ETV Bharat / state

हिंगोलीत चक्क जिल्हाधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

author img

By

Published : Sep 10, 2019, 5:56 PM IST

हिंगोलीतील येळी येथे जून महिन्यात पाण्यासाठी दोन गटात झालेल्या वादात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यावेळी दाखवलेली अकार्यक्षमता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या चांगलेच अंगलट येताना दिसत आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे जून महिन्यात पाण्यासाठी दोन गटात झालेल्या वादात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतरही घटनास्थळी न जाणे आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना चांगलेच भोवले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

येळी येथील घटनास्थळी न जाणे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना भोवले; विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून जयवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हेही वाचा... हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर, विक्रेत्यांना फटका

काय आहे प्रकरण ?

औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे गंभीर पाणी प्रश्न आहे. नेहमी प्रमाणे दलित वस्तीतील काही कुटुंब पाणी भरण्यासाठी जात होते. मात्र जून महिन्यात गावातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला अन यात चंद्रकलाबाई मोकिंद घुगे, राणोजी मोकिंदा घुगे, दत्ता मोकिंदा घुगे, गणेश विठ्ठल घुगे हे सर्वजण जखमी झाले होते. यापैकी चंद्रकलाबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदेड नंतर तेथून औरंगाबाद येथे नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांचा मृतदेह औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.

हेही वाचा... हिंगोलीकरांना पाण्याचे महत्व उमगले; गणेशभक्तांनी जलसंवर्धनाचा केला संकल्प​​​​​​​

येळीच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र एवढी गंभीर घटना होऊनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घटनास्थळी साधी भेट देखील दिली नव्हती. आता मात्र हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांना चांगलेच भावले आहे., कारण चक्क विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. हा आदेश सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा... बाप्पा मोरया..! हिंगोलीत वृक्षलागवडीची मोठी चळवळ, नाशकात हेल्मेट बाप्पांचे आकर्षण​​​​​​​

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे जून महिन्यात पाण्यासाठी दोन गटात झालेल्या वादात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतरही घटनास्थळी न जाणे आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना चांगलेच भोवले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

येळी येथील घटनास्थळी न जाणे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना भोवले; विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून जयवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हेही वाचा... हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर, विक्रेत्यांना फटका

काय आहे प्रकरण ?

औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे गंभीर पाणी प्रश्न आहे. नेहमी प्रमाणे दलित वस्तीतील काही कुटुंब पाणी भरण्यासाठी जात होते. मात्र जून महिन्यात गावातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला अन यात चंद्रकलाबाई मोकिंद घुगे, राणोजी मोकिंदा घुगे, दत्ता मोकिंदा घुगे, गणेश विठ्ठल घुगे हे सर्वजण जखमी झाले होते. यापैकी चंद्रकलाबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदेड नंतर तेथून औरंगाबाद येथे नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांचा मृतदेह औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.

हेही वाचा... हिंगोलीकरांना पाण्याचे महत्व उमगले; गणेशभक्तांनी जलसंवर्धनाचा केला संकल्प​​​​​​​

येळीच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र एवढी गंभीर घटना होऊनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घटनास्थळी साधी भेट देखील दिली नव्हती. आता मात्र हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांना चांगलेच भावले आहे., कारण चक्क विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. हा आदेश सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा... बाप्पा मोरया..! हिंगोलीत वृक्षलागवडीची मोठी चळवळ, नाशकात हेल्मेट बाप्पांचे आकर्षण​​​​​​​

Intro:ओंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे जून महिन्यात पाण्यासाठी दोन गटात वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला होता. या मध्ये एका महिला गंभीर जखमी झाली होती. तिचा औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. चंद्रकलाबाई मोकिंदा घुगे (५०) असे मयत महिलेचे नाव होते. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र एवढी गंभीर घटना घडली असतानाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती. एवढेच नव्हे तर नातेवाइकांनी विनंती देखील केली होती.


Body:येळी येथे अनेक दिवसांपासून गंभीर पाणी प्रश्न आहे. नेहमी प्रमाणे दलित वस्तीतील काही कुटुंब पाणी भरण्यासाठी जात होते. मात्र जून महिन्यात गावातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला अन यात चंद्रकलाबाई मोकिंद घुगे, राणोजी मोकिंदा घुगे, दत्ता मोकिंदा घुगे, गणेश विठ्ठल घुगे हे सर्वजण जखमी झाले होते. हा हल्लाच एवढा गंभीर होता की, या मध्ये चंद्रकलाबाई गंभीर झाल्या. त्याना उपचारासाठी नांदेड अन तेथूज औरंगाबाद येथे हलविले तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. गुन्हा दाखल केला होता.


Conclusion:ठाण्यामध्ये मोठा जनसमुदाय जमला होता या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती एवढी गंभीर घटना होऊनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घटनास्थळी साधी भेट देखील दिली नव्हती. एवढेच नव्हे तर मयताच्या नातेवाईकांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली तरीदेखील त्या विनंतीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान देखील दिला नाही. मात्र आता हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांना चांगलेच भावले आहे चक्क विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. सध्या ते आदेश सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.