ETV Bharat / state

...त्या मातेने दिला कन्यारत्नाला जन्म; रस्त्याअभावी रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवले होते खाटेवर

कळमनुरी तालुक्यातील कळवाडी येथील सुवर्णा ढाकणे या गरोदर महिलेला रस्त्याअभावी चक्क खाटेवर टाकून ग्रामस्थांनी चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या महिलेने आज कन्यारत्नाला जन्म दिला आहे.

author img

By

Published : Jul 31, 2019, 10:16 PM IST

हिंगोली

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कळवाडी येथील सुवर्णा ढाकणे या गरोदर महिलेला रस्त्याअभावी चक्क खाटेवर टाकून ग्रामस्थांनी चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या महिलेने आज कन्यारत्नाला जन्म दिला आहे. तर, त्याच रस्त्याने एका दुसऱ्याही गरोदर महिलेला चिखल तुडवत रुग्णालय गाठण्याची वेळ आली आहे. आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळवाडी गावाला भेट दिली, मात्र, रस्ताच नसल्याने ते देखील गावापर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु हारवाडी येथून या गावाला पर्यायी व्यवस्था करून देण्याचे त्यांनी सांगितले. एकीला बाजेचा आधार तर, दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.

...त्या मातेने दिला कन्यारत्नाला जन्म; रस्त्याअभावी मातेला पोहचवले होते खाटेवर

कळमनुरी तालुक्यातील काळवाडी या गावाला रस्ताच नसल्याने या गावातील ग्रामस्थांचा मोठा वनवास सुरू आहे. दर पावसाळ्यात तर रस्त्याची समस्या अधीकच गंभीर होते. मागील वर्षी आणि यंदाही रस्त्याअभावी गरोदर महिलेला खाटेवर टाकून नंदापूर येथे उभ्या असलेल्या, रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यात येते. पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना खरोखरच लाजिरवाणी आहे.

सुवर्णा ढाकणे या महिलेला बाजेवर पोहोचवण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चिखल तुडवत धुरपता पोटे या महिलेला पायपीट करावी लागली. अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे लक्ष दिले नाही. करवाडीपासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी येत मोर्चा देखील काढला होता. परंतु त्याचादेखील काहीही उपयोग झाला नाही.

एकीकडे वर्षानुवर्षे गावाला रस्ते नाहीत तर, दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार असल्याने रातोरात रस्ता बनवला जातो. मात्र, वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी केली जाते तरी, देखील रस्ता बनवला जात नाही. परिणामी, चिखल तुडवत दोन गर्भवती महिलांना रुग्णालय गाठावे लागले. एकीला बाजेचा आधार तर, दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.

त्यामुळेच आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी करवाडी या गावाला भेट देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, रस्त्याअभावी जिल्हाधिकारी गावापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पर्यायी रस्त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, सध्या रेल्वे लाईन असल्याने रस्ता पास करण्याचा प्रस्ताव शासनाच्यावतीने पाठवलेला आहे. मंजुरी मिळताच शासनाच्या योजनेतून हा रस्ता बनवित येऊ शकतो.

ग्रामस्थांना अपेक्षित असलेला रस्ता नरेगा अंतर्गत काही प्रमाणात केला देखील, मात्र हा रस्ता शेतकऱ्यांच्या मालकीचा असल्याने ते शेतकरी जमीन देण्यास अजिबात तयार नाहीत. शिवाय नरेगामध्ये भूसंपादनाची तरतूद देखील नसल्याने हा रस्ता बनू शकला नाही. तसेच रस्त्यासाठी खर्चदेखील जास्त लागणार आहे. आशा वेगवेगळ्या बाबी उघड झाल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कळवाडी येथील सुवर्णा ढाकणे या गरोदर महिलेला रस्त्याअभावी चक्क खाटेवर टाकून ग्रामस्थांनी चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या महिलेने आज कन्यारत्नाला जन्म दिला आहे. तर, त्याच रस्त्याने एका दुसऱ्याही गरोदर महिलेला चिखल तुडवत रुग्णालय गाठण्याची वेळ आली आहे. आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळवाडी गावाला भेट दिली, मात्र, रस्ताच नसल्याने ते देखील गावापर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु हारवाडी येथून या गावाला पर्यायी व्यवस्था करून देण्याचे त्यांनी सांगितले. एकीला बाजेचा आधार तर, दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.

...त्या मातेने दिला कन्यारत्नाला जन्म; रस्त्याअभावी मातेला पोहचवले होते खाटेवर

कळमनुरी तालुक्यातील काळवाडी या गावाला रस्ताच नसल्याने या गावातील ग्रामस्थांचा मोठा वनवास सुरू आहे. दर पावसाळ्यात तर रस्त्याची समस्या अधीकच गंभीर होते. मागील वर्षी आणि यंदाही रस्त्याअभावी गरोदर महिलेला खाटेवर टाकून नंदापूर येथे उभ्या असलेल्या, रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यात येते. पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना खरोखरच लाजिरवाणी आहे.

सुवर्णा ढाकणे या महिलेला बाजेवर पोहोचवण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चिखल तुडवत धुरपता पोटे या महिलेला पायपीट करावी लागली. अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे लक्ष दिले नाही. करवाडीपासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी येत मोर्चा देखील काढला होता. परंतु त्याचादेखील काहीही उपयोग झाला नाही.

एकीकडे वर्षानुवर्षे गावाला रस्ते नाहीत तर, दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार असल्याने रातोरात रस्ता बनवला जातो. मात्र, वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी केली जाते तरी, देखील रस्ता बनवला जात नाही. परिणामी, चिखल तुडवत दोन गर्भवती महिलांना रुग्णालय गाठावे लागले. एकीला बाजेचा आधार तर, दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.

