ETV Bharat / state

जालना नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी गुरुवारी होणार महाचौकशी

देऊळगाव राजा रोड येथील एन. एच. शिंदे या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांकडे जालना पालिकेतील गंभीर प्रकरणाची तक्रार केली होती. याची चौकशी करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच 26 जुलैला ही चौकशी होत आहे. विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यासाठी दिनांक 18 जुलैला पाच एक समिती स्थापन केली आहे.

author img

By

Published : Jul 23, 2019, 6:59 PM IST

जालना नगरपालिका

जालना - नगरपालिकेची ढेपाळलेली व्यवस्था, त्यामधून जनतेला होणारे त्रास, अवैध कामे, निविदे शिवाय वाहने भाड्याने घेणे, पाणीपुरवठावर चारशे करोड रुपये खर्च केल्यानंतरही जालनेकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती आणि चाळीस दिवसांनंतर मिळणारे पाणी अशा अन्य गंभीर तक्रारी बाबत शुक्रवार दिनांक 26 जुलैला जालना नगरपालिकेची महाचौकशी होणार आहे. विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिनांक 18 जुलैला यासाठी पाच एक समिती स्थापन आहे.

तक्रारीतील महत्वाचे मुद्दे

  • शहरातील प्रभाग आंतर्गत करण्यात आलेली रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत .पहिल्याच वर्षात हे रस्ते खराब झाले आहेत. याची सक्षम यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात यावी.
  • दिवाबत्ती संदर्भात शहरांमध्ये नवीन एलईडी पथदिवे लावल्यानंतर जुन्या दिव्यांची ची काय विल्हेवाट लावली याबाबत पालिकेकडे अभिलेख उपलब्ध नाहीत.
  • नव्या जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, याचीही चौकशी करण्यात यावी .
  • मालमत्ता विभागाच्या विविध करांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची ची रक्कम जमा होऊ शकते मात्र केवळ नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी ही वसुली केली जात नाही.
  • जालना नगरपालिकेने कुठल्याही निविदा न काढता भाड्याची वाहने घेतले आहेत. या वाहनांवर लाखो रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. याचे याच्या कुठल्याही नोंदी नगरपालिकेकडे नाहीत.
  • नगरपालिका प्रशासन हे श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल हे चालवत असून प्रशासनात ते ढवळाढवळ करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दहशतीच्या वातावरणात खाली काम करावे लागत असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे .
  • नगरपालिकेत हाती घेण्यात आलेल्या विविध बांधकामांमध्ये ई-निविदा चा वापर होत असला तरी नगर परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दहशतीखाली विशिष्ट ठेकेदारच या निविदा प्रक्रियेमध्ये हे सहभाग घेतात हे उघड झाले आहे. त्यामुळे तेच ते ठेकेदार पुढे येत आहेत.

या आणि अशा प्रकारच्या अन्य गंभीर स्वरूपातील आरोपांबाबत 26 तारखेला ही महाचौकशी आयोजित करण्यात आले आहे .

माजी आमदार कैलास गोरंट्याल

दरम्यान या सर्व प्रकारासंदर्भात नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप तथ्यहीन असून आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच वेळी त्यांचे पती तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी, हा प्रकार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बदनाम करण्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे षडयंत्र असल्याचे सांगितले. तसेच ही तक्रार अर्जुन खोतकर यांच्या बहिणीचे चिरंजीव यांनी जरी केलेली असली तरी यामागे अर्जुन खोतकर आहेत असा आरोपही त्यांनी केला.

जालना - नगरपालिकेची ढेपाळलेली व्यवस्था, त्यामधून जनतेला होणारे त्रास, अवैध कामे, निविदे शिवाय वाहने भाड्याने घेणे, पाणीपुरवठावर चारशे करोड रुपये खर्च केल्यानंतरही जालनेकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती आणि चाळीस दिवसांनंतर मिळणारे पाणी अशा अन्य गंभीर तक्रारी बाबत शुक्रवार दिनांक 26 जुलैला जालना नगरपालिकेची महाचौकशी होणार आहे. विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिनांक 18 जुलैला यासाठी पाच एक समिती स्थापन आहे.

