ETV Bharat / state

मंदिरात जाताना लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे- गुलाबराव पाटील

कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

author img

By

Published : Nov 15, 2020, 3:59 PM IST

people-need-to-be-self-disciplined-while-going-to-the-temple-said-gulabrao-patil-in-jalgaon
मंदिरात जाताना लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे- गुलाबराव पाटील

जळगाव - राज्य सरकारने पाडव्यापासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील हे दिवाळीसाठी पाळधी गावी आपल्या निवासस्थानी होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मंदिरे तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्यात येतील, असे सांगितले होते. कोरोनाचा संसर्ग आता काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रासह देशभरात कमी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भक्तगणांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

लोकांना हात जोडून विनंती, स्वयंशिस्त पाळा-

राज्यभरातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात येणार आहेत. परंतु, लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. 'डब्ल्यूएचओ'ने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. लोक निश्चितच फिजिकल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशनचा अवलंब करतील, अशी आशा असल्याचेही यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- कोरोना दबा धरुन आहेच, देवदर्शन घेताना काळजी घ्या - संजय राऊत

जळगाव - राज्य सरकारने पाडव्यापासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गुलाबराव पाटील हे दिवाळीसाठी पाळधी गावी आपल्या निवासस्थानी होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मंदिरे तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्यात येतील, असे सांगितले होते. कोरोनाचा संसर्ग आता काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रासह देशभरात कमी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भक्तगणांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

लोकांना हात जोडून विनंती, स्वयंशिस्त पाळा-

राज्यभरातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात येणार आहेत. परंतु, लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. 'डब्ल्यूएचओ'ने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. लोक निश्चितच फिजिकल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशनचा अवलंब करतील, अशी आशा असल्याचेही यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- कोरोना दबा धरुन आहेच, देवदर्शन घेताना काळजी घ्या - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.