गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव येथे पाण्याच्या टाकीत कुजलेले उंदीर व पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत किती बेजबाबदारपणे काम करत आहे याची प्रचिती आली आहे. मात्र, या प्रकरणाने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा- 2020 मध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - संजय निरुपम
वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. या टाकीत पाणी भरायला गेलेल्या नागरिकांच्या पाण्यात अळ्या आल्याने नागरिकांनी टाकीवर चडून पाहणी केली. यात ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या अवस्थेत टाकीत आढळून आल्या. याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक,आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून देण्यात आली आहे. नारिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ग्राम पंचायतीने ही टाकी बंद असल्याचे लिहिले आहे. मात्र, या पाण्यामुळे कुणाचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? अशा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.
गेल्या २० वर्षा पासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षी पासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. या जुन्या पाणी पुरवठा योजनाकडे दुर्लक्ष करुन पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे टाकीत उंदीर, पाली मरुन पडत आहेत. त्या टाकीतील पाणी आजही वॉर्डातील लोक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत कार्यवाही करुन नारिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नारिकांनी केली आहे.