जालना : उदघाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल (using samruddhi highway MLA Kailas Gorantyal demand) यांनी जालन्यात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचा यावर्षी दसरा मेळावा होत आहे. यासाठी जालन्यातून शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे गटाचे शिवसैनिक समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले. मात्र, उद्घाटनापूर्वीच कार्यकर्त्यांसाठी महामार्ग कसा काय खुला करण्यात आला? असा सवाल आ. गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे. (MLA Kailash Gorantyal on samruddhi highway Using)
शिवसैनिकांवर कारवाई कोण करणार ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सामान्य नागरिकाने समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास त्याला दंड आकारण्यात येतो. आता प्रशासन यांच्यावर काय कारवाई करणार आहे? असे त्यांनी म्हटले आहे. उदघाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.