ETV Bharat / state

जळगावात उसळली नागरिकांची गर्दी, किराणा माल भाजीपाला खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

जळगावात नागरिकांची गर्दी उसळली होती. किराणा माल भाजीपाला खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर आल्याचे पहायला मिळाले

author img

By

Published : Apr 21, 2021, 7:08 PM IST

जळगाव
जळगाव

जळगाव - शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. आता तर जिल्ह्याचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. एकीकडे अशी भयावह परिस्थिती असली तरी जळगावात नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, म्हणून राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, बेफिकीर जळगावकरांनी हे निर्बंध अक्षरशः धाब्यावर बसवले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने नागरिक अगदी बिनधास्तपणे घराबाहेर रस्त्यांवर हिंडत आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. सकाळी 7 ते 11पर्यंत बाजारपेठेत खरेदी करता येणार आहे. पहिल्याच दिवशी नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली अॅक्टिव्ह रुग्णसंख्या महिनाभरातच साडेअकरा हजारांच्या पार गेली आहे. मृत्यूदरही अचानक वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक नवे बाधित रुग्ण समोर येत आहेत. दररोज किमान 20 रुग्णांचा बळी जात आहे. दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जळगावकर नागरिक मात्र अगदी बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणून घातली वेळेची मर्यादा-

कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज मर्यादित वेळ दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी याच धर्तीवर जळगावात देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दूध, किराणा माल अशा प्रकारच्या खरेदीसाठी प्रशासनाने सकाळी 7 ते 11 पर्यंत अशी 4 तास मुभा दिली आहे.

याठिकाणी उसळली तोबा गर्दी-

जळगावात बळीराम पेठ, सुभाष चौक, भवानी पेठ, गोलाणी मार्केट परिसर, आसोदा रस्ता, नेरीनाका परिसर अशा ठिकाणी किराणा माल, फळे व भाजीपाला, दूध अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजारपेठ अशी गर्दी उसळू शकते, याची पूर्वकल्पना असूनही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.

'या' राज्यांतून जळगावात येणाऱ्या नागरिकांना आता क्वारंटाईन रहावे लागणार -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा प्रशासनाने एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांतून जळगावात येणाऱ्या नागरिकांना आता यापुढे 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. या नागरिकांची रेल्वे स्थानकावरच अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल. ज्यांची निगेटिव्ह आली त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर उपाययोजना केली असून, त्यासाठी विशेष अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे आदेश काढले आहेत. आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

जळगाव - शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. आता तर जिल्ह्याचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. एकीकडे अशी भयावह परिस्थिती असली तरी जळगावात नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, म्हणून राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, बेफिकीर जळगावकरांनी हे निर्बंध अक्षरशः धाब्यावर बसवले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने नागरिक अगदी बिनधास्तपणे घराबाहेर रस्त्यांवर हिंडत आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. सकाळी 7 ते 11पर्यंत बाजारपेठेत खरेदी करता येणार आहे. पहिल्याच दिवशी नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली अॅक्टिव्ह रुग्णसंख्या महिनाभरातच साडेअकरा हजारांच्या पार गेली आहे. मृत्यूदरही अचानक वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक नवे बाधित रुग्ण समोर येत आहेत. दररोज किमान 20 रुग्णांचा बळी जात आहे. दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जळगावकर नागरिक मात्र अगदी बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे.

म्हणून घातली वेळेची मर्यादा-

कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज मर्यादित वेळ दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी याच धर्तीवर जळगावात देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दूध, किराणा माल अशा प्रकारच्या खरेदीसाठी प्रशासनाने सकाळी 7 ते 11 पर्यंत अशी 4 तास मुभा दिली आहे.

याठिकाणी उसळली तोबा गर्दी-

जळगावात बळीराम पेठ, सुभाष चौक, भवानी पेठ, गोलाणी मार्केट परिसर, आसोदा रस्ता, नेरीनाका परिसर अशा ठिकाणी किराणा माल, फळे व भाजीपाला, दूध अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजारपेठ अशी गर्दी उसळू शकते, याची पूर्वकल्पना असूनही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.

'या' राज्यांतून जळगावात येणाऱ्या नागरिकांना आता क्वारंटाईन रहावे लागणार -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा प्रशासनाने एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांतून जळगावात येणाऱ्या नागरिकांना आता यापुढे 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. या नागरिकांची रेल्वे स्थानकावरच अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल. ज्यांची निगेटिव्ह आली त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर उपाययोजना केली असून, त्यासाठी विशेष अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हे आदेश काढले आहेत. आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.