ETV Bharat / state

प्लास्टिक मुक्तीसाठी हिंगोलीत 'बर्तन बँक'; बचत गटाचा अनोखा उपक्रम - हिंगोली प्लास्टिक बंदी बातम्या

प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद होण्यासाठी संभाजी विद्यासागर संघामार्फत कार्यक्रमांसाठी मोफत स्टीलची भांडी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.

मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.
author img

By

Published : Nov 1, 2019, 7:06 PM IST

हिंगोली - प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद होण्यासाठी संभाजी विद्या सागर संघामार्फत कार्यक्रमांसाठी मोफत स्टीलची भांडी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.

मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.

नगरपालिकेने शहरात स्वच्छता मोहिम राबवली असून, संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त केले आहे. तसेच हागणदारी मुक्त करण्यावरही शंभर टक्के अंमल केला आहे. पालिकेने सर्वाधिक प्लास्टिक बंदीवर भर देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

मीराबाई यांच्या अनोख्या बँकेद्वारे आता शहरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमधील प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्यास मदत होत आहे. वाढदिवस, नामकरण सोहळा, साखरपुडा, आदी लहान कार्यक्रमांना या बर्तन बँकेद्वारे मोफत स्टीलची भांडे पुरवतात.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कार्यक्रमात भांडी वापरल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी महिलांना मजुरी दिली जाते.

शहरांमध्ये कुठेही कार्यक्रम असल्यास बर्तन बँकमधून मोफत स्टीलची भांडे मिळत असल्याने आता शहरात ही बँक चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या बँकेमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमातील प्लॅस्टिकच्या वस्तू वापरावर आपसूकच आळा बसत असून पैशांची बचत होत आहे.

या उपक्रमासाठी मीराबाई गायकवाड, वर्षा सोनुणे, शोभा डाखोरे, कमलाबाई गायकवाड, कौसाबाई सोनुणे, भारताबाई घोडे, मीराबाई आठवले, लताबाई चांदणे, शांताबाई शेंडे, रत्‍नाबाई कांबळे, रेखाबाई सोनुणे, ज्योती गायकवाड, अशा गायकवाड अशा अनेक महिलांनी पुढाकार घेतला आहे.

नगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होता आल्याचे समाधान वाटत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरणाचे रक्षण करावे; तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुजाण नागरिकाची भूमिका बजवावी, असे आवाहन विद्यासागर महिला संघाच्या वतीने मिराबाई गायकवाड यांनी केले.

हिंगोली - प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद होण्यासाठी संभाजी विद्या सागर संघामार्फत कार्यक्रमांसाठी मोफत स्टीलची भांडी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.

मीराबाई गायकवाड यांनी 'बर्तन बँक' नामक उपक्रम सुरू केला असून, यामार्फत त्या जनजागृती करत आहेत.

नगरपालिकेने शहरात स्वच्छता मोहिम राबवली असून, संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त केले आहे. तसेच हागणदारी मुक्त करण्यावरही शंभर टक्के अंमल केला आहे. पालिकेने सर्वाधिक प्लास्टिक बंदीवर भर देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

मीराबाई यांच्या अनोख्या बँकेद्वारे आता शहरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमधील प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्यास मदत होत आहे. वाढदिवस, नामकरण सोहळा, साखरपुडा, आदी लहान कार्यक्रमांना या बर्तन बँकेद्वारे मोफत स्टीलची भांडे पुरवतात.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कार्यक्रमात भांडी वापरल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी महिलांना मजुरी दिली जाते.

शहरांमध्ये कुठेही कार्यक्रम असल्यास बर्तन बँकमधून मोफत स्टीलची भांडे मिळत असल्याने आता शहरात ही बँक चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या बँकेमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमातील प्लॅस्टिकच्या वस्तू वापरावर आपसूकच आळा बसत असून पैशांची बचत होत आहे.

या उपक्रमासाठी मीराबाई गायकवाड, वर्षा सोनुणे, शोभा डाखोरे, कमलाबाई गायकवाड, कौसाबाई सोनुणे, भारताबाई घोडे, मीराबाई आठवले, लताबाई चांदणे, शांताबाई शेंडे, रत्‍नाबाई कांबळे, रेखाबाई सोनुणे, ज्योती गायकवाड, अशा गायकवाड अशा अनेक महिलांनी पुढाकार घेतला आहे.

नगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होता आल्याचे समाधान वाटत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरणाचे रक्षण करावे; तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुजाण नागरिकाची भूमिका बजवावी, असे आवाहन विद्यासागर महिला संघाच्या वतीने मिराबाई गायकवाड यांनी केले.

