ETV Bharat / state

हिंगोलीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच मुंदडा समर्थकांचा गोंधळ; हेमंत पाटील विरोधात नाराजी

हिंगोलीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच्या बैठकीत मुंदडा समर्थकांचा राडा... हेमंत पाटलांना उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूर.. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हेंमत पाटलांचा उमेदवारी अर्ज होणार दाखल.

author img

By

Published : Mar 26, 2019, 1:03 PM IST

मुंदडा समर्थकांचा गोंधळ

हिंगोली - लोकसभा दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अंतिम दिवस आहे. आज काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याच्या नियोजनासाठी महायुतीने सोमवारी वसमत येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, मुंदडा समर्थकांनी यावेळी गोंधळ घातला. लोकसभेसाठी मुंदडा यांना तिकीट नाकारल्याच्या नाराजीतून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

मुंदडा समर्थकांचा गोंधळ

लोकसभेसाठी तिकीट देताना ज्याप्रमाणे जातीय समीकरणावरुन हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित केली, त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुखही बदलावा, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आधी आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या नंतरच पुढचे बोला, असा पवित्रा घेल्याने संपर्क प्रमुखांसमोरही मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. त्यामुळे काही वेळातच ही बैठक गुंडाळण्यात आली. दरम्यान या तिढ्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कशा प्रकारे मार्ग काढतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली लोकसभेसाठी अनेक पक्षांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, संभाव्य उमेदवारांना रिंगनाबाहेर काढल्याने त्यांच्यात नाराजीचा सुर कायम आहे. त्यामुळे नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करतात की काय ? अशी परिस्थिती सध्या हिंगोलीत पाहायला मिळत आहे. याचे ताजे-तवाने उदाहरण म्हणजे सोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या भाषणावेळी मुंदडा समर्थकांनी गोंधळ घातला. हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी का दिली, असा सवाल या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. पाटील यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्तेच संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. मुंदडा सनर्थकांचा अंतर्गतवाद चव्हाट्यावर आलाय. हा गोंधळ उडाल्याने समोर पत्रकार आहेत. हा वाद आपण घरच्या घरी मिटवू, असे म्हणत बैठक गुंडाळण्यात आली. आता उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देशन भरण्यासाठी दाखविण्यात येणाऱ्या शक्ती प्रदर्शनामध्येही, हे नाराज कार्यकर्ते सहभागी होतील किंवा नाही याचीही चर्चा जोरात रंगत आहे.

या पद्धधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती -

हिंगोली मतदारसंघातून अर्ज भरण्यासाठी आज सर्वच उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी शहरात आज महायुतीच्या उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर काँग्रेसकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी हिंगोलीत दाखल होणार आहेत.

हिंगोली - लोकसभा दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अंतिम दिवस आहे. आज काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याच्या नियोजनासाठी महायुतीने सोमवारी वसमत येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, मुंदडा समर्थकांनी यावेळी गोंधळ घातला. लोकसभेसाठी मुंदडा यांना तिकीट नाकारल्याच्या नाराजीतून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

मुंदडा समर्थकांचा गोंधळ

लोकसभेसाठी तिकीट देताना ज्याप्रमाणे जातीय समीकरणावरुन हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित केली, त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुखही बदलावा, अशी मागणी यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आधी आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या नंतरच पुढचे बोला, असा पवित्रा घेल्याने संपर्क प्रमुखांसमोरही मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. त्यामुळे काही वेळातच ही बैठक गुंडाळण्यात आली. दरम्यान या तिढ्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कशा प्रकारे मार्ग काढतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली लोकसभेसाठी अनेक पक्षांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, संभाव्य उमेदवारांना रिंगनाबाहेर काढल्याने त्यांच्यात नाराजीचा सुर कायम आहे. त्यामुळे नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करतात की काय ? अशी परिस्थिती सध्या हिंगोलीत पाहायला मिळत आहे. याचे ताजे-तवाने उदाहरण म्हणजे सोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या भाषणावेळी मुंदडा समर्थकांनी गोंधळ घातला. हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी का दिली, असा सवाल या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. पाटील यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्तेच संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. मुंदडा सनर्थकांचा अंतर्गतवाद चव्हाट्यावर आलाय. हा गोंधळ उडाल्याने समोर पत्रकार आहेत. हा वाद आपण घरच्या घरी मिटवू, असे म्हणत बैठक गुंडाळण्यात आली. आता उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देशन भरण्यासाठी दाखविण्यात येणाऱ्या शक्ती प्रदर्शनामध्येही, हे नाराज कार्यकर्ते सहभागी होतील किंवा नाही याचीही चर्चा जोरात रंगत आहे.