तक्रारीतील महत्वाचे मुद्दे

  • शहरातील प्रभाग आंतर्गत करण्यात आलेली रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत .पहिल्याच वर्षात हे रस्ते खराब झाले आहेत. याची सक्षम यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात यावी.
  • दिवाबत्ती संदर्भात शहरांमध्ये नवीन एलईडी पथदिवे लावल्यानंतर जुन्या दिव्यांची ची काय विल्हेवाट लावली याबाबत पालिकेकडे अभिलेख उपलब्ध नाहीत.
  • नव्या जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, याचीही चौकशी करण्यात यावी .
  • मालमत्ता विभागाच्या विविध करांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची ची रक्कम जमा होऊ शकते मात्र केवळ नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी ही वसुली केली जात नाही.
  • जालना नगरपालिकेने कुठल्याही निविदा न काढता भाड्याची वाहने घेतले आहेत. या वाहनांवर लाखो रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. याचे याच्या कुठल्याही नोंदी नगरपालिकेकडे नाहीत.
  • नगरपालिका प्रशासन हे श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल हे चालवत असून प्रशासनात ते ढवळाढवळ करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दहशतीच्या वातावरणात खाली काम करावे लागत असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे .
  • नगरपालिकेत हाती घेण्यात आलेल्या विविध बांधकामांमध्ये ई-निविदा चा वापर होत असला तरी नगर परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दहशतीखाली विशिष्ट ठेकेदारच या निविदा प्रक्रियेमध्ये हे सहभाग घेतात हे उघड झाले आहे. त्यामुळे तेच ते ठेकेदार पुढे येत आहेत.

या आणि अशा प्रकारच्या अन्य गंभीर स्वरूपातील आरोपांबाबत 26 तारखेला ही महाचौकशी आयोजित करण्यात आले आहे .

माजी आमदार कैलास गोरंट्याल

दरम्यान या सर्व प्रकारासंदर्भात नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप तथ्यहीन असून आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच वेळी त्यांचे पती तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी, हा प्रकार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बदनाम करण्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे षडयंत्र असल्याचे सांगितले. तसेच ही तक्रार अर्जुन खोतकर यांच्या बहिणीचे चिरंजीव यांनी जरी केलेली असली तरी यामागे अर्जुन खोतकर आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Intro:जालना नगरपालिकेचे ढेपाळलेली व्यवस्था, त्यामधून जनतेला होणारे त्रास, अवैध कामे, नगराध्यक्षांच्या पतीचा वाढता हस्तक्षेप, निविदे शिवाय वाहने भाड्याने घेणे ,पाणीपुरवठावर चारशे करोड रुपये खर्च केल्यानंतरही जालनेकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती, आणि चाळीस दिवसांनंतर मिळणारे पाणी, नगरपालिकेच्या नावाने असलेली 64 बँक खाती, जमा झालेली घरपट्टी नळपट्टी नगरपालिकेच्या खात्यात जमा न होणे या आणि अशा अन्य गंभीर तक्रारी बाबत शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी जालना नगरपालिकेची महा चौकशी होणार आहे .
विशेष म्हणजे ही चौकशी करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.बरोबर एक महिन्यानंतर म्हणजेच 26 जुलै रोजी ही चौकशी होत आहे .येथील देऊळगाव राजा रोडवर राहणाऱ्या एन. एच. शिंदे या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार केली होती.