Intro:हिंगोली नगर पालिकेने शहरात स्वच्छता मोहीम राबविली असून, शहर प्लॅस्टिक मुक्त केले आहे. एवढेच नव्हे तर शहर हागणदारी मुक्त देखील केलेय. याच बळावर हिंगोली नगर पालिका परितोषिकाची मानकरी ठरलीय. पालिकेने सर्वाधिक जास्त प्लॅस्टिक बंदीवर भर दिलाय तसेच जनजागृती ही केली आहे. हे हळूहळू हिंगोलीकरांच्या ही अंगवळणी पडत आहे. आता प्लॅस्टिक बंदी कायमस्वरूपी बंद व्हावी म्हणून संभाजी विद्या सागर वस्तीस्तर संघा मार्फत मोफत भांडी आपल्या कार्यक्रमासाठी भांडे घ्या बर्तन बँक मधून अन करा तुमचा कार्यक्रम प्लास्टिक मुक्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे खरोखर हिंगोलीकर आपले शहर स्वच्छ व सुंदर असण्यासाठी किती प्रयत्न करीत आहेत याचीच हा उपक्रम पुन्हा एकदा आठवण करून देत आहे.


Body:मीराबाई गायकवाड अस ही बर्तन बँक चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे. मिराबाई ह्या एक बचत गट चालवितात. बचत गटामार्फत त्या नेहमीच समाज उपयोगी विविध उपक्रम राबवितात. त्या ज्या भागात रहिवासी आहेत तो भाग बऱ्या पैकी मागासलेला आहे. त्यामुळे या भागात पाहिजे तेवढा प्लास्टिक मुक्तीला प्रतिसाद मिळत नाही. हे मीराबाई यांच्या लक्षात आले अन आपणही हिंगोलीकरांचे काही देणे लागतो, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये बर्तन बँक सुरू करून आपला ही खारीचा वाटा असे म्हणत सहभागी झाल्या आहेत. वास्तविक पाहता हिंगोली नगरपालिका गेल्या अनेक महिन्यापासून प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती करीत आहेत एवढेच नव्हे तर प्लास्टिक वापरण्यावर कारवाई देखील करीत आहेत तरीदेखील काही नागरिक पालिकेच्या या कारवाईकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे प्लास्टिक वापरतात तसेच कार्यक्रमातही प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याने या बँकेद्वारे आता कार्यक्रमातील प्लास्टिकवर काही प्रमाणात बंदी येण्यास मदत होणार आहे. जेथे कुठे वाढदिवस, नामकरण, साखरपुडा आदी लहान सहान कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात या बँकेद्वारे मोफत स्टील ची भांडे पुरवली जातात. जवळपास दोन महिन्यापासून ही बँक सुरू करण्यात आली आहे. या बँक मुळे बचत गटातील महिलाना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. ज्या कार्यक्रमात ही भांडे वापरली जातात, त्या ठिकाणी भांड्याची स्वच्छता करण्यासाठी एका महिलेला मजुरी दिली जाते. साधारणतः दोनशे रुपये मजुरी त्या महिलेला मिळते. या उपक्रमातुन प्लास्टिक बंदी तर होतेच होतेच. सोबतच बचत गटातील महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे. अन नगर पालिकेच्या महत्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होता आल्याचे समाधान ही लाभल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


Conclusion:शहरांमध्ये कुठेही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात या महिला बचत गटातर्फे स्थापन केलेल्या बर्तन बॅंक मधून अगदी मोफत स्वरूपात स्टील चे भांडे दिले जात असल्याने, आता शहरात ही बँक चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या बँक मुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात प्लॅस्टिकच्या वस्तू वापरावर आपसूकच आळा बसत आहे. या उपक्रमामुळे नसगरिकांचे पैसे देखील वाचत आहेत. या उपक्रमासाठी मिराबाई गायकवाड, वर्षा सोनुणे, शोभा डाखोरे, कमलाबाई गायकवाड, कौसाबाई सोनुणे, भारताबाई घोडे, मीराबाई आठवले, लताबाई चांदणे, शांताबाई शेंडे, रत्‍नाबाई कांबळे, रेखाबाई सोनुणे, ज्योती गायकवाड, अशा गायकवाड अशा अनेक महिलांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा अन् पर्यावरणाचे रक्षण करावे आणि आपली हिंगोली स्वच्छ ठेवण्यासाठी आपण एक सुजाण जागृत नागरिकांची भूमिका बजावावी असे आवाहन या विद्यासागर महिला वस्तीस तर संघाच्यावतीने मिराबाई गायकवाड यांनी केले.


महिला बचत गटाचा फोटो ftp केलेला आहे तो बातमीत वापरावा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.