त्यामुळेच आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी करवाडी या गावाला भेट देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, रस्त्याअभावी जिल्हाधिकारी गावापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पर्यायी रस्त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, सध्या रेल्वे लाईन असल्याने रस्ता पास करण्याचा प्रस्ताव शासनाच्यावतीने पाठवलेला आहे. मंजुरी मिळताच शासनाच्या योजनेतून हा रस्ता बनवित येऊ शकतो.

ग्रामस्थांना अपेक्षित असलेला रस्ता नरेगा अंतर्गत काही प्रमाणात केला देखील, मात्र हा रस्ता शेतकऱ्यांच्या मालकीचा असल्याने ते शेतकरी जमीन देण्यास अजिबात तयार नाहीत. शिवाय नरेगामध्ये भूसंपादनाची तरतूद देखील नसल्याने हा रस्ता बनू शकला नाही. तसेच रस्त्यासाठी खर्चदेखील जास्त लागणार आहे. आशा वेगवेगळ्या बाबी उघड झाल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.

Intro: कळमनुरी तालुक्यातील कळवाडी येथील सुवर्णा ढाकणे या महिलेला रस्त्याअभावी चक्क बाजेवर टाकुन ग्रामस्थांनी चिखल तुडवित रुग्णवाहिकेचे पर्यंत पोहोचविले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्या महिलेला आज कन्यारत्न प्राप्त झालेय. तर त्याच रस्त्याने एका दुसऱ्या ही गरोदर मातेला चिखल तुडवीत रुग्णालय गाठण्याची वेळ आज येऊन ठेपली होती. आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी करवाडी गावाला भेट दिली, मात्र रस्ताच नसल्याने ते देखील गावापर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु हारवाडी येथून या गावाला पर्यायी व्यवस्था करून दिल्याचे त्यांनी सांगितले.


Body:कळमनुरी तालुक्यातील कारवाडी या गावाला रस्ताच नसल्याने या गावातील ग्रामस्थांचा मोठा वनवास सुरू आहे. दर पावसाळ्यात तर रस्त्याची समस्या एवढी गंभीर बनतेय, ज्या घरातील महिला किंवा लेखक बाळ गरोदर असते त्या घरातील सदस्यांच्या घशातुन घासच खाली उतरत नाही. मागील वर्षी अन यंदाही रस्त्या अभावी गरोदर मातेला बाजेवर टाकून नंदापुर येथे उभ्या असलेल्या, रुग्णवाहिका पर्यन्त पोहोचण्यात येतंय. पुरोगामी महाराष्ट्रात ही घटना खरोखरच लाजिरवाणी आहे. सुवर्णा ढाकणे या महिलेला बाजेवर पोहोचविण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चिखल तुडवीत धुरपता पोटे या महिलेला पायपीट करावी लागली. अनेकदा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करण्यात आली मात्र प्रशासनाने या मागणीकडे प्रशासनाने अजिबात लक्ष दिले नाही. करवाडी पासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यन्त पायदळी येत मोर्चा देखील काढला होता. परंतु त्याचा देखील काही ही उपयोग झाला नाही.जे व्हायच ते च या देखील पावसाळ्यात घडलं. बाजेचा आधार घेत रुग्णालयापर्यंत पोहोचलेल्या महिले मुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडालीय. अन दुसरीकडे मात्र अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार असल्याने रातोरात रस्ता बनविला जातोय. अन दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी केली जातेय. तरी देखील रस्ता बनविला जात नाही. परिणामी,चिखल तुडवत एका नव्हे दोन गर्भवती मातेला रुग्णालय रुग्णालय गाठावे लागले. एकीला बाजेचा आधार तर दुसऱ्या महिलेला स्वतः चिखलातून रस्ता काढत जावे लागले.
त्यामुळेच आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी करवाडी या गावाला भेट देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र रसत्यभावी जिल्हाधिकारी गावापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र जो पर्यायी रस्ता केला होता, ते बघण्यासाठी गेलो होतो, रस्ता पूर्ण असून देखील या रस्त्याचा वापर का केला नाही. मात्र तो रस्ता पूर्ण आहे. त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र सध्या रेल्वे लाईन असल्याने, रस्ता पास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या वतीने पाठविलेला आहे. मंजुरी मिळताच शासनाच्या योजनेतून हा रस्ता बनवित येऊ शकतो. 1.37 कोटी ची तरतूद पण आहे. हा रस्ता जास्तीत जास्त डिसेंबर पर्यन्त पूर्ण होऊ शकतो. तरी खडीचा रस्ता बनवून दिलेला आहे. तर काल ज्या रस्त्याने त्या गरोदर मातेला आणले होते, त्या रस्त्याची जिल्हाधिकारी यांनी चोकशी केली तर तो रस्ता शेतकऱ्यांच्या मालकीचा असून, ते शेती देखील देण्यासाठी तयार नाहीत.


Conclusion:ग्रामस्थांना अपेक्षित असलेला रस्ता नरेगा अंतर्गत काही प्रमाणात केला देखील, मात्र हा रस्ता शेतकऱ्यांच्या मालकीचा असल्याने, ते शेतकरी देण्यास अजिबात तयार नाहीत. शिवाय नरेगा मध्ये भूसंपादनाची तरतूद देखील नसल्याने हा रस्ता बनू शकला नाही. तसेच रस्त्यासाठी खर्च देखील जास्त लागणार आहे. आशा वेगवेगळ्या बाबी उघड झाल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.




पॅकेज साठी इतर व्हिज्युअल ftp केलेले आहेत. तसेच चिमुकलीचा फोटो देखील
vio
दिलेला आहे त्यावर फक्त ftp चे व्हिज्यु अल वापरावेत.


अन्यथा आपण ही vio देऊ शकता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.