ETV Bharat / state

पावसाळ्यातील आपत्ती निवारणासाठी जालना प्रशासन सज्ज, कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या सुमारे 48 गावांना अतिवृष्टीमुळे किंवा जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धोका होऊ शकतो. गोदापत्रातील पाणी हे दीड लाख क्युसेक सोडले तर धोका होण्याची संभावना आहे. परंतु यासाठी अगोदर जायकवाडी धरण पूर्ण भरावे लागेल. आणि त्यानंतरच हे पाणी पात्रात सोडण्यात येईल.

author img

By

Published : Jun 16, 2019, 10:15 PM IST

Updated : Jun 16, 2019, 11:05 PM IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर

जालना - शासकीय दिनदर्शिकेनुसार एक जून पासून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरी देखील अद्यापपर्यंत पाऊस पडलेला नाही, म्हणून आपत्ती ही आपत्तीच असते ती कधीही उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासन या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती देताना.

जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या सुमारे 48 गावांना अतिवृष्टीमुळे किंवा जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धोका होऊ शकतो. गोदापत्रातील पाणी हे दीड लाख क्युसेक सोडले तर धोका होण्याची संभावना आहे. परंतु यासाठी अगोदर जायकवाडी धरण पूर्ण भरावे लागेल. आणि त्यानंतरच हे पाणी पात्रात सोडण्यात येईल. त्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. परंतु प्रशासनाने मात्र आतापासूनच आपत्तीला तोंड देण्याची तयारी दर्शविलेली आहे. गोदाकाठच्या 48 गावांत अतिवृष्टी झाली आणि नद्यांना मोठे पूर आले तर जाफराबाद, भोकरदन आणि मंठा तालुक्यांतील अनुक्रमे 2, 3, 3 गावांनाही आपत्ती व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी पूर्ण केलेली आहे.

यासाठी लागणारे प्रशिक्षण संबंधित नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. जालना, परतूर, अंबड, भोकरदन या चारही नगरपालिकेमधील ३० कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस होमगार्ड महसूल, आणि सामान्य रुग्णालयातील अन्य 36 कर्मचाऱ्यांच्या टीमला हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा कोणत्याही आपत्तीशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून दीपक काजळकर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करीत आहेत

आपत्ती व्यवस्थापनाची साहित्य सामग्री -


दहा ते बारा व्यक्ती बसतील एवढा क्षमतेच्या चार रबर बोट, हवेच्या माध्यमातून पाच मिनिटात उभे राहतील असे २ तंबू, १०० लाईफ गार्ड, १०० लाईफ जॅकेट, अडचणीच्या वेळी अंधारामध्ये हवेच्या माध्यमातून उभे राहणारे विजेचे पोल, आणि त्यावर जनरेटर च्या माध्यमातून लागणारे १६ लाईट, १० स्ट्रेचर, अग्निशमन दलासाठी आवश्यक असणारे १० सुट, वायुगळती साठी आवश्यक असणारे मास्कअसलेले १० सूट, १० हेल्मेट.
ही सर्व यंत्रणा पाण्याच्या आपत्तीसाठी आहे. याच सोबत इमारत, झाडे कोसळून पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये १ काँक्रीट कटर, १ ड्रिल मशीन , १ मेटल कटर, आवाहन करण्यासाठी १ मेगाफोन, १०० मीटर लांबीचे नायलॉन आणि १६ तारेचे बंडल अशा पद्धतीने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केलेली आहे.

जालना - शासकीय दिनदर्शिकेनुसार एक जून पासून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरी देखील अद्यापपर्यंत पाऊस पडलेला नाही, म्हणून आपत्ती ही आपत्तीच असते ती कधीही उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासन या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती देताना.

जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या सुमारे 48 गावांना अतिवृष्टीमुळे किंवा जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धोका होऊ शकतो. गोदापत्रातील पाणी हे दीड लाख क्युसेक सोडले तर धोका होण्याची संभावना आहे. परंतु यासाठी अगोदर जायकवाडी धरण पूर्ण भरावे लागेल. आणि त्यानंतरच हे पाणी पात्रात सोडण्यात येईल. त्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. परंतु प्रशासनाने मात्र आतापासूनच आपत्तीला तोंड देण्याची तयारी दर्शविलेली आहे. गोदाकाठच्या 48 गावांत अतिवृष्टी झाली आणि नद्यांना मोठे पूर आले तर जाफराबाद, भोकरदन आणि मंठा तालुक्यांतील अनुक्रमे 2, 3, 3 गावांनाही आपत्ती व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी पूर्ण केलेली आहे.

