ETV Bharat / state

आरोपीला फाशीच व्हावी; मृत संतोषच्या नातेवाईकांची मागणी - dead santosh dange death case hingoli

संतोष शंकर डांगे (14) या बालकाचा मोरवाडी येथील स्वतःच्या मेव्हण्यानेच निर्घृण खून केला. मेव्हणा तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी हा लग्न झाले तेव्हापासून पत्नीला भयंकर त्रास देत होता. पत्नीला तो आपल्या आई-वडील, भावासोबत सुद्धा बोलून देत नव्हता. नेहमीच पत्नीवर संशय घेत कधी दोरीने तर कधी बेल्टने मारहाण करीत असे. तसेच तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावत होता. ही बाब सासू-सासऱ्यांच्या कानावर पडू नये म्हणून तो पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात येऊच देत नव्हता.

santosh dange (file pic)
मृत संतोष डांगे
author img

By

Published : Dec 8, 2019, 12:59 PM IST

हिंगोली - माझा पहिला मुलगा खूप आजारी होता, तो बरा व्हावा म्हणून 3 एकर बागायती जमीन विकून उपचार केले. मात्र, शेवटी तो आम्हाला सोडून गेला. त्यामुळेच आम्ही दुसरा मुलगा संतोषचा लाड करीत होतो. केवळ 10 गुंठ्याच्या शेतात राबून त्याचे शिक्षण करीत होतो. तो अभ्यासात खूप हुशार होता म्हणून त्याला कळमनुरी येथील एका खासगी इंग्रजी शाळेत टाकले. मात्र, त्याचा जावयाने भयंकर घात केला. संतोष गेल्याने तर आता आमची आशाच मावळली आहे, अशा आठवणीने संतोषच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे मारेकरी जावयाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोपीला फाशीच व्हावी; मृत संतोषच्या नातेवाईकांची मागणी

संतोष शंकर डांगे (14) या बालकाचा मोरवाडी येथील स्वतःच्या भावोजीनेच निर्घृण खून केला. भावोजी तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी हा लग्न झाले तेव्हापासून पत्नीला भयंकर त्रास देत होता. पत्नीला तो आपल्या आई-वडील, भावासोबत सुद्धा बोलून देत नव्हता. नेहमीच पत्नीवर संशय घेत कधी दोरीने तर कधी बेल्टने मारहाण करीत असे. तसेच तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावत होता. ही बाब सासरच्या मंडळींच्या कानावर पडू नये म्हणून तो पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात येऊच देत नव्हता.

शंकर डांगे यांनी कसेतरी मुलगी दिवाळीचे निमित्त करून माहेरी आणली. तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. पत्नी माहेरी असताना देखील तो तिला लवकर ये नाही तर मी तुझ्या घरातील कुणाला ही संपून टाकेन आशा धमक्या देत होता. मात्र, त्याच्या धमक्यावर कोणी तितके लक्ष देत नसल्याचे शंकर डांगे यांनी सांगितले. तसेच स्वतः सासरे शंकर डांगे यांना देखील त्याने विष घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्याच्यावरील विश्वास उडाल्याचे डांगे यांनी सांगितले. मात्र, संतोषला त्याने शाळेत हेरले. संतोष त्याच्या मित्रासोबत सायकलने शिकवणीला जात होता. तेवढ्यात एक क्रुझर जीप आली आणि त्यातील लोकांनी संतोषचे अपहरण केले.

हेही वाचा - अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह, हिंगोलीतील घटना

हा सर्व प्रकार त्याच्या मित्राने पहिला. त्याने ही बाब संतोषच्या वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी धाव घेऊन कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. तर इकडे जावई तात्याराव आणि त्याचा भाऊ कैलास सूर्यवंशी या दोघांनी मुळावा, उमरखेड परिसरात अजून काही मित्राच्या सहाय्याने संतोषचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरात सुरू असलेल्या केबलच्या खोदकामात त्याचा मृतदेह अर्धवट पुरला.

आपल्या जावयानेच क्रूरपणे मुलाला मारले आहे, याचा विश्वासच संतोषच्या आई-वडिलांना बसत नव्हता. मात्र, जेव्हा आरोपी यामध्ये निष्पन्न झाले. तेव्हा जावयाची खरी क्रुरता समोर आली. या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे.

हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका

विविध कलमानुसार गुन्हा -

याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात आरोपी तात्याराव सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ कैलास सुर्यवंशी याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तात्यारावने खुनाची कबुली दिली आहे. यामध्ये अजून कोणत्या आरोपींचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. तर आरोपी हा दुसरी नावे सांगत नसल्याचे समोर आले आले. दोघांना ही न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनि रणजित भोईटे यांनी सांगितले.

