. शेतीतील कष्टाच्या कामाच्या जोरावर त्यांनी कबाडकष्ट करून मुलीचा विवाह करून दिला असून मुलगी गंगासागर ही मुरुमखेडा गावात सुखाने संसार करत आहे.

हेही वाचा - 'एमआयएम'सोबत नसली तरी मुस्लीम समाजाशी सामाजिक युती - अंजली आंबेडकर

याबाबत रामेश्वर बोचरे यांनी बोलताना सांगितले की, अंगात शक्ती आहे, सहनशिलता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काम करून उपजिविका करतो, कायम दुष्काळ पडत असल्यामुळे रोजंदारीचे कामही मिळत नाहीत. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. दिव्यांगासाठी असलेल्या योजनेतून कायमस्वरूपी मदत माझे हातपाय थकल्यावर तरी मिळावी, अशी मागणी केली आहे. कष्टाच्या कामापासून तरुण पिढी दुरावत असल्याचे चित्र असतानाच रामेश्वर बोचरे यांच्या सारखे कष्टकरी तरुण पिढीला दिपस्तंभ ठरू शकतात.

हेही वाचा - काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले, आम्ही विकासाचे करत आहोत - रावसाहेब दानवे

जालना - निसर्गाच्या प्रकोपामुळे वाढत चाललेली नापिकी. शेती करत असताना मेहनतीचे काम करावे लागत असल्यामुळे हल्लीची तरुण पिढी शेती करणे टाळतात. मात्र, तालुक्यातील नांदखेडा येथील रामेश्वर बोचरे हे जन्मत: दोन्ही पायांनी दव्यांग असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी शेतीतील सर्व कामे करून उपजिविका भागवत तरुणांसमोर आदर्श ठेवत आहेत. बदनापूर तालुक्यातील नांदखेडा हे छोटेसे गाव आहे. या गावात 40 वर्षीय रामेश्वर नामदेव बोचरे राहतात. दोन्ही पायांनी ते जन्मत:च दिव्यांग आहे. त्यांना नांदखेडा येथे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी शांताबाई व मुलगी गंगासागर असा परिवार आहे.

शेतात कामे करताना रामेश्वर


दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही हिंमत न हरता बोचरे यांनी शेतीतील सर्व कामे शिकून घेतले. कपाशीत वखर मारणे, निंदणी, कापूस वेचणे, मका सोंगणी आदी कष्टाचे कामे ते लिलिया करतात. हातपायाने धडधाकट असलेल्यांपेक्षाही या कामात ते तरबेज झालेले आहेत. अडीच एकर शेती आणि कायम दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपली शेती करून ते दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीने मोलमजुरी करतात. शेतीतील कष्टाच्या कामाच्या जोरावर त्यांनी कबाडकष्ट करून मुलीचा विवाह करून दिला असून मुलगी गंगासागर ही मुरुमखेडा गावात सुखाने संसार करत आहे.

हेही वाचा - 'एमआयएम'सोबत नसली तरी मुस्लीम समाजाशी सामाजिक युती - अंजली आंबेडकर

याबाबत रामेश्वर बोचरे यांनी बोलताना सांगितले की, अंगात शक्ती आहे, सहनशिलता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काम करून उपजिविका करतो, कायम दुष्काळ पडत असल्यामुळे रोजंदारीचे कामही मिळत नाहीत. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. दिव्यांगासाठी असलेल्या योजनेतून कायमस्वरूपी मदत माझे हातपाय थकल्यावर तरी मिळावी, अशी मागणी केली आहे. कष्टाच्या कामापासून तरुण पिढी दुरावत असल्याचे चित्र असतानाच रामेश्वर बोचरे यांच्या सारखे कष्टकरी तरुण पिढीला दिपस्तंभ ठरू शकतात.

हेही वाचा - काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले, आम्ही विकासाचे करत आहोत - रावसाहेब दानवे

Intro:बदनापूर, दि. 15 : दिवसेंदिवस शेतीत काम करणे व निसर्गाच्या
हलगर्जीपणामुळे वाढत चाललेली नापिकीमुळे तसेच शेती करत असताना
अंगमेहनतीचे काम करावे लागत असल्यामुळे तरुण पिढी या अंगमेहनतीच्या कामे
करण्यास तयार नसताच तालुक्यातील नांदखेडा येथील रामेश्वर बोचरे या जन्मत:
दोन्ही पायांनी अधू असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी शेतीतील सर्व कामे करून
तसेच प्रसंगी मोलमजुरी करून उपजिविका भागवत असून तरुणांसमोर आदर्श ठेवत
आहेत.
बदनापूर तालुक्यातील नांदखेडा हे छोटेसे गाव आहे. या गावात 40 वर्षीय
रामेश्वर नामदेव बोचरे हे राहतात दोन्ही पायांनी ते जन्मत:च अधू आहे.
त्यांना नांदखेडा येथे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी शांताबाई व
मुलगी गंगासागर असा परिवार, दोन्ही पायांनी अधू असूनही हिंमत न हरता
बोचरे यांनी शेतीतील सर्व कामे शिकून घेतले. कपाशीत वखर मारणे, निंदणी,
कापूस वेचणे, मका सोंगणी आदी कष्टाचे कामे ते लिलिया करतात. हातपायाने
धडधाकट असलेल्यांपेक्षाही या कामात ते तरबेज झालेले आहेत. अडीच एकर शेती
असल्यामुळे व कायम दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपली शेती करून ते
दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीने मोलमजुरी करतात. शेतीतील कष्टाच्या
कामाच्या जोरावर त्यांनी कबाडकष्ट करून मुलीचा विवाह करून दिला असून
मुलगी गंगासागर ही मुरुमखेडा गावात सुखाने संसार करत आहे. या बाबत
रामेश्वर बोचरे यांनी बोलताना सांगितले की, अंगात शक्ती आहे, सहनशिलता
आहे त्यामुळे सद्यस्थितीत काम करून उपजिविका करतो, कायम दुष्काळ पडत
असल्यामुळे रोजंदारीचे कामही मिळत नाही त्यामुळे शासनाकडून मदतीची
अपेक्षा असून दिव्यांगासाठी असलेल्या योजनेतून कायमस्वरूपी मदत माझे
हातपाय थकल्यावर तरी मिळावी, अशी मागणी केली आहे. कष्टाच्या कामापासून
तरुण पिढी दुरावत असल्याचे चित्र असतानाच रामेश्वर बोचरे यांच्या सारखे
कष्टकरी तरुण पिढीला दिपस्तंभ ठरू शकतात.Body:रामेश्वर बोचरे काम करताना

बोचरे यांची प्रतिक्रियाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.