ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक; जिल्हाभरातील निदर्शने

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अवघी अडीच लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. ही शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक आहे. म्हणून सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी आज (मंगळवारी) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

author img

By

Published : Feb 25, 2020, 2:40 PM IST

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक; जिल्हाभरातील निदर्शने
महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक; जिल्हाभरातील निदर्शने

जळगाव - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे. सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी आज (मंगळवारी) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक; जिल्हाभरातील निदर्शने

भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यात महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला. मात्र, त्यानंतर सरकार स्थापन करताना शिवसेना जनादेशाचा अपमान करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली. या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच सरकारच्या कार्यपद्धतीला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा - विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची निवड

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अवघी अडीच लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. ही शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक आहे. त्याचप्रमाणे गेल्या सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय, प्रकल्पांची कामे देखील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने थांबविण्यात येत आहेत. यामुळे राज्याच्या विकासाचा गाडा अडला आहे. देशविरोधी भूमिका घेणाऱ्या शक्तींना पाठबळ दिले जात आहे. राज्यासह देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या साऱ्या बाबींवर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रकाशझोत टाकला. आंदोलनानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

जळगाव - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे. सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी आज (मंगळवारी) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक; जिल्हाभरातील निदर्शने

भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यात महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला. मात्र, त्यानंतर सरकार स्थापन करताना शिवसेना जनादेशाचा अपमान करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली. या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच सरकारच्या कार्यपद्धतीला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा - विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची निवड

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अवघी अडीच लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. ही शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक आहे. त्याचप्रमाणे गेल्या सरकारच्या काळात घेण्यात आलेले निर्णय, प्रकल्पांची कामे देखील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने थांबविण्यात येत आहेत. यामुळे राज्याच्या विकासाचा गाडा अडला आहे. देशविरोधी भूमिका घेणाऱ्या शक्तींना पाठबळ दिले जात आहे. राज्यासह देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या साऱ्या बाबींवर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रकाशझोत टाकला. आंदोलनानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.