ETV Bharat / state

भामरागडमध्ये शेकडो घरांमध्ये शिरले पुराचे पाणी; पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी नावेचा वापर

author img

By

Published : Aug 8, 2019, 6:36 PM IST

Updated : Aug 8, 2019, 7:47 PM IST

भामरागडमध्ये पार्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीन नदीच्या पुराचं पाणी घुसल्यानs अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मागील 36 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाहेरीवरून गडचिरोलीला येणारी बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून पडली आहे.

भामरागडमध्ये शेकडो घरांमध्ये शिरले पुराचे पाणी

गडचिरोली - भामरागडमध्ये पार्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीन नदीच्या पुराचं पाणी घुसल्यानं अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मागील 36 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नावेचा वापर करावा लागत आहे.

लाहेरी-गडचिरोली बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून

पाणी साचलेल्या ठिकाणी सामानाची गरज भागवण्यासाठी बोटीचा आधार घेतला जात आहे. लाहेरीवरून गडचिरोलीला येणारी बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून पडली आहे. पोलिसांनी चालक आणि वाहकाच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीनही नद्यांच्या पुराने भामरागडला वेढा दिला आहे. पाऊस अद्यापही सुरूच असल्याने पर्लकोटा नदीचा पूर ओसरण्याची चिन्हे नाहीत. नागरिकांचे हाल होत असून अनेकांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकट्या भामरागड तालुक्यात 60 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गडचिरोली - भामरागडमध्ये पार्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीन नदीच्या पुराचं पाणी घुसल्यानं अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मागील 36 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी नावेचा वापर करावा लागत आहे.

लाहेरी-गडचिरोली बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून

पाणी साचलेल्या ठिकाणी सामानाची गरज भागवण्यासाठी बोटीचा आधार घेतला जात आहे. लाहेरीवरून गडचिरोलीला येणारी बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून पडली आहे. पोलिसांनी चालक आणि वाहकाच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीनही नद्यांच्या पुराने भामरागडला वेढा दिला आहे. पाऊस अद्यापही सुरूच असल्याने पर्लकोटा नदीचा पूर ओसरण्याची चिन्हे नाहीत. नागरिकांचे हाल होत असून अनेकांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकट्या भामरागड तालुक्यात 60 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Intro:भामरागडमध्ये शेकडो घर व दुकानांमध्ये शिरले पुराचे पाणी : नावद्वारे पुरविले जातोय पिण्याचं पाणी

गडचिरोली : मागील 36 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्याचा संपर्क मुख्यालयाशी तुटला असून शंभरावर अधिक गावे संपर्कापासून तुटली आहेत. भामरागडमध्ये पार्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीन नदीच्या पुराचं पाणी घुसल्यानं अनेक घरं आणि दुकानं पाण्याखाली आली आहेत. या लोकांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी आता नावेच वापर करावा लागत आहे. Body:पाणी साचलेल्या ठिकाणी लोक नावेद्वारे ये-जा करीत असून सामानाची गरज भागवण्यासाठी बोटीचा आधार घेतला जात आहे. लाहेरीवरून गडचिरोलीला येणारी बस सोमवारपासून भामरागड येथेच अडकून पडली, असून पोलिसांनी चालक आणि वाचकाच्या निवास आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. आताही पाऊस सुरू असल्यानं पर्लकोटा नदीचा पूर ओसरण्याची चिन्हे नाहीत. पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम या तीनही नद्यांच्या पुराने भामरागडला वेढा दिला आहे. त्यामुळं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. येथील अनेकांच्या मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर पाऊस झाला असून एकट्या भामरागड तालुक्यात 60 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

व्हिज्युअल आणि
बाईट : बसचालक, गडचिरोली
Conclusion:व्हिज्युअल आणि
बाईट : बसचालक, गडचिरोली
Last Updated : Aug 8, 2019, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.