ETV Bharat / state

पती मुलींचा सांभाळ करत नसल्याने, २७ वर्षीय महिलेची आत्महत्या

मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील येगावच्या एका विवाहित महिलेने पती मुलींचा सांभाळ करत नसल्याच्या कारणाने चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती भेंडारकर, असे आत्महत्या केलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

author img

By

Published : May 21, 2019, 1:50 PM IST

मृत स्वाती

गोंदिया - मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील येगावच्या एका विवाहित महिलेने पती मुलींचा सांभाळ करत नसल्याच्या कारणाने चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती भेंडारकर, असे आत्महत्या केलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


येगाव येथील प्रमोद भेंडारकर यांच्यासोबत २०११ ला स्वातीचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला २ मुली आहेत. काल सोमवारी रात्री प्रमोद सोबत स्वातीचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. तेव्हा तिने रागाच्या भरात राहत्या गळफास घेतला. घरातील मंडळीना तिचा मृतदेह घरातील ढाब्यावर आढळला. तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आत्महत्या केलेल्या स्वातीने पती प्रमोद मुलींचा सांभाळ व्यवस्थित नसल्याने हे पाऊल उचलले असल्याचे लिहले आहे.


मात्र, स्वातीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून प्रमोदच्या कुटुंबीयांनी मिळून स्वातीची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. स्वातीने चिठ्ठीत मुलींचा साभांळ त्यांच्या आजोबांनी करावे, असे सांगितले आहे. दरम्यान, पतीच्या जाचामुळे स्वातीने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

गोंदिया - मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील येगावच्या एका विवाहित महिलेने पती मुलींचा सांभाळ करत नसल्याच्या कारणाने चिठ्ठी लिहून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती भेंडारकर, असे आत्महत्या केलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


येगाव येथील प्रमोद भेंडारकर यांच्यासोबत २०११ ला स्वातीचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला २ मुली आहेत. काल सोमवारी रात्री प्रमोद सोबत स्वातीचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. तेव्हा तिने रागाच्या भरात राहत्या गळफास घेतला. घरातील मंडळीना तिचा मृतदेह घरातील ढाब्यावर आढळला. तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आत्महत्या केलेल्या स्वातीने पती प्रमोद मुलींचा सांभाळ व्यवस्थित नसल्याने हे पाऊल उचलले असल्याचे लिहले आहे.


मात्र, स्वातीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून प्रमोदच्या कुटुंबीयांनी मिळून स्वातीची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. स्वातीने चिठ्ठीत मुलींचा साभांळ त्यांच्या आजोबांनी करावे, असे सांगितले आहे. दरम्यान, पतीच्या जाचामुळे स्वातीने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_21.MAY.19_SUICIDE
शहगळा फास घेऊन विवाहितेची आत्महत्या
आत्महत्या करण्या आधी लिहली चिट्टी
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील येगाव येथील एका २७ वर्षीय महिलेलने सकाळी पहाटे ५ वाजे च्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली स्वाती भेंडारकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असुन सदर महिलेलने आत्महत्ये पूर्वी एक पत्र लिहून ठेवल्याचे दिसुन आले त्यात मुलांचा सांभाळ त्यांचा वडील करू शकत नाही, असा उल्लेख असल्याने पतीच्या जाचाने तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
VO :- येगाव येथील प्रमोद भेंडारकर यांच्यासोबत २०११ ला स्वातीचे लग्न झाले होते. दाम्पत्य जीवनात ६ व २ वर्षाची मुली आहेत. त्यातच काल रात्री प्रमोद डोबत क्षुलक कारणावरून खटके उडाले. रागांच्या भरात ती अचानक बेपत्ता झाली. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता, घरातील ढाब्यावर तिचे मृतदेह फांसावर टांगलेले आढळले. यावरून स्वातीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. मात्र स्वातीच्या मृतदेहाजवळ लिहलेले पत्र दिसुन आले. त्या पत्रात दोन्ही मुलींचा सांभाळ तिचे वडील करू शकत नाही. त्यामुळे मुलींचे शिक्षण त्यांच्या मोठ्या वडिलांनी करावे, असा मार्मिक सल्लाही पात्राच्या माध्यमातुन तिने दिला. यामुळे पतीच्या जाचामुळे तिने आत्महत्या केल्याचे प्रथम अंदाज दर्शनी दिसून येत असल्याचे बोले जात आहे. तर दुसरीकडे स्वातीच्या आई-वडिलांनी तिची आत्महत्या नसुन कुटुंबीयांनी मिळून हत्या केली, असा आरोप केला आहे. या घटनेची नोंद अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.