ETV Bharat / state

हिंगोलीत तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोलीतील भगवती येथे तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून राजू दिगंबर जाधव, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

author img

By

Published : Feb 8, 2020, 8:47 AM IST

Farmer died sengaon hingoli
हिंगोलीत तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती येथे तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. राजू दिगंबर जाधव, असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आहेत.

हिंगोलीत तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

सध्या तुरीचा हंगाम जोरात सुरू असून शेतकरी तूर काढण्यासाठी धडपड करीत आहेत. राजू देखील शुक्रवारी आपल्या शेतामध्ये मळणी यंत्रातून तूर काढत होता. यावेळी राजू यांचा तोल जाऊन ते मळणी यंत्रात गेले. त्यानंतर आजूबाजूच्या कामगारांनी एकच आरडाओरड केली. सर्व मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत राजूच्या शरीराचे तुकडे झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.

हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती येथे तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. राजू दिगंबर जाधव, असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आहेत.

हिंगोलीत तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

सध्या तुरीचा हंगाम जोरात सुरू असून शेतकरी तूर काढण्यासाठी धडपड करीत आहेत. राजू देखील शुक्रवारी आपल्या शेतामध्ये मळणी यंत्रातून तूर काढत होता. यावेळी राजू यांचा तोल जाऊन ते मळणी यंत्रात गेले. त्यानंतर आजूबाजूच्या कामगारांनी एकच आरडाओरड केली. सर्व मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत राजूच्या शरीराचे तुकडे झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.

Intro:

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भगवती येथे तुर काढताना मळणी यंत्र मध्ये अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची शुक्रवारी घडली. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केलीय.

Body:राजू डिगंबर जाधव असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या तुरीचा हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी दिवस रात्र मळणी यंत्रातूर काढून घेण्यासाठी धडपड करीत आहेत. अशाच परिस्थितीत राज देखील आपल्या शेतामध्ये मळणी यंत्रातून तुर काढत होता. तर अचानक राजूचा तोल मळणी यंत्रात गेला राजूच्या शरीराचे संपूर्ण तुकडे तुकडे झाले. Conclusion:आजूबाजूला असलेले कामगारानी एकच आरडाओरड केली. रक्ताच्या सर्वत्र चिळकांड्या उडाल्या तोच सर्वांनी आरडा ओरड केली मात्र राजूच्या शरीराचे तो पर्यंत तुकडे हे मळणी यंत्राच्या बाहेर पडले होते.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. घटनास्थळी गोरेगाव पोलिस दाखल झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.