विविध राजकीय पुढाऱ्यांकडून सांत्वन -

संतोष डांगे या शाळकरी बालकाचा भावोजीनेच खून केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे नेते आणि नातेवाईक संतोषच्या आई वडिलांची भेट घेत सांत्वन करीत आहेत. तर कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील संतोषच्या कुटुंबाचे सांत्वन करत ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे म्हणून हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.

हिंगोली - माझा पहिला मुलगा खूप आजारी होता, तो बरा व्हावा म्हणून 3 एकर बागायती जमीन विकून उपचार केले. मात्र, शेवटी तो आम्हाला सोडून गेला. त्यामुळेच आम्ही दुसरा मुलगा संतोषचा लाड करीत होतो. केवळ 10 गुंठ्याच्या शेतात राबून त्याचे शिक्षण करीत होतो. तो अभ्यासात खूप हुशार होता म्हणून त्याला कळमनुरी येथील एका खासगी इंग्रजी शाळेत टाकले. मात्र, त्याचा जावयाने भयंकर घात केला. संतोष गेल्याने तर आता आमची आशाच मावळली आहे, अशा आठवणीने संतोषच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे मारेकरी जावयाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोपीला फाशीच व्हावी; मृत संतोषच्या नातेवाईकांची मागणी

संतोष शंकर डांगे (14) या बालकाचा मोरवाडी येथील स्वतःच्या भावोजीनेच निर्घृण खून केला. भावोजी तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी हा लग्न झाले तेव्हापासून पत्नीला भयंकर त्रास देत होता. पत्नीला तो आपल्या आई-वडील, भावासोबत सुद्धा बोलून देत नव्हता. नेहमीच पत्नीवर संशय घेत कधी दोरीने तर कधी बेल्टने मारहाण करीत असे. तसेच तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावत होता. ही बाब सासरच्या मंडळींच्या कानावर पडू नये म्हणून तो पत्नीला तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात येऊच देत नव्हता.

शंकर डांगे यांनी कसेतरी मुलगी दिवाळीचे निमित्त करून माहेरी आणली. तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. पत्नी माहेरी असताना देखील तो तिला लवकर ये नाही तर मी तुझ्या घरातील कुणाला ही संपून टाकेन आशा धमक्या देत होता. मात्र, त्याच्या धमक्यावर कोणी तितके लक्ष देत नसल्याचे शंकर डांगे यांनी सांगितले. तसेच स्वतः सासरे शंकर डांगे यांना देखील त्याने विष घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्याच्यावरील विश्वास उडाल्याचे डांगे यांनी सांगितले. मात्र, संतोषला त्याने शाळेत हेरले. संतोष त्याच्या मित्रासोबत सायकलने शिकवणीला जात होता. तेवढ्यात एक क्रुझर जीप आली आणि त्यातील लोकांनी संतोषचे अपहरण केले.

हेही वाचा - अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह, हिंगोलीतील घटना

हा सर्व प्रकार त्याच्या मित्राने पहिला. त्याने ही बाब संतोषच्या वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी धाव घेऊन कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. तर इकडे जावई तात्याराव आणि त्याचा भाऊ कैलास सूर्यवंशी या दोघांनी मुळावा, उमरखेड परिसरात अजून काही मित्राच्या सहाय्याने संतोषचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरात सुरू असलेल्या केबलच्या खोदकामात त्याचा मृतदेह अर्धवट पुरला.

आपल्या जावयानेच क्रूरपणे मुलाला मारले आहे, याचा विश्वासच संतोषच्या आई-वडिलांना बसत नव्हता. मात्र, जेव्हा आरोपी यामध्ये निष्पन्न झाले. तेव्हा जावयाची खरी क्रुरता समोर आली. या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे.

हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका

विविध कलमानुसार गुन्हा -

याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात आरोपी तात्याराव सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ कैलास सुर्यवंशी याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तात्यारावने खुनाची कबुली दिली आहे. यामध्ये अजून कोणत्या आरोपींचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. तर आरोपी हा दुसरी नावे सांगत नसल्याचे समोर आले आले. दोघांना ही न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनि रणजित भोईटे यांनी सांगितले.

विविध राजकीय पुढाऱ्यांकडून सांत्वन -

संतोष डांगे या शाळकरी बालकाचा भावोजीनेच खून केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे नेते आणि नातेवाईक संतोषच्या आई वडिलांची भेट घेत सांत्वन करीत आहेत. तर कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील संतोषच्या कुटुंबाचे सांत्वन करत ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे म्हणून हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.

