गडचिरोली - गुरूवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांचा यात समावेश आहे.
दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; अनेक वाहतूक मार्ग बंद दक्षिण गडचिरोली भागातील आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- सिरोंचा, रेपनपल्ली- कमलापूर, अहेरी- गडअहेरी हे मार्ग सद्या पुरामुळे बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात सर्वात जास्त पाऊस अहेरी तालुक्यात (98.4 मिमी) झाला.मुसळधार पावसाने मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावालगत असलेल्या नाल्यांना आणि कोपरअली नदीला पूर आला आहे. आलापल्ली-मुलचेरा-आष्टी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तालुक्यात असलेली दिना नदीही तुडुंब भरून वाहत असून नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर गोमणी गावात सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे.