ETV Bharat / state

हिंगोलीतील 'त्या' मच्छिमाराचा मृत्यू विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळेच

author img

By

Published : Dec 10, 2019, 11:57 PM IST

येलदरी धरणातून नदी पात्रात वाहणाऱ्या पाण्यात मासे पकडण्यास गेलेल्या सोपानच्या मृत्यूला विद्युत वितरण विभागच कारणीभूत असल्याचे अनधिकृत जोडणीमुळे उघड झाले आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचा अलबेल कारभार समोर आला आहे. ही घटना सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात घडली होती.

Hingoli fisherman death
हिंगोलीतील 'त्या' मच्छिमाराचा मृत्यू विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळेच

हिंगोली - येलदरी धरणातून नदी पात्रात वाहणाऱ्या पाण्यात मासे पकडण्यास गेलेल्या सोपानच्या मृत्यूला विद्युत वितरण विभागच कारणीभूत असल्याचे अनधिकृत जोडणीमुळे उघड झाले आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचा अलबेल कारभार समोर आला आहे. ही घटना सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात घडली होती. याप्रकरणी अभियंत्यांसह ज्यांच्या शेतात अनधिकृत वीज जोडणी दिली होती त्यांच्या विरुद्ध आत्माराम दूभळकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता विद्युत मंडळ हिंगोली, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत मंडळ सेनगाव व गजानन गंगाराम थोरले, राजू गंगाराम थोरवे या सर्वांचा आरोपींमध्ये समावेश आहे. नदी परिसरात असलेल्या शेत शिवारात ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची इलेक्ट्रिक लाईन अनधिकृतपणे जोडली होती. खांब नदी पात्रात असल्याने तसेच सतत विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यात आल्याने सोपान दुभळकर यांचा थर्माकॉलच्या होडीवरून जाळे सोडताना लोंबत्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस वितरण विभाग आणि शेतकरीच जबाबदार असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर हे करीत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याआधी तीन ते चार घटना अशाच प्रकारच्या घडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिंगोली - येलदरी धरणातून नदी पात्रात वाहणाऱ्या पाण्यात मासे पकडण्यास गेलेल्या सोपानच्या मृत्यूला विद्युत वितरण विभागच कारणीभूत असल्याचे अनधिकृत जोडणीमुळे उघड झाले आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचा अलबेल कारभार समोर आला आहे. ही घटना सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात घडली होती. याप्रकरणी अभियंत्यांसह ज्यांच्या शेतात अनधिकृत वीज जोडणी दिली होती त्यांच्या विरुद्ध आत्माराम दूभळकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता विद्युत मंडळ हिंगोली, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत मंडळ सेनगाव व गजानन गंगाराम थोरले, राजू गंगाराम थोरवे या सर्वांचा आरोपींमध्ये समावेश आहे. नदी परिसरात असलेल्या शेत शिवारात ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची इलेक्ट्रिक लाईन अनधिकृतपणे जोडली होती. खांब नदी पात्रात असल्याने तसेच सतत विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यात आल्याने सोपान दुभळकर यांचा थर्माकॉलच्या होडीवरून जाळे सोडताना लोंबत्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस वितरण विभाग आणि शेतकरीच जबाबदार असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर हे करीत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याआधी तीन ते चार घटना अशाच प्रकारच्या घडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Intro:


हिंगोली- सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात येलदरी धरणातून नदी पत्रात वाहणाऱ्या पाण्यात मच्छि पकडण्यास गेलेल्या सोपानच्या मृत्यूस विद्युत वितरण विभागच कारणीभूत असल्याचं अनधिकृत जोडनींने उघड झालंय. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीचा अलबेल कारभार हा समोर आलाय. अभियंत्यांसह ज्यांच्या शेतात अनधिकृत वीज जोडणी दिली होती त्याच्या विरुद्ध आत्माराम दुभळकर यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.


Body:
अधीक्षक अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता विद्युत मंडळ हिंगोली, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत मंडळ सेनगाव व गजानन गंगाराम थोरले, राजू गंगाराम थोरवे या सर्वांचा आरोपी मध्ये समावेश आहे. नदी परिसरात असलेल्या शेत शिवारात ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची इलेक्ट्रिक लाईन अनधिकृतपणे जोडली होती. पोल हा नदी पत्रात असल्याने अन सतत विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यात आल्याने सोपान दुभळकर यांचा थर्माकॉल च्या होडीवरून जाळे सोडताना लोंबकळत्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस वितरण विभाग अन शेतकरीच जबाबदार असल्याने हा गुन्हा दाखल केलाय. तपास पोनि सरदारसिंह ठाकूर हे करीत आहेत. अजून तरी आरोपीला अटक केलेली नाही. सध्या रबीचा हंगाम जोरात सुरू आहे.Conclusion:शेतकरी जराही जीवाची पर्वा न करता रात्री अपरात्री शेतीला पाणी देत आहेत. मात्र तेथेही लोंबकळत्या तारेला स्पर्श होऊन तीन ते चार घटना घडल्या आहेत. मग त्याला कोण जबाबदार? त्या घटनांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे यात देखील दोषी ला कसा देण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबातून होत आहे. एकंदरीत एका मच्छीमाराच्या मृत्यूमुळे हिंगोली जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा आलबेल कारभार आता चांगलाच चव्हाट्यावर आलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.