Intro:माझा पहिला मुलगा खूप आजारी होता, तो बरा व्हावा म्हणून पाण्याखालची तीन एकर आलेली जमीन विकून पै - पै जुळवत मुलावर उपचार केले मात्र शेवटी तो आम्हाला सोडून गेला. त्यामुळे आम्ही संतोषचा एवढा लाड करीत होतो, केवळ दहा गुंठ्याच्या शेतात राब राबून त्याचे शिक्षण करीत होतो. तो अभ्यासात खूप हुशार होता म्हणून त्याला कळमनुरी येथील एका खाजगी इंग्रजी शाळेत टाकले तो शाळेतून येताच अगोदर शेतात येत असे, मात्र त्याचा जावयाने भयंकर घात केला. बहिणीचे एवढे भांडण असूनही संतोष हा मेव्हण्या सोबतच नेहमी हसत मुखानेच राहत असे. त्यामुळेच तो हैव्हान असलेल्या जावयाच्या अमिशास बळी पडला. संतोष गेल्याने तर माझी आता अशाच मावळलीय आशा आठवणीने संतोषच्या आई वडीलाने हुंबरडा फोडला. त्यामुळे मारेकरी जावयाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ही केलीय.


Body:संतोष शंकर डांगे (14) या बालकाचा मोरवाडी येथील स्वतःच्या मेव्हण्यानेच निर्घृण खून केलाय. मेव्हणा तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी हा लग्न झाले तेंव्हापासून पत्नी ला भयंकर त्रास देत होता. एवढेच काय तर तो पत्नीला आपल्या आई वडील व भावा सोबत अजिबात बोलत नव्हता. नेहमीच विचित्र वागत असे, संशय घेत पत्नीला कधी दोरीने तर कधी बेल्ट ने मारहाण करीत असे अन तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेऊन ये असा तगादा लावत होता. ही बाब आई वडिलांच्या कानावर पडू नये म्हणून तो पत्नीला तिच्या आई वडिलांच्या संपर्कात येऊच देत नव्हता. कधी जर वडील आले तर अनोळखी व्यक्ती प्रमाणे आई वडील सोबत वागत असे. कशी बशी शंकर डांगे यांनी मुलगी दिवाळीचे निमित्त करून माहेरी आणली तेव्हा कुठे हा भयंकर प्रकार उघडकीस आला. पत्नी माहेरी असताना देखील तो तिला लवकर ये नाही तर मी तुझ्या घरातील कुणाला ही संपून टाकेन आशा धमक्या देत होता. मात्र त्याच्या धमक्यावर कोणी तेव्हडे कोणी लक्ष देत नसल्याचे शंकर डांगे यांनी सांगितले. एवढेच काय तर स्वतः सासरे शंकर डांगे याना देखील त्याने विष घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पासून मात्र त्याच्या वरील विश्वास उडाल्याचे डांगे यांनी सांगितले. मात्र संतोष ला त्याने शाळेत हेरले. संतोष जेव्हा त्याच्या मित्रांसोबत सायकलने शिकवणी वर्गाला जात होता. रस्त्यावर चड आल्याने ते पाई पाई चालत होते. तेवढ्यात एक क्रूझर आली अन त्यात संतोषला उचलू टाकले. हा सर्व प्रकार मित्राने पहिला. त्याने आरडा ओरड केली ही बाब मित्राने संतोषच्या वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी धाव घेऊन कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोष चे अपहरण झाल्याची तक्रार दिली. तर इकडे मेव्हवा तात्याराव अन त्याचाच भाऊ कैलास सूर्यवंशी या दोघांने मुळावा, उमरखेड परिसरात अजून काही मित्राच्या साह्याने संतोष चा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरात सूरु आलेल्या केबल च्या खोदकामात त्याचा मृतदेह अर्धवट पुरला. आपल्या जावयानेच क्रूर पणे मुलाला मारलंय याचा विश्वासच संतोष च्या आई वडीलांना बसेना. जेव्हा आरोपी या मध्ये निष्पन्न झाले तेव्हा मात्र जावयाची खरी क्रुतरता समोर आली. या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांच्या संतोष च्या वडिलांच्या फिर्यादीवरून जावया विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.



Conclusion:विविध कलमानुसार गुन्हा


कळमनुरी पोलीस ठाण्यात आरोपी तात्याराव सूर्यवंशी व त्याचा भाऊ कैलास सुर्यवंशी याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तात्यारावने खुनाची कबुली दिली असून, या मध्ये अजूनही कोण कोणत्या आरोपीचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. मात्र आरोपी हा दुसरे नावे सांगत नसल्याचे समोर आले आले. दोघांना ही न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनी रणजित भोईटे यांनी सांगितले.



विविध राजकीय पुढाऱ्यांकडून सांत्वन

संतोष डांगे या शाळकरी बालकाचा मेव्हण्यानेच खून केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे नेते व नातेवाईक संतोष च्या आई वडिलांची भेट घेत सांत्वन करीत आहेत तर कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील संतोष च्या कुटुंबाचे सांत्वन करीत ही घटना माणुसकीला काळी माँ फासणारी आल्याने हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. तसेच संतोषच्या आई वडिलांना न्याय मिळून देण्यासाठी कायम सोबत राहणार आल्याचे सांगितले. तर संतोषच्या आठवणी सांगता सांगता बहीण, आई वडिलांचे अश्रू अनावर होत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.