ETV Bharat / state

मध्यरात्री घराला आग लागल्याने दाम्पत्याचा झोपेतच होरपळून मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील गारखेडा येथील घटना

चौधरी दाम्पत्य हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपले. त्यानंतर मध्यरात्र उलटल्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली.

author img

By

Published : May 11, 2021, 3:36 PM IST

dead couple
मृत दाम्पत्य

जळगाव - मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागून पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावी सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. उत्तम श्रावण चौधरी (वय 45) आणि वैशाली उत्तम चौधरी (42) अशी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.

चौधरी दाम्पत्य हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपले. त्यानंतर मध्यरात्र उलटल्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यात चौधरी दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रक चालकाने ग्रामस्थांना दिली माहिती -

चौधरी दाम्पत्याच्या घराला आग लागल्यानंतर एक ट्रकचालक ट्रक घेऊन रस्त्याने जात होता. त्याने आगीचे दृश्य पाहिल्यानंतर गावातील लोकांना झोपेतून उठवून त्याने घटनेची माहिती दिली. नंतर ग्रामस्थांनी धाव घेत, मदतकार्याला सुरुवात केली. पण घराचा दरवाजा आतून बंद असल्याने चौधरी दाम्पत्याला वेळीच वाचवता आले नाही. घर लाकडी असल्याने आग भडकली होती. दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. चौधरी दाम्पत्याला एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.

हेही वाचा - ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यास अवघ्या पाच मिनिटांचा उशीर; ११ रुग्णांनी गमावले प्राण

आगीचे कारण अस्पष्ट -

चौधरी दाम्पत्याच्या घराला आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी जामनेर पोलिसांनी पंचनामा केला. घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन, किंवा दिव्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - पुण्यात पत्नीची गळा दाबून तर चिमुकल्याची गळा कापून हत्या, स्वतः घेतला गळफास

जळगाव - मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागून पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावी सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. उत्तम श्रावण चौधरी (वय 45) आणि वैशाली उत्तम चौधरी (42) अशी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.

चौधरी दाम्पत्य हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपले. त्यानंतर मध्यरात्र उलटल्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यात चौधरी दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रक चालकाने ग्रामस्थांना दिली माहिती -

चौधरी दाम्पत्याच्या घराला आग लागल्यानंतर एक ट्रकचालक ट्रक घेऊन रस्त्याने जात होता. त्याने आगीचे दृश्य पाहिल्यानंतर गावातील लोकांना झोपेतून उठवून त्याने घटनेची माहिती दिली. नंतर ग्रामस्थांनी धाव घेत, मदतकार्याला सुरुवात केली. पण घराचा दरवाजा आतून बंद असल्याने चौधरी दाम्पत्याला वेळीच वाचवता आले नाही. घर लाकडी असल्याने आग भडकली होती. दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. चौधरी दाम्पत्याला एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.

हेही वाचा - ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यास अवघ्या पाच मिनिटांचा उशीर; ११ रुग्णांनी गमावले प्राण

आगीचे कारण अस्पष्ट -

चौधरी दाम्पत्याच्या घराला आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी जामनेर पोलिसांनी पंचनामा केला. घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन, किंवा दिव्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - पुण्यात पत्नीची गळा दाबून तर चिमुकल्याची गळा कापून हत्या, स्वतः घेतला गळफास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.