यासाठी लागणारे प्रशिक्षण संबंधित नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. जालना, परतूर, अंबड, भोकरदन या चारही नगरपालिकेमधील ३० कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस होमगार्ड महसूल, आणि सामान्य रुग्णालयातील अन्य 36 कर्मचाऱ्यांच्या टीमला हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा कोणत्याही आपत्तीशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून दीपक काजळकर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करीत आहेत

आपत्ती व्यवस्थापनाची साहित्य सामग्री -


दहा ते बारा व्यक्ती बसतील एवढा क्षमतेच्या चार रबर बोट, हवेच्या माध्यमातून पाच मिनिटात उभे राहतील असे २ तंबू, १०० लाईफ गार्ड, १०० लाईफ जॅकेट, अडचणीच्या वेळी अंधारामध्ये हवेच्या माध्यमातून उभे राहणारे विजेचे पोल, आणि त्यावर जनरेटर च्या माध्यमातून लागणारे १६ लाईट, १० स्ट्रेचर, अग्निशमन दलासाठी आवश्यक असणारे १० सुट, वायुगळती साठी आवश्यक असणारे मास्कअसलेले १० सूट, १० हेल्मेट.
ही सर्व यंत्रणा पाण्याच्या आपत्तीसाठी आहे. याच सोबत इमारत, झाडे कोसळून पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये १ काँक्रीट कटर, १ ड्रिल मशीन , १ मेटल कटर, आवाहन करण्यासाठी १ मेगाफोन, १०० मीटर लांबीचे नायलॉन आणि १६ तारेचे बंडल अशा पद्धतीने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केलेली आहे.

Intro:शासकीय दिनदर्शिकेनुसार एक जून पासून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरी देखील अद्याप पर्यंत पाऊस पडलेला नाही, मात्र आपत्ती ही आपत्तीच असते ती कधीही उद्भवू शकते त्यामुळे प्रशासन या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.


Body:जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या सुमारे 48 गावांना अतिवृष्टीमुळे किंवा जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धोका होऊ शकतो . जर गोदापत्रातील पाणी हे दीड लाख कुअसेंसच्या विसर्गाने सोडले तरच धोका होण्याची संभावना आहे. परंतु यासाठी अगोदर जायकवाडी धरण पूर्ण भरावे लागेल आणि त्यानंतरच हे पाणी पात्रात सोडण्यात येईल. त्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. परंतु प्रशासनाने मात्र आपत्तीच्या संकटाला तोंड देण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे. गोदाकाठच्या 48 गावात सोबतच जर अतिवृष्टी झाली आणि नद्यांना मोठे पूर आले तर जाफराबाद - 2, भोकरदन- 3, आणि मंठा -3 या तालुक्यातील गावांनाही अति आपत्ती व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी पूर्ण केलेली आहे यासाठी लागणारे प्रशिक्षण संबंधित नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले. असून हे साहित्य देखील नगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये उपलब्ध आहे .जालना परतूर अंबड भोकरदन या चारही नगरपालीकेमधील तीस कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस होमगार्ड महसूल, आणि सामान्य रुग्णालयातील अन्य 36 कर्मचाऱ्यांच्या टीमला हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा आपत्ती व्यवस्थापनाची सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे .
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून दीपक काजळकर हे या आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करीत आहेत

*हे आपत्ती व्यवस्थापनासाठी शोध व बचाव साहित्य*
दहा ते बारा व्यक्ती बसतील एवढा क्षमतेच्या चार रबर बोट# हवेच्या माध्यमातून पाच मिनिटात उभे राहतील असे दोन तंबू# शंभर लाईफ गार्ड# 100 लाईफ जॅकेट #अडचणीच्या वेळी अंधारामध्ये हवेच्या माध्यमातून उभे राहणारे विजेचे पोल ,आणि त्यावर जनरेटर च्या माध्यमातून लागणारे लाईट 16# दहा स्ट्रेचर# अग्निशमन दलासाठी आवश्यक असणारे दहा सुट# वायुगळती साठी आवश्यक असणारे मास्कअसलेले दहा सूट# हेल्मेट 10 #
ही सर्व यंत्रणा पाण्याच्या आपत्तीसाठी आहे ,याच सोबत इमारती झाडे कोसळून पडल्या नंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे ,त्यामध्ये काँक्रीट कट्टर एक# एक ड्रिल मशीन एक# मेटल कटर एक# कटरमोठे एक #आवाहन करण्यासाठी मेगाफोन एक #100 मीटर लांबीचे नायलॉन आणि तारेच्या बंडल प्रत्येकी 16# अशा पद्धतीने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केलेली आहे.


Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.