ETV Bharat / state

'अहो ऐका ना...आमचे खासदार हरवलेय; तुम्हाला दिसले का?' - हिंगोली खासदार हेमंत पाटील

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील विधानसभा निवडणुकीत देखील जिल्ह्यात आले नाहीत. तसेच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, पत्नीच्या पराभवातून अजूनही न सावरलेले खासदार महोदय जिल्ह्यात दाखल झालेच नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत.

खासदार हेमंत पाटील
author img

By

Published : Nov 4, 2019, 7:04 PM IST

Updated : Nov 4, 2019, 7:16 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तिनही मतदारसंघांचे आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करीत आहेत. मात्र, भरभरून मताधिक्याने निवडून दिलेले हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील कुठेही दिसतच नाहीत. त्यांच्याकडे जराही वेळ नाही. त्यामुळे आमचे खासदार हरवले की काय? अशी भीती वाटत असून त्यांना शोधून आम्हाला द्या, अशी विनंती नागरिक करीत आहेत. एवढेच नाहीतर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी खासदार हरवल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.

'अहो ऐका ना...आमचे खासदार हरवलेय; तुम्हाला दिसले का?'

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील विधानसभा निवडणुकीत देखील जिल्ह्यात आले नाहीत. तसेच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, पत्नीच्या पराभवातून अजूनही न सावरलेले खासदार महोदय जिल्ह्यात दाखल झालेच नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत.

हे वाचलं का? - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन

उपऱ्या म्हणून झालेली टीका पुसण्यासाठी तरी भेट द्या -

लोकसभा निवडणुकीवेळी खासदार हेमंत पाटील यांच्यावर उपऱ्या म्हणून टीका झाली होती. तरीही हिंगोलीकरांनी लाखोंच्या मताधिक्याने पाटील यांना निवडून दिले. रसाळीच्या स्नेह भोजनात दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फक्त ते संपर्कात आहेत. त्यातही फोन नव्हे तर तुमची तक्रार टाका, असे सांगितले आहे. एवढेच नाहीतर त्याला वेळेची मर्यादा देखील घालून दिली आहे. त्यामुळे तुमच्यावर झालेली उपऱ्या नावाची टीका पुसण्यासाठी तरी भेट द्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हे वाचलं का? - अचूक खड्डे मोजा अन् ५ हजार बक्षीस मिळवा; नांदेडमध्ये अनोखी स्पर्धा..!

खासदार महोदय शुभेच्छा फलकावरूनही गायब -

खासदार हेमंत पाटील जिल्ह्यातून गायब झाले आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयानिमित्त शहरात जागो-जागी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहे. त्यावरूनही खासदार महोदय गायब झाले आहेत. खासदाराने प्रशासन स्थरावर पाठपुरावा करून धीर देणे गरजेच आहे. मात्र, तसे अजिबात होत नाही. नांदेड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची हाक फक्त लेटरपॅडवरून दिसत आहे. एकंदरीतच हिंगोलीतून अन् फलकावरून गायब झालेले खासदार हिंगोलीत कधी परत येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली - जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तिनही मतदारसंघांचे आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करीत आहेत. मात्र, भरभरून मताधिक्याने निवडून दिलेले हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील कुठेही दिसतच नाहीत. त्यांच्याकडे जराही वेळ नाही. त्यामुळे आमचे खासदार हरवले की काय? अशी भीती वाटत असून त्यांना शोधून आम्हाला द्या, अशी विनंती नागरिक करीत आहेत. एवढेच नाहीतर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी खासदार हरवल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.

'अहो ऐका ना...आमचे खासदार हरवलेय; तुम्हाला दिसले का?'

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील विधानसभा निवडणुकीत देखील जिल्ह्यात आले नाहीत. तसेच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. जिल्ह्यातील आमदार शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, पत्नीच्या पराभवातून अजूनही न सावरलेले खासदार महोदय जिल्ह्यात दाखल झालेच नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहेत.

