ETV Bharat / state

जालना पालिकेतील भ्रष्टाचाराच्या पुराव्यांनी जिल्हाधिकारी देखील अवाक; 'आप'ने सोपवले पुरावे

author img

By

Published : Aug 13, 2019, 8:06 PM IST

जालना नगरपालिकेच्या 67 प्रकरणांचे पुरावे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी सुपूर्द केले. हे पुरावे पाहून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे देखील अवाक झाले. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसाच्या तपासणीनंतर ही समिती गायब झाली.

जालना नगरपालिका

जालना - नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. टेंडर शिवाय कामे करणे, बनावट बिले, ठरलेले गुत्तेदार आणि पालिकेतून गायब झालेल्या संचिका त्याचसोबत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतनाच्या नोंदी नसणे, अशाप्रकारे जालना नगरपालिकेचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यातच मुख्याधिकार्‍यांनी दिल्लीवारीसाठी एक लाख रुपयांचा खर्च केला आहे.

भ्रष्टाचाराच्या पुराव्यांनी जिल्हाधिकारी देखील अवाक

जालना नगरपालिकेच्या या सर्व प्रकरणांचे पुरावे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी सुपूर्द केले. हे पुरावे पाहून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे देखील अवाक झाले. शिवाय मी पण लाखो रुपयाचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचसोबत दिलेल्या निधीचा कसा वापर करायचा हे नगरपालिका ठरवते, मात्र आता या तक्रारीमुळे दिलेला निधी कुठे? आणि कसा वापरला गेला, याची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसाच्या तपासणीनंतर ही समिती गायब झाली. अनेक वर्षांपासून नगरपालिकेमध्ये 67 प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माहितीच्या अधिकारात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केले. तसेच हे पुरावे या चौकशी समितीला देण्यासाठी मंगळवारी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आले. मात्र, ही समिती सध्या गायब असल्याने त्यांनी हे पुरावे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दाखवले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. 67 प्रकरणांमधील 514 पानांचे पुरावे आणि दहा पानांची तक्रार अशा एकूण 524 पानांचा पुराव्यांचा संच जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. यातील काही महत्त्वाच्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती समजून घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सदर पुरावे चौकशी समितीकडे देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नगरपालिकेची सुरू असलेली चौकशी अद्याप संपलेली नाही. चौकशी समितीने कोणाच्याही दबावाला बळी न पडता आणि सद्सद्विवेक बुद्धीने चौकशी करण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

जालना - नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. टेंडर शिवाय कामे करणे, बनावट बिले, ठरलेले गुत्तेदार आणि पालिकेतून गायब झालेल्या संचिका त्याचसोबत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतनाच्या नोंदी नसणे, अशाप्रकारे जालना नगरपालिकेचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यातच मुख्याधिकार्‍यांनी दिल्लीवारीसाठी एक लाख रुपयांचा खर्च केला आहे.

भ्रष्टाचाराच्या पुराव्यांनी जिल्हाधिकारी देखील अवाक

जालना नगरपालिकेच्या या सर्व प्रकरणांचे पुरावे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी सुपूर्द केले. हे पुरावे पाहून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे देखील अवाक झाले. शिवाय मी पण लाखो रुपयाचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचसोबत दिलेल्या निधीचा कसा वापर करायचा हे नगरपालिका ठरवते, मात्र आता या तक्रारीमुळे दिलेला निधी कुठे? आणि कसा वापरला गेला, याची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसाच्या तपासणीनंतर ही समिती गायब झाली. अनेक वर्षांपासून नगरपालिकेमध्ये 67 प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माहितीच्या अधिकारात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केले. तसेच हे पुरावे या चौकशी समितीला देण्यासाठी मंगळवारी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आले. मात्र, ही समिती सध्या गायब असल्याने त्यांनी हे पुरावे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दाखवले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. 67 प्रकरणांमधील 514 पानांचे पुरावे आणि दहा पानांची तक्रार अशा एकूण 524 पानांचा पुराव्यांचा संच जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. यातील काही महत्त्वाच्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती समजून घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सदर पुरावे चौकशी समितीकडे देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नगरपालिकेची सुरू असलेली चौकशी अद्याप संपलेली नाही. चौकशी समितीने कोणाच्याही दबावाला बळी न पडता आणि सद्सद्विवेक बुद्धीने चौकशी करण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

Intro:जालना नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. टेंडर शिवाय कामे बनावट बिले, ठरलेले गुत्तेदार ,आणि पालिकेतून गायब झालेल्या संचिका, त्याच सोबत कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतनाच्या देखील नोंदी नसणे, इथपर्यंत जालना नगरपालिकेचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यातच ुख्याधिकार्‍यांनी दिल्लीवारी साठी एक लाख रुपयांचा खर्च केला आहे. या सर्व प्रकरणांची पुरावे आज मंगळवारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. हे पुरावे पाहून जिल्हा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे देखील आवाज झाले. आणि मी पण लाखो रुपये निधी दिलाआहे असे सांगितले. त्याच सोबत दिलेल्या निधीचा कसा वापर करायचा हे नगरपालिका ठरवते, मात्र आता या तक्रारीमुळे दिलेला निधी कुठे? आणि कसा वापरला गेला याची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Body:जालना नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या तपासणीनंतर ही समिती गायब झाली परंतु अनेक वर्षांपासून नगरपालिकेमध्ये ते 67 प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माहितीच्या अधिकारात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गोळा केले, आणि हे पुरावे या चौकशी समितीला देण्यासाठी आज ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते मात्र ही समिती सध्या गायब असल्यामुळे त्यांनी हे पुरावे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दाखवले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते 67 प्रकरणांमध्ये 514 पानांचे पुरावे आणि दहा पानांची तक्रार अशा एकूण 524 पानांचा पुराव्यांचा गटाच या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवला. यातील काही महत्त्वांच्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेत हे प्रकरणे समजून घेतली आणि सध्या सुरू असलेल्या चौकशी समितीकडे हे देण्याचे आश्वासन दिले .त्याच सोबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निधीचाही उल्लेख करत सर्वजण फक्त रस्त्याची कामे मागतात ते का मागतात हे कळत नाही! असे म्हणतानाच मोती बागेतील कारंजा साठी देखील लाखो रुपयांचाआपण निधी दिला आहे. असेहि त्यांनी सांगितले.
दरम्यान नगरपालिकेची सुरू असलेली चौकशी अद्याप संपलेली नाही मात्र या चौकशी समितीने जर कोणाच्याही दबावाला बळी न पडता आणि सद्सद्विवेक बुद्धीने जर चौकशी केली तर लोकप्रतिनिधी, अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांना बेड्या पडल्या शिवाय राहणार नाहीत. एवढा भ्रष्टाचार नगरपालिकेत बोकाळला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.