ETV Bharat / state

जालन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थिंनींची गैरसोय, प्रशिक्षक संतप्त - जालन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

जालन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थिंनींची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रशिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जालन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थिंनींची गैरसोय
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:38 AM IST

Updated : Sep 5, 2019, 12:09 PM IST

जालना - जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हास्तरीय मुला-मुलींची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी मुलींना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित खोली नाही. तसेच शौचालयाची देखील सोय नाही. यामुळे मुलींची कुचंबणा झाली. तसेच पावसामुळे सामने अर्ध्यावर सोडून खेळाडूंना परतावे लागले. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी संताप व्यक्त केला.

जालन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थिंनींची गैरसोय

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 14, 17 आणि 19 अशा वयोगटातील 48 संघांनी नाव नोंदणी केली होती. मात्र, मुलींचे सात आणि मुलांचे 20 असे एकूण २७ संघ प्रत्यक्षात खेळण्यासाठी आले. यामध्ये भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद अशा ग्रामीण भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, येथील गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थी संघ अडचणीत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत आलेल्या प्रशिक्षकांनी देखील क्रीडा विभाग आणि शासनाचा तीव्र निषेध केला.

खेळाच्या मैदानावरचे पाणी बाहेर काढले नाही. याउलट बाहेरचे पाणी मैदानावर येत होते. त्यासोबत प्रेक्षकगृहावर छत नसल्यामुळे प्रेक्षकांचे देखील हाल झाले. खेळाडूंसाठी असलेल्या चेंजिंग रूमला दारे, खिडक्या नाहीत. तसेच याठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे याठिकाणी बसणे देखील कठीण होते, त्यामुळे खेळाडूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी करून दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांना केराची टोपली मिळाल्याचे दिसत आहे.

जालना - जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हास्तरीय मुला-मुलींची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी मुलींना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित खोली नाही. तसेच शौचालयाची देखील सोय नाही. यामुळे मुलींची कुचंबणा झाली. तसेच पावसामुळे सामने अर्ध्यावर सोडून खेळाडूंना परतावे लागले. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी संताप व्यक्त केला.

जालन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थिंनींची गैरसोय

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 14, 17 आणि 19 अशा वयोगटातील 48 संघांनी नाव नोंदणी केली होती. मात्र, मुलींचे सात आणि मुलांचे 20 असे एकूण २७ संघ प्रत्यक्षात खेळण्यासाठी आले. यामध्ये भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद अशा ग्रामीण भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, येथील गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थी संघ अडचणीत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत आलेल्या प्रशिक्षकांनी देखील क्रीडा विभाग आणि शासनाचा तीव्र निषेध केला.

खेळाच्या मैदानावरचे पाणी बाहेर काढले नाही. याउलट बाहेरचे पाणी मैदानावर येत होते. त्यासोबत प्रेक्षकगृहावर छत नसल्यामुळे प्रेक्षकांचे देखील हाल झाले. खेळाडूंसाठी असलेल्या चेंजिंग रूमला दारे, खिडक्या नाहीत. तसेच याठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे याठिकाणी बसणे देखील कठीण होते, त्यामुळे खेळाडूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी करून दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांना केराची टोपली मिळाल्याचे दिसत आहे.

Intro:जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धा पावसामुळेच बारगळल्या .मात्र येथील सुविधांच्या अभावामुळे जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थिनींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या .तसेच विद्यार्थ्यांसोबत आलेल्या प्रशिक्षक आणि शिक्षिकांनी देखील येथील गैर सुविधांबद्दल संताप व्यक्त केला.


Body:जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज जालना जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .14, 17 आणि 19 अशा वयोगटातील 48 संघांनी नाव नोंदणी केली होती .मात्र मुलींचे सात आणि मुलांचे 20 असे एकूण सत्तावीस संघ प्रत्यक्षात खेळण्यासाठी आले. त्यामध्येही पावसाने हजेरी लावल्यामुळे या स्पर्धा अर्ध्यावर सोडून विद्यार्थ्यांना परतावे लागले. परंतु तत्पूर्वी विद्यार्थिनींनी ई टीव्हीच्या प्रतिनिधीकडे त्यांची कैफियत मांडली. भोकरदन ,घनसावंगी, बदनापूर ,जाफराबाद, अशा ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थिनीचे संघ इथे असलेल्या गैरसुविधेमुळे अडचणीत आले आहेत. मुलींना आल्यानंतर कपडे बदलण्यासाठी सुविधा नाही. एवढेच नव्हे तर शौचालयाची देखील सुविधा नसल्यामुळे मुलींची प्रचंड कुचंबणा झाली. आणि याबद्दल क्रीडा विभागाचा आणि शासनाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला .त्यासोबत विद्यार्थ्यांसोबत आलेले प्रशिक्षकांनी देखील येथील गैरसुविधांबद्दल बद्दल संताप व्यक्त केला. खेळाच्या मैदानावर चे पाणी बाहेर काढणे तर सोडाच उलट बाहेरचे पाणी मैदानावर येत . आहे त्यासोबत प्रेक्षागृहावर छत नसल्यामुळे ऊन, वारा, पाऊस इथे मुक्तपणे वावरत आहे, खेळाडूंसाठी असलेल्या चेंजिंग रूम ची दारे, खिडक्या ,गायब झाल्या आहेत आणि इथे घणीचे साम्राज्य आहे .त्यामुळे बसण्यासाठी सुद्धा येथे दुर्गंधी सोसावी लागते. अशा या क्रीडासंकुलात बद्दल खेळाडूंनी देखील संताप व्यक्त केला आहे.
** मागील महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी करून दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनांना केराची टोपली मिळाल्याचे दिसत आहे.


Conclusion:
Last Updated : Sep 5, 2019, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.