ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन, जिल्ह्यात 30 लाख रुपयांचा दंड वसूल

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश निर्गमित केले होते. मास्क न वापरणाऱ्या नागरिकाला पाचशे रुपये दंड करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे तसेच इतर कारणांसाठी केलेल्या कारवाईपोटी आतापर्यंत 30 लाख 51 हजार 560 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.

author img

By

Published : Sep 6, 2020, 1:00 PM IST

जळगाव
जळगाव

जळगाव - लॉकडाऊनच्या काळात मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे तसेच इतर कारणांसाठी केलेल्या कारवाईपोटी आतापर्यंत 30 लाख 51 हजार 560 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश निर्गमित केले होते. मास्क न वापरणाऱ्या नागरिकाला पाचशे रुपये दंड करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या 1950 व्यक्तींकडून 6 लाख 73 हजार 290 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 341 व्यक्तींकडून 1 लाख 19 हजार रुपये, दुकाने उघडी ठेवणाऱ्या 415 दुकानदारांना 2 लाख 28 हजार 100 रुपये दंड ठोठवण्यात आला. गर्दी करणाऱ्या 576 व्यक्तींकडून 1 लाख 54 हजार 800 रुपये, दुकाने सील केल्यापोटी 317 दुकानदारांकडून 17 लाख 90 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.

उप प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या 16 कारवाईत 1800 रुपये तर इतर कारणांसाठी 203 व्यक्तींकडून 84 हजार 70 रुपये, असे एकूण 30 लाख 51 हजार 560 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात जळगाव शहर महानगर पालिका क्षेत्रात 310 दुकाने सील करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून 17 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्या कार्यक्षेत्रात मास्क न लावणाऱ्या 686 व्यक्तींना 1 लाख 28 हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

जळगाव - लॉकडाऊनच्या काळात मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे तसेच इतर कारणांसाठी केलेल्या कारवाईपोटी आतापर्यंत 30 लाख 51 हजार 560 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश निर्गमित केले होते. मास्क न वापरणाऱ्या नागरिकाला पाचशे रुपये दंड करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या 1950 व्यक्तींकडून 6 लाख 73 हजार 290 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 341 व्यक्तींकडून 1 लाख 19 हजार रुपये, दुकाने उघडी ठेवणाऱ्या 415 दुकानदारांना 2 लाख 28 हजार 100 रुपये दंड ठोठवण्यात आला. गर्दी करणाऱ्या 576 व्यक्तींकडून 1 लाख 54 हजार 800 रुपये, दुकाने सील केल्यापोटी 317 दुकानदारांकडून 17 लाख 90 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.

उप प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या 16 कारवाईत 1800 रुपये तर इतर कारणांसाठी 203 व्यक्तींकडून 84 हजार 70 रुपये, असे एकूण 30 लाख 51 हजार 560 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात जळगाव शहर महानगर पालिका क्षेत्रात 310 दुकाने सील करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून 17 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्या कार्यक्षेत्रात मास्क न लावणाऱ्या 686 व्यक्तींना 1 लाख 28 हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.