गडचिरोली - पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगाणात गेलेला युवक महाराष्ट्रात परतताच वीजेचा धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. अक्षय कोडापे (वय-24, रा. भंगारामपेठ) असे मृत युवकाचे नाव आहे. सर्व मजूर अहेरी तालुक्यातले असून, तेलंगणातून परतत असल्याने वाटेतल्या गावकऱ्यांच्या भीतीने जंगल आणि शेतीच्या मार्गाने प्रवास करीत होते.
अहेरी तालुक्यातील भंगारामपेठ येथील युवक सहकारी मजुरासोबत बुधवारी रात्री तेलंगाणामधून परतत असताना, महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झाला. तेव्हा लंबडपल्ली गावालगत शेतात असलेल्या बोअरवेलच्या वीजेचा धक्का लागला. यात अक्षय हा पत्नीच्या डोळ्यादेखत मृत्यू पावला.
हे मजूर अहेरी तालुक्यातले असून, तेलंगाणातून परतत असल्याने वाटेतल्या गावकऱ्यांच्या भीतीने जंगल आणि शेतीच्या मार्गाने प्रवास करीत होते. मात्र, तरूण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.