ETV Bharat / state

अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

author img

By

Published : Jan 21, 2020, 4:40 PM IST

Updated : Jan 21, 2020, 5:07 PM IST

मालसेलू येथे दहा ते बारा वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधण्यात आली. मात्र, अर्धवट काम, निकृष्ठ दर्जा यामुळे यात विद्यार्थी बसलेच नाहीत. अंगणवाडीची परिस्थिती पाहून ती उभारलीच कशासाठी? हा प्रश्न पडत आहे.

चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ
चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

हिंगोली - येथील माळसेलूमधील अंगणवाडीची स्थिती दयनीय झाली आहे. पालक आपल्या चिमुकल्यांना अंगणवाडी शाळेत घेऊन जातात. मात्र, अंगणवाडीची दशा पाहून पालकांचा हिरमोड होत आहे. मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत ही अंगणवाडी भरवण्यात येत आहे. मात्र, या विद्यार्थांसाठी हक्काची इमारत उभारून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.

चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

हेही वाचा- झोमॅटोची उबेर इट्सवर मात; खरेदी केला भारतामधील संपूर्ण हिस्सा

मालसेलू येथे दहा ते बारा वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधण्यात आली. मात्र, अर्धवट काम, निकृष्ठ दर्जा यामुळे यात विद्यार्थी बसलेच नाहीत. अंगणवाडीची परिस्थिती पाहून ती उभारलीच कशासाठी? हा प्रश्न पडत आहे. येथील विद्यार्थी दहा ते बारा वर्षांपासून अंगणवाडीच्या मैदानावर धडे गिरवीत आहेत. तीन ते चार वर्षांपासून सार्वजनिक सभागृहाचा आधार घेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

डिजिटल शाळांचा कांगावा शिक्षण विभाग करीत आहे. मात्र, कुठे इमारत नाही, तर कुठे शौचालय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी दैना होत आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 89 अंगणवाडीची संख्या असून, 35 नवीन इमारती प्रस्तावित आहेत. तर 152 अंगणवाडीच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आलेले असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.

हिंगोली - येथील माळसेलूमधील अंगणवाडीची स्थिती दयनीय झाली आहे. पालक आपल्या चिमुकल्यांना अंगणवाडी शाळेत घेऊन जातात. मात्र, अंगणवाडीची दशा पाहून पालकांचा हिरमोड होत आहे. मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत ही अंगणवाडी भरवण्यात येत आहे. मात्र, या विद्यार्थांसाठी हक्काची इमारत उभारून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.

चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

हेही वाचा- झोमॅटोची उबेर इट्सवर मात; खरेदी केला भारतामधील संपूर्ण हिस्सा

मालसेलू येथे दहा ते बारा वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधण्यात आली. मात्र, अर्धवट काम, निकृष्ठ दर्जा यामुळे यात विद्यार्थी बसलेच नाहीत. अंगणवाडीची परिस्थिती पाहून ती उभारलीच कशासाठी? हा प्रश्न पडत आहे. येथील विद्यार्थी दहा ते बारा वर्षांपासून अंगणवाडीच्या मैदानावर धडे गिरवीत आहेत. तीन ते चार वर्षांपासून सार्वजनिक सभागृहाचा आधार घेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

डिजिटल शाळांचा कांगावा शिक्षण विभाग करीत आहे. मात्र, कुठे इमारत नाही, तर कुठे शौचालय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी दैना होत आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 89 अंगणवाडीची संख्या असून, 35 नवीन इमारती प्रस्तावित आहेत. तर 152 अंगणवाडीच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आलेले असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.

Intro:

हिंगोली- पहाटे उठुन शाळेत घेऊन चला म्हणणारी ही चिमुकल्यांची भोभडी शब्द पालकांच्या कानी पडताच आनंदी होऊन पालक आपल्या चिमुकल्यांना शाळेत नेऊन सोडतात. मात्र अंगणवाडीची दशा पाहून पालकांचा हिरमोड होतोय. अंगणवाडीच नसल्याने, मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत तर कधी उघड्यावर बसण्याची भयंकर वेळ माळसेलू येथील अंगणवाडीतील चिमुकल्यावर येऊन ठेपलीय.
ही मन हेलावून टाकणारी दृश्य रस्त्यावरून ये जा करणारी अनेक जण पाहतात. मात्र त्याना हक्काची इमारत उभारून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाहीये.
Body:
मालसेलू येथे दहा ते बारा वर्षांपूर्वी अंगणवाडीच्या इमारतीचे काम केलंय. मात्र कामच दर्जाहीन झाल्याने, एकदा ही या इमारतीत चिमकुले बसलेली नाहीत. इमारतीची दशा पाहून अंगणवाडी नेमकी उभारलीच होती कशासाठी? हा प्रश्न पडल्या शिवाय अजिबात राहत नाही. हक्काची ईमारतच नसल्याने, चिमकुले गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कधी शाळेच्या एका कोण्यात तर कधी मैदानात उघड्यावर बसून धडे गिरवीत आहेत. तीन ते चार वर्षांपासून सार्वजनिक सभागृहाचा आधार चिमकुले घेत खरे मात्र त्या ठिकाण देखील खोडसाळ पणा करणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. कधी त्या सभागृहात माती दगड टाकले जातात तर कधी कचरा फेकून दिला जातोय. अशाच भयंकर परिस्थितीत चिमुकल्यांना धडे गिरवण्याची वेळ येऊन ठेपलीया. अनेकदा ग्रामपंचायतकडे इमारतीची मागणी ही केली. मात्र काही ही उपयोग झालेला नाहीये. शेवटी नाईलाजास्तव मातीत बसून अंगणवाडी ताईंची गीते, खाऊ खाण्याची वेळ आलीय. Conclusion:दुसरीकडे मात्र डिजिटल शाळाचा कांगावा शिक्षण विभाग करीत असून, कुठे इमारत नाही तर कुठे शौचालय नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचा बनाव उघड झाला आहे. ही परिस्थिती केवळ एकदा याच अंगणवाडीची नसून जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांची हीच अवस्था झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या चिमुकल्यांना देखील असाच कुठेतरी आडोसा घेत ज्ञानार्जन घेण्याची वेळ येऊन ठेपली.
Last Updated : Jan 21, 2020, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.