ETV Bharat / state

तेलंगणा पोलीस मारहाण प्रकरण : भयभीत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे घेतली धाव - front of the district office to withdraw the crime

गुरवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेऊन या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक न करण्याची मागणी केली आहे.

हिंगोलीत तेलंगणा पोलिसांना मारहाण ; भयभीत ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
author img

By

Published : Nov 8, 2019, 10:34 AM IST

हिंगोली - गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गणेश गायकवाड नावाच्या व्यक्तीला आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरनकर्ते समजून पोलिसांनाच डांबल्यामुळे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयाकडे धाव घेऊन त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

हिंगोलीत तेलंगणा पोलिसांना मारहाण ; भयभीत ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव


सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड यास पोलीसांनी विचारपूस करून ताब्यात घेतले आणि त्याला मारत चारचाकी वाहनामध्ये टाकले. पोलीस नागरी वेशामध्ये असल्यामुळे ग्रामस्थांना ते अपहरणकर्ते असल्याची शंका आली. ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालून गणेशची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेत एका खोलीमध्ये डांबून ठेवले.


गोरेगाव पोलीसांनी याप्रकरणी चोकशी केली असता ते आंध्र प्रदेशातील पोलीस असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मारहाण केल्यामुळे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


काय प्रकरण?
तेलंगणामध्ये फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्या चार पैकी हिंगोली जिल्ह्यातील एक आरोपी असून तो वाघजाळी येथील आहे. त्यानुसार आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून तेलंगणा पोलीस म्हाळशी परिसरात दाखल झाली. त्यावेळी मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता गणेश समोर आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हिंगोली - गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गणेश गायकवाड नावाच्या व्यक्तीला आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरनकर्ते समजून पोलिसांनाच डांबल्यामुळे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयाकडे धाव घेऊन त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

हिंगोलीत तेलंगणा पोलिसांना मारहाण ; भयभीत ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव


सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या म्हाळशी येथील गणेश सीताराम गायकवाड यास पोलीसांनी विचारपूस करून ताब्यात घेतले आणि त्याला मारत चारचाकी वाहनामध्ये टाकले. पोलीस नागरी वेशामध्ये असल्यामुळे ग्रामस्थांना ते अपहरणकर्ते असल्याची शंका आली. ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालून गणेशची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेत एका खोलीमध्ये डांबून ठेवले.


गोरेगाव पोलीसांनी याप्रकरणी चोकशी केली असता ते आंध्र प्रदेशातील पोलीस असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मारहाण केल्यामुळे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


काय प्रकरण?
तेलंगणामध्ये फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्या चार पैकी हिंगोली जिल्ह्यातील एक आरोपी असून तो वाघजाळी येथील आहे. त्यानुसार आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून तेलंगणा पोलीस म्हाळशी परिसरात दाखल झाली. त्यावेळी मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता गणेश समोर आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Intro:


हिंगोली- अजून ही नेमके तेलंगणा पोलिस जिल्ह्यात का दाखल झाली होती, अन म्हाळशीच्या गणेश गायकवाड ला अपहरण केल्यासारखे का ताब्यात घेत होती. याचा अजूनही ताळ मेळ लागलेला नसला तरी या प्रकणात गुन्हा निरपराध गुन्हा दाखल झालेल्या ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज त्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेऊन आमच्या वरील गुन्हे माघे घेण्याची मागणी केलीय.


Body:सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड हे आपल्या मुला समवेत 3 नोव्हेंबर रोजी शेतात जात होते. दरम्यान, अचानक आलेल्या एका विना नंबर च्या चार चाकी वाहनातून तीन ते चार जण उतरले अन त्यांनी गणेश ला अपरहन केल्या प्रमाणे ताब्यात घेतले. गणेश तर जोर जोरात ओरडत होताच. मात्र त्याच्या सोबत जात असलेला त्यांचा मुलगा देखील जोरजोराने ओरडत असल्याने, शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. तो पर्यंत गाडी शेगाव खोडके मार्गे रवाना झाली होती. त्यामुळे म्हाळशी येथील ग्रामस्थांनी शेगाव खोडके येथील ग्रामस्थांशी संपर्क केला. मात्र शेगाव पासून काही अंतरावर यांच्या चारचाकीचे पाटे मोडले होते. तोच ग्रामस्थांनी गाडीतील सर्वांना ताब्यात घेत चोप दिला अन एका घरात डांबले. ही बाब त्या गाडीच्या चालकाने रिसोड पोलिसांना कळविली अन ग्रामस्थानी गोरेगाव पोलिसांना कळविली. त्यानुसार दोन्ही ही ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दाखल होताच मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा उलट प्रकार घडल्याने ग्रामस्थ ही भयभीत झाले त्यामुळे कहानी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलीस अन ग्रामस्थ यांच्या उशिरापर्यंत ही फाईट सुरू होती.

ग्रामस्थांनी उशिराने त्या पोलिसांना ताब्यात दिले.

ग्रामस्थांच्या ताब्यात असलेले तेलंगणा पोलिस महाराष्ट्र पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानी गणेश ला रीसोड येथे नेत पुन्हा गोरेगाव येथे आणून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. अन पुढे जिखासमान्य रुग्णालयात हलविले. एकंदरीतच गणेश जरी नातेवाइकांकडे स्वाधीन केला असला तरी त्याला ताब्यात घेण्याचे कारण अजूनही स्पष्ट समोर आलेले नाही.मात्र पोलिसानी ग्रामस्थांवर दाखल केलेल्या गुन्ह्या मुळे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहेत. त्यामुळे आज ग्रामस्थांनी हिंगोली येथे धाव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेय. अन या प्रकरणाचा पूर्णपणे निकाल लागेपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक न करण्याची मागणी केलीय.

Conclusion:काय आहे नेमकं प्रकरण
तेलंगणात फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्या चार पैकी हिंगोली जिल्ह्यातील एक आरोपी असून तो वाघजाळी येथील आहे. त्यानुसार आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून तेलंगणा पोलीस म्हाळशी परिसरात दाखल झाली अन जवळपास मोबाईल लोकेशन ट्रेस झाले अन गणेशच समोर आला अन त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. गणेश आरोपी असेल तर त्याला सोबत का नेले नाही नसेल तर त्याला चाकू अन बंदूक का दाखवत होते, त्याच्यावर का गुन्हा दाखल केलाय. या सर्व प्रकाराने या भागातील नागरिकांचा अक्षरशः भेजा फ्राय झालाय. गणेश वर हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या प्रकरणात गुन्हे माघे घेतले जातील का? या कडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.