ETV Bharat / state

दानवे -लोणीकर यांच्यातील कलहावर भाजप प्रवक्त्यांचे अजब वक्तव्य

author img

By

Published : Feb 12, 2021, 7:22 AM IST

Updated : Feb 12, 2021, 8:41 AM IST

जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट पडले आहेत. खासदार रावसाहेब दानवे यांचा गट आणि माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचा दुसरा गट. वेगवेगळ्या बैठकांसाठी जिल्ह्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांची पळवा पळवी करण्यासारखे प्रकार होताना दिसतात.

दानवे -लोणीकर यांच्यातील कलहावर भाजप प्रवक्त्यांचे अजब वक्तव्य
दानवे -लोणीकर यांच्यातील कलहावर भाजप प्रवक्त्यांचे अजब वक्तव्य

जालना -सध्या जालना जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कलह ठासून भरलेला आहे. मात्र, हा कलह नसून ते कर्तत्व दाखविण्यासाठी लढत आहेत, असे अजब वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते किशोर शितोळे यांनी केले आहे.

दानवे -लोणीकर यांच्यातील कलहावर भाजप प्रवक्त्यांचे अजब वक्तव्य
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जनजागृतीकेंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय काय मिळाले? याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते किशोर शितोळे हे गुरुवारी जालन्यात आले होते. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा, रस्ते ,दळणवळण प्रकल्प ,विद्यमान रेल्वे प्रकल्प तसेच नवीन रेल्वे मार्गासाठीची केलेली आर्थिक तरतूद विस्तृतपणे सांगितली. दरम्यान रेल्वेमार्गासाठी केंद्राने आपला वाटा दिला आहे. मात्र, राज्यशासन त्यांचा वाटा देत नसल्यामुळे परळी अहमदनगर हा रेल्वेमार्ग अर्धवट असल्याचेही ते म्हणाले.


विरोधक गैरसमज पसरवत आहेत
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अभ्यास न करताच विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र, मोदी सरकारने सामान्य जनतेच्या आणि राष्ट्रीय विकासाच्या कामाचा आढावा घेऊन हा अर्थसंकल्प जनतेसमोर ठेवला आहे. आणि त्या तरतुदी सामान्य माणसाला कळव्यात हा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.


ही तर कर्तृत्व दाखविण्याची लढत

जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट पडले आहेत. खासदार रावसाहेब दानवे यांचा गट आणि माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचा दुसरा गट. वेगवेगळ्या बैठकांसाठी जिल्ह्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांची पळवा पळवी करण्यासारखे प्रकार होताना दिसतात. दानवे आणि लोणीकर यांच्यासारखी माणसे भाजपला मिळाली हे भाग्यच आहे. आपले काम दाखवण्यासाठी आणि आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही भाऊ लढत असल्याचे अजब व्यक्तव्य शितोळे यांनी केले

जालना -सध्या जालना जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कलह ठासून भरलेला आहे. मात्र, हा कलह नसून ते कर्तत्व दाखविण्यासाठी लढत आहेत, असे अजब वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते किशोर शितोळे यांनी केले आहे.

दानवे -लोणीकर यांच्यातील कलहावर भाजप प्रवक्त्यांचे अजब वक्तव्य
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जनजागृतीकेंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय काय मिळाले? याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते किशोर शितोळे हे गुरुवारी जालन्यात आले होते. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा, रस्ते ,दळणवळण प्रकल्प ,विद्यमान रेल्वे प्रकल्प तसेच नवीन रेल्वे मार्गासाठीची केलेली आर्थिक तरतूद विस्तृतपणे सांगितली. दरम्यान रेल्वेमार्गासाठी केंद्राने आपला वाटा दिला आहे. मात्र, राज्यशासन त्यांचा वाटा देत नसल्यामुळे परळी अहमदनगर हा रेल्वेमार्ग अर्धवट असल्याचेही ते म्हणाले.


विरोधक गैरसमज पसरवत आहेत
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अभ्यास न करताच विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र, मोदी सरकारने सामान्य जनतेच्या आणि राष्ट्रीय विकासाच्या कामाचा आढावा घेऊन हा अर्थसंकल्प जनतेसमोर ठेवला आहे. आणि त्या तरतुदी सामान्य माणसाला कळव्यात हा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.


ही तर कर्तृत्व दाखविण्याची लढत

जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट पडले आहेत. खासदार रावसाहेब दानवे यांचा गट आणि माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचा दुसरा गट. वेगवेगळ्या बैठकांसाठी जिल्ह्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांची पळवा पळवी करण्यासारखे प्रकार होताना दिसतात. दानवे आणि लोणीकर यांच्यासारखी माणसे भाजपला मिळाली हे भाग्यच आहे. आपले काम दाखवण्यासाठी आणि आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही भाऊ लढत असल्याचे अजब व्यक्तव्य शितोळे यांनी केले

Last Updated : Feb 12, 2021, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.