ETV Bharat / state

दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

author img

By

Published : May 21, 2020, 7:27 PM IST

भारती ही आपली लहान मुले गजानन व स्वामी यांना सोबत घेऊन मदतीसाठी शेतात निघाली होती. शेतात जाताना तिने जेवणाचा डबा देखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले. मात्र त्यानंतर...

Suicide
मृत चिमुकले

जळगाव - दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. भारती सचिन पाटील (वय 32), गजानन सचिन पाटील (वय 12) आणि स्वामी सचिन पाटील (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.

टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा 21 रोजी सकाळी सहा वाजता गावातील एका तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी गेला होता. नंतर सात वाजता त्याची पत्नी भारती ही आपली लहान मुले गजानन व स्वामी यांना सोबत घेऊन मदतीसाठी शेतात निघाली होती. शेतात जाताना तिने जेवणाचा डबादेखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले. अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र, तो पायी जाईल, त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र, 200 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली. त्याला वाटले, पत्नीला देखील घरी यायचे आहे, म्हणून तो तिची वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. पत्नी अजून कसे येत नाही, म्हणून बघायला गेले असता, त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला.

आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील, पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. विहीर 75 फूट खोल आणि त्यात सुमारे 40 फूट पाणी होते. महिलेसह दोन मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतून पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर पाणी कमी झाल्यावर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तिघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

सचिन पाटील यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यांचे वडील निवृत्त वायरमन आहेत. सचिन आणि भारती यांचे सुखी आणि कष्टाळू कुटुंब होते. दरम्यान, भारतीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तिने आत्महत्या केली, की काहीतरी अपघात घडला, हे देखील अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही.

जळगाव - दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. भारती सचिन पाटील (वय 32), गजानन सचिन पाटील (वय 12) आणि स्वामी सचिन पाटील (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.

टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा 21 रोजी सकाळी सहा वाजता गावातील एका तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी गेला होता. नंतर सात वाजता त्याची पत्नी भारती ही आपली लहान मुले गजानन व स्वामी यांना सोबत घेऊन मदतीसाठी शेतात निघाली होती. शेतात जाताना तिने जेवणाचा डबादेखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले. अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र, तो पायी जाईल, त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र, 200 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली. त्याला वाटले, पत्नीला देखील घरी यायचे आहे, म्हणून तो तिची वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. पत्नी अजून कसे येत नाही, म्हणून बघायला गेले असता, त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला.

आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील, पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. विहीर 75 फूट खोल आणि त्यात सुमारे 40 फूट पाणी होते. महिलेसह दोन मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतून पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर पाणी कमी झाल्यावर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तिघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

सचिन पाटील यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यांचे वडील निवृत्त वायरमन आहेत. सचिन आणि भारती यांचे सुखी आणि कष्टाळू कुटुंब होते. दरम्यान, भारतीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तिने आत्महत्या केली, की काहीतरी अपघात घडला, हे देखील अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.