ETV Bharat / state

जळगावमध्ये आज शरद पवार-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

author img

By

Published : Feb 15, 2020, 9:57 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज जळगावमध्ये सेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला हे दोन्ही नेते संबोधीत करणार आहेत.

Today Uddhav Thackeray and Sharad Pawar visit Jalgaon
आज जळगावमध्ये पवार-ठाकरे एकाच व्यासपीठावर

जळगाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (शनिवार)जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोघांचाही पहिलाच जळगाव दौरा आहे. यावेळी जळगावमध्ये शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही नेते शेतकऱ्यांना यावेळी संबोधित करणार आहेत.

या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकरी प्रश्नांसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा जिल्ह्यावासीयांकडून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मुक्ताईनगर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी जळगाव येथे जैन हिल्सवर दुपारी १२ वाजता होणाऱ्या पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी देखील हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. ठाकरे व पवार यांच्यासोबतच कृषीमंत्री दादा भुसे व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

आज जळगावमध्ये पवार-ठाकरे एकाच व्यासपीठावर, कार्यक्रमाची तयारी पूर्ण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदूरबार येथे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनांसाठी येत आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेला शहराच्या विकासासाठी नगरोथ्थान योजनेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन होवून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आले. त्यानंतर जळगाव महापलिकेला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती देण्यात आली आहे. या निधीची स्थगिती उठवून महापालिकेच्या आणखी २० कोटी रुपयांच्या कामांना मुदतवाढ देण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांना साकडे घालणार आहेत. यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. यासह जिल्ह्यातील गिरणेवरील ७ बलून बंधारे, पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज प्रकल्प, भागपूर उपसा सिंचन योजना या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना देखील मुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून चालना मिळावी, अशी अपेक्षा आहे.

सरसकट कर्जमाफीसाठी साकडे-

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीतील जळगाव जिल्ह्याचा पहिलाच दौरा आहे. मुक्ताईनगर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे व पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने शेतकरी हिताच्या घोषणेची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

राजकीय समीकरणांसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण -

मुख्यमंत्री ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा दौरा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधानसभा निवडणूक भाजप-सेना युतीने एकत्रीतपणे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात लढवली. मात्र, निकालानंतर भाजपला दूर ठेवत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मोट बांधून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे जिल्ह्यात देखील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या धाग्यात एकत्रीत बांधण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला राजकीय महत्त्व आहे.

जळगाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (शनिवार)जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोघांचाही पहिलाच जळगाव दौरा आहे. यावेळी जळगावमध्ये शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही नेते शेतकऱ्यांना यावेळी संबोधित करणार आहेत.

या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकरी प्रश्नांसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा जिल्ह्यावासीयांकडून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मुक्ताईनगर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी जळगाव येथे जैन हिल्सवर दुपारी १२ वाजता होणाऱ्या पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी देखील हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. ठाकरे व पवार यांच्यासोबतच कृषीमंत्री दादा भुसे व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

आज जळगावमध्ये पवार-ठाकरे एकाच व्यासपीठावर, कार्यक्रमाची तयारी पूर्ण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदूरबार येथे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनांसाठी येत आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेला शहराच्या विकासासाठी नगरोथ्थान योजनेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन होवून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आले. त्यानंतर जळगाव महापलिकेला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती देण्यात आली आहे. या निधीची स्थगिती उठवून महापालिकेच्या आणखी २० कोटी रुपयांच्या कामांना मुदतवाढ देण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांना साकडे घालणार आहेत. यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. यासह जिल्ह्यातील गिरणेवरील ७ बलून बंधारे, पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज प्रकल्प, भागपूर उपसा सिंचन योजना या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना देखील मुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून चालना मिळावी, अशी अपेक्षा आहे.

सरसकट कर्जमाफीसाठी साकडे-

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीतील जळगाव जिल्ह्याचा पहिलाच दौरा आहे. मुक्ताईनगर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे व पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने शेतकरी हिताच्या घोषणेची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

राजकीय समीकरणांसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण -

मुख्यमंत्री ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा दौरा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधानसभा निवडणूक भाजप-सेना युतीने एकत्रीतपणे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात लढवली. मात्र, निकालानंतर भाजपला दूर ठेवत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मोट बांधून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे जिल्ह्यात देखील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या धाग्यात एकत्रीत बांधण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला राजकीय महत्त्व आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.