ETV Bharat / state

सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही - बसवराज पाटील - पाणीटंचाई

अंबड तालुक्यातील नंदी येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीची पाहणी करण्यासाठी आमदार बसवराज पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचे वक्तव्य केले.

बसवराज पाटील
author img

By

Published : May 16, 2019, 11:37 AM IST

जालना - चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला असून दुष्काळाची सरकारला चिंता नाही, असा आरोप आमदार बसवराज पाटील यांनी केला. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी ते जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी अंबड तालुक्यातील नंदी येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीची पाहणी केली.

काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दुष्काळ पाहणी समितीच्या अध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुष्काळाची पाहणी करताना त्यांच्यासोबत या समितीतील पदाधिकारी आमदार सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याणराव दळे, बाबुराव कुलकर्णी, सत्संग मुंडे, जालन्याचे शहराध्यक्ष शेख महेमुद आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळाच्या प्रश्नाबाबत प्रतिक्रिया देताना बसवराज पाटील

दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारला कोणत्याही प्रकारची चिंता नाही, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात दौरा केला जाणार आहे. याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल आणि त्यावरून राज्य शासनाला योग्य ते उपाय करण्यासाठी भाग पाडले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळाची जाणीव करून देण्यासाठी ही समिती मराठवाड्यात दौरे करत आहे. यावेळी मराठवाडा समन्वयक भीमराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अन्यथा छावण्या बंद करू

शासनाने चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी ठरवून दिलेला दर वाढवून द्यावा अन्यथा लवकरच या छावण्या बंद कराव्या लागतील, असा इशारा ज्ञानसागर शिक्षण संस्था, नांदीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचे अध्यक्ष सय्यद असलम सय्यद रजाक यांनी पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला. मोठ्या जनावरांना दीडशे रुपये आणि लहान जनावरांना ९० रुपये दर द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जालना - चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला असून दुष्काळाची सरकारला चिंता नाही, असा आरोप आमदार बसवराज पाटील यांनी केला. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी ते जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी अंबड तालुक्यातील नंदी येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीची पाहणी केली.

काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दुष्काळ पाहणी समितीच्या अध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुष्काळाची पाहणी करताना त्यांच्यासोबत या समितीतील पदाधिकारी आमदार सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कल्याणराव दळे, बाबुराव कुलकर्णी, सत्संग मुंडे, जालन्याचे शहराध्यक्ष शेख महेमुद आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळाच्या प्रश्नाबाबत प्रतिक्रिया देताना बसवराज पाटील

दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारला कोणत्याही प्रकारची चिंता नाही, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात दौरा केला जाणार आहे. याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल आणि त्यावरून राज्य शासनाला योग्य ते उपाय करण्यासाठी भाग पाडले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळाची जाणीव करून देण्यासाठी ही समिती मराठवाड्यात दौरे करत आहे. यावेळी मराठवाडा समन्वयक भीमराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अन्यथा छावण्या बंद करू

शासनाने चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी ठरवून दिलेला दर वाढवून द्यावा अन्यथा लवकरच या छावण्या बंद कराव्या लागतील, असा इशारा ज्ञानसागर शिक्षण संस्था, नांदीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचे अध्यक्ष सय्यद असलम सय्यद रजाक यांनी पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला. मोठ्या जनावरांना दीडशे रुपये आणि लहान जनावरांना ९० रुपये दर द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Intro:चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झाला असून दुष्काळाची सरकारला चिंता नाही, असा आरोप आ .बसवराज पाटील यांनी केला. जालना जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक 15 मे रोजी िल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. अंबड तालुक्यातील नंदी येथे हे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीची त्यांनी पाहणी केली.


Body:काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दुष्काळ पाहणी समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांच्यासोबत या समितीतील पदाधिकारी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,कल्याणराव दळे, बाबुराव कुलकर्णी ,सत्संग मुंडे, जालन्याचे शहराध्यक्ष शेख महेमुद ,विष्णू कंटुले, प्रकाश नारायणकर, विजय जराड, आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की ,आत्तापर्यंत केलेल्या दौऱ्यांमध्ये सर्वत्र चारा छावण्यांचा प्रश्न बिकट झालेला दिसत आहे, दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारला कसल्याही प्रकारची चिंता नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाड्यात दौरा केला जाणार असून याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे, आणि त्यावरून राज्य शासनाला योग्य ते उपाय करण्यासाठी भाग पाडल्या जाणार आहे .कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही .याची जाणीव करून देण्यासाठी समिती मराठवाड्यात दौरे करीत आहे. यावेळी मराठवाडा समन्वयक भीमराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
*....अन्यथा छावण्या बंद करू *
शासनाने चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी ठरवून दिलेला दर वाढवून द्यावा अन्यथा लवकरच या छावण्या बंद कराव्या लागतील असा इशारा ज्ञानसागर शिक्षण संस्था नांदीचे वतीने सुरू असलेल्या या चारा छावणी चे अध्यक्ष सय्यद असलम सय्यद रजाक यांनी बसवराज पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. मोठ्या जनावरांना दीडशे रुपये आणि लहान जनावरांना 90 रुपये दर द्यावा अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.