ETV Bharat / state

कामाच्या शोधात मजुरांचे स्थलांतर; शिक्षणासाठी मुले मात्र गावातच

author img

By

Published : Jan 23, 2020, 4:30 PM IST

मजुरांना काम मिळत नसल्याने मजूर कुटुंबासह पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी धाव घेत आहेत. कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे अशी परिस्थिती आहे. या गावची 700 ते 800 लोकसंख्या असून 100 टक्के आदिवासी बहुल गाव आहे. मुला-बाळांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी घरातील वयोवृद्ध मंडळींना गावात ठेवल आहे

migration-of-laborers-for-searching-work-in-hingoli
migration-of-laborers-for-searching-work-in-hingoli

हिंगोली- जिल्ह्यातील अनेक गावातील मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. मात्र, मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून वयोवृद्ध मंडळी चिमुकल्यांचा सांभाळ करीत असल्याचे विदारक चित्र कळमनुरी तालुक्यातल्या असोलवाडी येथे पाहायला मिळत आहे.

कामाच्या शोधात मजुरांचे स्थलांतर

हेही वाचा- माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल

मजुरांना काम मिळत नसल्याने मजूर कुटुंबासह पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी धाव घेत आहेत. कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे अशी परिस्थिती आहे. या गावची 700 ते 800 लोकसंख्या असून 100 टक्के आदिवासी बहुल गाव आहे. मुला-बाळांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी घरातील वयोवृद्ध मंडळींना गावात ठेवल आहे. शासन मजुरांची भटकंती थांबवण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातच कामे उपलब्ध करून देत असल्याचा कागावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात काम उपलब्ध नसल्याने इच्छा नसतानाही मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे.

कामाच्या शोधात मजूर ऊस तोडीसाठी जात पोटाची खळगी भरत आहेत. असोलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना हमीपत्र देऊन त्यांना मिळेल त्या शाळेत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे जवळपास 12 विद्यार्थ्यांना शाळेतून हमी पत्र दिले असल्याचे मुख्यध्यापक एस. एस. मोरे यांनी सांगितले. या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांना घरकूल मिळाले आहे. मात्र, वाळू अभावी घरकूल बंद पडलेल्या स्थितीत आहेत. येथील मजुरांना बाहेरगावी जाऊन काम केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे येथील वयोवृद्ध मंडळी सांगतात. तर चिमुकले मोठा साहेब होण्याची स्वप्न उराशी बाळगून आपल्या आई-वडिलांच्या प्रतीक्षेत शिक्षण घेत आहेत.

हिंगोली- जिल्ह्यातील अनेक गावातील मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. मात्र, मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून वयोवृद्ध मंडळी चिमुकल्यांचा सांभाळ करीत असल्याचे विदारक चित्र कळमनुरी तालुक्यातल्या असोलवाडी येथे पाहायला मिळत आहे.

कामाच्या शोधात मजुरांचे स्थलांतर

हेही वाचा- माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल

मजुरांना काम मिळत नसल्याने मजूर कुटुंबासह पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी धाव घेत आहेत. कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे अशी परिस्थिती आहे. या गावची 700 ते 800 लोकसंख्या असून 100 टक्के आदिवासी बहुल गाव आहे. मुला-बाळांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी घरातील वयोवृद्ध मंडळींना गावात ठेवल आहे. शासन मजुरांची भटकंती थांबवण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातच कामे उपलब्ध करून देत असल्याचा कागावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात काम उपलब्ध नसल्याने इच्छा नसतानाही मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे.

कामाच्या शोधात मजूर ऊस तोडीसाठी जात पोटाची खळगी भरत आहेत. असोलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांना हमीपत्र देऊन त्यांना मिळेल त्या शाळेत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे जवळपास 12 विद्यार्थ्यांना शाळेतून हमी पत्र दिले असल्याचे मुख्यध्यापक एस. एस. मोरे यांनी सांगितले. या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांना घरकूल मिळाले आहे. मात्र, वाळू अभावी घरकूल बंद पडलेल्या स्थितीत आहेत. येथील मजुरांना बाहेरगावी जाऊन काम केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे येथील वयोवृद्ध मंडळी सांगतात. तर चिमुकले मोठा साहेब होण्याची स्वप्न उराशी बाळगून आपल्या आई-वडिलांच्या प्रतीक्षेत शिक्षण घेत आहेत.

Intro:*




हिंगोली- जिल्ह्यातील अनेक गावांत मजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याचे भयंकर चित्र आहे. त्यामुळे मजुरांना कामाच्या शोधात पर जिह्यासह पर राज्यात धाव घ्यावी लागली असल्याने, जिल्ह्यातील अनेक गावेच्या गावे ओस पडलीय. मुलाबाळांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून वयोवृद्ध मंडळी त्या चिमुकल्यांचा सांभाळ करीत आल्याचे विदारक चित्र कळमनुरी तालुक्यातल्या असोलवाडी येथे दिसून आलेय.

Body:मुंबई सारख्या ठिकाणी हाताला काम मिळावे म्हणून, नाईट लाइफ सुरू केलीय. त्यामध्ये ते जीवन जगत जीवनाचा आनंद घेत आहेत. तर दुरीकडे मात्र हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांत दिवसाला ही कामच मिळत नसल्याने, मजूर आपल्या सह कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी धाव घेत आहेत. कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे हे भयंकर दृश्य पहावयास मिळालेय. 700 ते 800 येथील लोकसंख्या असून, 100 टक्के आदिवासी बहुल गाव आहे. आपल्या मुला बाळांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्यासाठी आई वडिलांना घरातील वयोवृद्ध मंडळींना गावात ठेवलंय. एकीकडे शासन मजुरांची भटकंती थांबवण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातच कामे उपलब्ध करून देत असल्याचा कागावा करतंय. तर दुरीकडे मात्र प्रत्यक्षात कामेच उपलब्ध नसल्याने, इच्छा नसताना ही मजुरांना पर गावी धाव घ्यावी लागतेय. कामाची वानवा वाढती महागाई यामुळे अपुऱ्या पडणाऱ्या पैशाची जुळवा जुळव करताना मुजुरांची चांगलीच दमछाक होतेय. त्यामुळे ऊस तोडी ची उचलून पोटाची खळगी भरली जातात. ऊस तोडणी च्या काळात हे मजूर त्या- त्या गावात धाव घेतात. वास्तविक पाहता या मजुरांचा जीवन जगण्याचा जोरात संघर्ष सुरू आहे. असोलवाडी येथील जि. प. शाळेंच्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांचे हमीपत्र देऊन त्यांना मिळेल त्या शाळेत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय. Conclusion:जवळपास 12 विद्यार्थ्यांना शाळेतून हमी पत्र दिले आल्याचे मुख्यध्यापक एस. एस. मोरे यांनी सांगितले. या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे मात्र वाळू अभावी घरकुल बंद पडलेल्या स्थितीत आहेत त्यातच जवळची दमडीही संपूर्ण गेल्याने मजुरांना बाहेरगावी जाऊन काम केल्याशिवाय पर्यायच नसल्याचं येथील वयोवृद्ध मंडळी सांगत आहे.
तर चिमुकले मोठा साहेब होण्याची स्वप्न उराशी बाळगून आपल्या आई वडिलांच्या प्रतिक्षेत शिक्षण घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.