Body:औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिनांक 18 जुलै रोजी एक समिती स्थापन करून या समितीच्या अध्यक्षपदी 1)अप्पर विभागीय आयुक्त तथा पालक अधिकारी जालना जिल्हा यांची नियुक्ती केली आहे .तर सदस्य म्हणून 2)प्रादेशिक उपसंचालक नगरपालिका प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, 3)उप अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद 4)सहाय्यक संचालक (ताळमेळ) विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद ,आणि5) लेखाधिकारी नगर परिषद प्रशासन या चार जणांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे असे पाच अधिकारी 26 तारखेला जालना नगरपालिकेची चौकशी करणार आहेत.
13 पाण्याच्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल तसेच माजी आमदार कैलास गोरंट्याल हे या भ्रष्ट कारभारात प्रत्यक्ष सहभागी असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. या चौकशीमध्ये स्वच्छता विभागाची संबंधित असलेल्या शहरातील स्वच्छतेसाठी प्राप्त झालेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 16 कोटी रुपयांचा निधी हा आजही मोठ्या प्रमाणावर खर्चिक आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी वाहन पुरविणे, मजूर पुरविणे याची बोगस बिले अदा करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा विभागासाठी चारशे कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे (त्यामध्ये अडीचशे कोटी जायकवाडी ते जालना आणि दीडशे कोटी जालना शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी) असे असतानाही जालनेकरांना चाळीस दिवसांनंतर एकदा पाणी मिळत आहे, तसेच शासनाचा आलेला निधी वापरण्यासाठी शहरात जलकुंभ बांधणे अगोदर पाईपलाईन टाकून निधी वापरला आहे.
शहरातील प्रभाग आंतर्गत करण्यात आलेली रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत .पहिल्याच वर्षात हे रस्ते खराब झाले आहेत .याची सक्षम यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात यावी.
दिवाबत्ती संदर्भात शहरांमध्ये नवीन एलईडी पथदिवे लावल्यानंतर जुन्या दिव्यांची ची काय विल्हेवाट लावली याबाबत पालिकेकडे अभिलेख उपलब्ध नाहीत.
नव्या जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे याचीही चौकशी करण्यात यावी .दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी 3 गणेश भक्तांचा मोती तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता .नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे या तिघांना आपले प्राण गमवावे लागले .कुठलाही सुरक्षेचा उपाय न केल्यामुळे या प्रकाराला नगराध्यक्षांसह इतर अधिकाऱ्यांना जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा. मालमत्ता विभागाच्या विविध करांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची ची रक्कम जमा होऊ शकते मात्र केवळ नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी ही वसुली केली जात नाही. उदाहरणार्थ 22• 39 कोटी रुपयांपैकी फक्त 10• 51 कोटी एवढीच वसुली सोळा-सतरा वर्षात करण्यात आली .उर्वरित रक्कम नगराध्यक्षा गोरंट्याल यांचे हितसंबंध असल्याने करण्यात आली नाही. जालना नगरपालिकेने कुठल्याही निविदा न काढता भाड्याची वाहने घेतले आहेत . आणि या वाहनांवर लाखो रुपये खर्च दाखविण्यात आला आहे .याचे याच्या कुठल्याही नोंदी नगरपालिकेकडे नाहीत .शरद येवले यांना लाखो रुपये या वाहनांसाठी अदा करण्यात आले आहेत.
नगरपालिका प्रशासन हे श्रीमती संगीता गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल हे चालवत असून प्रशासनात ते ढवळाढवळ करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दहशतीच्या वातावरणात खाली काम करावे लागत असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे .
लेखापरीक्षण अहवाल 16-17 नुसार जालना शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी खरेदी करण्यात आलेल्या 62 हातगाड्या ,सोळा टिप्पर, 27 तीन चाकी पडल रिक्षा, चार डंपर, 33 कंटेनर ,नऊ कॉम्पॅक्टर, एक एंपियर ,एक मिनी लोडर या वाहनांची कोणतीही निविदा समिती गठीत न करता नगराध्यक्षांच्या आदेशाने परस्पर खरेदी करण्यात आल्या.
नगरपालिकेत हाती घेण्यात आलेल्या विविध बांधकामांमध्ये ई-निविदा चा वापर होत असला तरी नगर परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती गोरंट्याल यांचे पती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दहशतीखाली विशिष्ट ठेकेदारच या निविदा प्रक्रियेमध्ये हे सहभाग घेतात हे उघड झाले आहे. त्यामुळे तेच ते ठेकेदार पुढे येत आहेत. यामध्ये यु .एन .स्वामी ,श्रीपाद त्रंबक रत्नपारखी, अश्विन श्रीनिवास गरदास,स्वप्निल एखंडे, एम. पी. पवार हेच ठेकेदार दिसत आहेत. अशा प्रकारच्या या आणि अन्य गंभीर स्वरूपाबाबत 26 तारखेला ही महा चौकशी आयोजित करण्यात आले आहे .
***
दरम्यान या सर्व प्रकारासंदर्भात नगराध्यक्ष श्रीमती संगीता गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप तथ्यहीन असून आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच ओळी त्यांचे पती तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ,हा प्रकार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बदनाम करण्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे षडयंत्र असल्याचे सांगितले. तसेच ही तक्रार अर्जुन खोतकर यांच्या बहिणीचे चिरंजीव यांनी जरी केलेली असली तरी यामागे अर्जुन खोतकर आहेत असा आरोपही त्यांनी केला.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.