हे वाचलं का? - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन

उपऱ्या म्हणून झालेली टीका पुसण्यासाठी तरी भेट द्या -

लोकसभा निवडणुकीवेळी खासदार हेमंत पाटील यांच्यावर उपऱ्या म्हणून टीका झाली होती. तरीही हिंगोलीकरांनी लाखोंच्या मताधिक्याने पाटील यांना निवडून दिले. रसाळीच्या स्नेह भोजनात दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फक्त ते संपर्कात आहेत. त्यातही फोन नव्हे तर तुमची तक्रार टाका, असे सांगितले आहे. एवढेच नाहीतर त्याला वेळेची मर्यादा देखील घालून दिली आहे. त्यामुळे तुमच्यावर झालेली उपऱ्या नावाची टीका पुसण्यासाठी तरी भेट द्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हे वाचलं का? - अचूक खड्डे मोजा अन् ५ हजार बक्षीस मिळवा; नांदेडमध्ये अनोखी स्पर्धा..!

खासदार महोदय शुभेच्छा फलकावरूनही गायब -

खासदार हेमंत पाटील जिल्ह्यातून गायब झाले आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयानिमित्त शहरात जागो-जागी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहे. त्यावरूनही खासदार महोदय गायब झाले आहेत. खासदाराने प्रशासन स्थरावर पाठपुरावा करून धीर देणे गरजेच आहे. मात्र, तसे अजिबात होत नाही. नांदेड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची हाक फक्त लेटरपॅडवरून दिसत आहे. एकंदरीतच हिंगोलीतून अन् फलकावरून गायब झालेले खासदार हिंगोलीत कधी परत येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:हिंगोली चे खासदार हरवल्याची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार


हिंगोली- जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर आलाय जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटलाय. तीनही विधानसभा आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी जिवाचे रान करत आहेत मात्र भरभरून ताधिक्‍याने निवडून दिलेल्या हिंगोली लोकसभेच्या खासदारांना शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी जराही वेळ नाही. त्यामुळे हिंगोलीचे मतदार खासदाराला हिंगोलीची आठवण करून देत तसाही तुमचा उल्लेख हा सोशल मीडियावरून उपरा म्हणूनच होतोय. हे पुसून काढायला तरी एकदा भेट ध्या अशी आर्त करीत आहेत. तर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांनी खासदर हरवल्याची तक्रार केलीय.


Body:हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील हे विधानसभा निवडणुकीत देखील हिंगोली जिल्ह्यात आले नाहीत. तसेच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना सळो कि पळो करून सोडले आहे. अशा परिस्थितीत तीनही विधानसभा मतदारसंघातील आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत. मात्र पत्नीच्या पराभवातून अजूनही न सावरलेले हिंगोली चे खासदार जिल्ह्यात दाखल झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाने जिल्ह्यातील शेतकरी चांगला संतापून गेलाय. एवढेच नव्हे तर खासदारांच्या नावाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायला होत चालल्या आहेत. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्यावर उपऱ्या असल्याची टीका देखील मोठ्या प्रमाणात होत होती. अशाही परिस्थित लाखोंच्या मताधिक्याने खा.पाटील यांनी निवडून आणले. मात्र प्रचारा दरम्यान होत असलेल्या टीकेचा प्रत्येय दुष्काळी परिस्थितीत येत आहे. रसाळीच्या स्नेह भोजनात दिलेल्या तेवढ्या व्हाट्सप नंबर वरून खा. पाटील हे हिंगोलीच्या संपर्कात आहेत. त्यातही फोन नव्हे तर तुमची तक्रार टाका त्याला देखील वेळ घालून दिलीय. या सर्व प्रकरणे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आता खासदारां विषयी संताप व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर खासदार पाटील हे हिंगोली जिल्ह्यातुन गायब झालेच झाले पण हिंगोली अन कळमनुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजया निमित्त शहरात जागो जागी लावलेल्या शुभेच्छा फलकावर देखील पाटील यांचा फोटो गायब झालाय. खर तर शेतकरी मुसळधार पावसामुळे चांगलाच मेटाकुटीस आला आहे. Conclusion:आशा परिस्थितीत खासदाराने प्रसाशन स्थरावर पाठपुरावा करून धीर देणं गरजेच आहे. मात्र तसे अजिबात होत नाही. नांदेड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा तेवढी हाक लेट पॅड वरून दिसत आहे. एकंदरीतच हिंगोलीतुन अन बॅनर वरून गायब झालेले खासदार हिंगोलीत कधी परत येतात याकडे हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एवढेच काय तर खासदार हरवल्याची तक्रार देखील जिल्हा पोलिस अधीक्षका मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
Last Updated : Nov 4, 2019, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.