या पद्धधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती -

हिंगोली मतदारसंघातून अर्ज भरण्यासाठी आज सर्वच उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी शहरात आज महायुतीच्या उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर काँग्रेसकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी हिंगोलीत दाखल होणार आहेत.

Intro:हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. या नियोजनासाठी महायुतीने वसमत येथे घेतलेल्या बैठकीत मुंदडा समर्थानी मुंदडा यांचे लोकसभेसाठी तिकीट नाकारल्याने एकच गोंधळ घातला. ज्या प्रमाणे जातीय समिकरणावरून हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित केली त्याच प्रमाणे जिल्हाप्रमुख ही बदलण्याची मागणी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांनी लावून धरली. पहिले आमच्या प्रश्नाचे उत्तर नंतरच पुढचे बोला. असा पवित्रा घेल्याने संपर्क प्रमुखा समोरही मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही वेळात ही बैठक गुंडाळली. तर आदित्य ठाकरे काय दिलजमाई करतील याकडे आता लक्ष लागले आहे.

या पद्धधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती
महायुतीच्या उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री दिलीप कांबळे
काँग्रेस कडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अशोक चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी हिंगोलीत दाखल होणार आहेत.




Body:हिंगोली लोकसभेसाठी अनेक पक्षांची उमेदवारी जाहिर झाली. मात्र उमेदवारीच्या रिंगणात असल्याना रिंगनाबाहेर काढल्या गेल्याने त्यांच्यात नाराजीचा सुर कायम आहे. त्यामुळे नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करतात की काय ? याचे ताजे तवाने उदाहरण म्हणजे सोमवारी सायंकाळ च्या सुमारास जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या व त्यांच्या बरोबर उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांच्या प्रमुक उपस्थितीत खाजगी जागेत घेतलेल्या बैठकीत लोकसभे बाहेरच्या हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी का दिली असे म्हणत आनंदराव जाधव यांचे संभाषण सुरू असताना समोरील बसलेल्या शिवसणीक तथा भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर उगवला. पाटिल याना उमेदवारी दिल्याने कार्यकर्तेच संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर जिल्हाप्रमुखही बदला अशी मागणी चक्क संपर्क प्रमुखाकडे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काही तास चालणारी बैठक, माननीय ममहोदयांना अवघ्या काही वेळातच मोडावी लागल्याचे दिसून आले. यामुळे पुन्हा एकदा मुंदडा सनर्थकांचा अंतर्गतवाद चव्हाट्यावर आलाय. हा गोंधळ उडाल्याने समोर पत्रकार आहेत. हा वाद आपण घरच्या घरी मिटवू असे म्हणत बैठकीने गाशा गुंडाळला. तर हा वाद बऱ्याच जणांनी मोबाइल मध्ये ही कैद केला. उमेदवारी मिळवून घेण्याच्या काळातही मातोश्रीवर ही मुंदडा समर्थक आणि हेमंत पाटील समर्थकांमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते.



Conclusion:पुन्हा एकदा हाच वाद वसमत येथे उफळल्याने मंगळवारी नामनिर्देशन भरण्याच्या दिवशी येणारे शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यात लक्ष घालून कशी दिलजमाई करतील अन मुंदडा समर्थकांची कशी नाराजगी दूर करतील, याकडे संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी नामनिर्देशन भरण्यासाठी दाखविण्यात येणाऱ्या शक्ती प्रदर्शनामध्येही, हे नाराज कार्यकर्ते सहभागी होतील किंवा नाही याचीही चर्चा जोरात रंगत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.